शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्यांकडून शेतकऱ्यांना नोटिसा

By admin | Updated: November 9, 2016 23:23 IST

नाराजीचा सूर : करारभंगमुळे कारवाईचा ससेमिरा

दत्तात्रय पाटील -- म्हाकवे -जिल्ह्यात गेल्या दशकात उसाचे क्षेत्र वाढल्यामुळे साखर कारखान्यांचीही संख्या वाढली आहे. त्यामुळे काही शेतकरी लावण केलेल्या ऊस क्षेत्राची नोंद दोन ते तीन कारखान्यांकडे करतात. परिणामी एकाच कारखान्याला हा ऊस मिळणार असून, अन्य कारखान्यांचा गाळप अंदाज चुकतो. त्यामुळे आता काही कारखान्यांनी गतवर्षी ऊस क्षेत्र नोंद केलेल्या, परंतु ऊस न पाठविलेल्या शेतकऱ्यांना नोटिसा पाठवून दंडात्मक कारवाईचा ससेमिरा त्यांच्या मागे लावला आहे. याबाबत शेतकऱ्यांतून नाराजीचे सूर उमटत आहेत.जिल्ह्यात सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड आहे. किंबहुना उसावरच येथील शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे, परंतु गतवर्षी दुष्काळजन्य परिस्थितीमुळे पाण्याअभावी येथील हजारो एकरांतील ऊसपीक वाळून गेले. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे येथील शेतकरी कासावीस झाला होता. पाण्याअभावी थोडे-फार नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनीही भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी करार केलेल्याच कारखान्याच्या ऊसतोडणीची वाट न पाहता मिळेल त्या कारखान्याकडे ऊस पाठविला होता.परंतु, काही कारखानदारांनी ऊस नोंदीचा करार भंग केल्यामुळे कारखान्याचे नुकसान झाले आहे. करार भंग करून आपण आमचेकडे नोंद केलेल्या उसाची अन्यत्र विल्हेवाट लावली आहे असे सांगत या नुकसानीची रक्कम आपणाकडून का वसूल करू नये? अशा नोटिसा संबंधित शेतकऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.दरम्यान, करारभंग करून उसाची अन्यत्र विल्हेवाट लावणाऱ्या शेतकऱ्यांकडून एकरी ७५० रुपये वसुली नुकसानभरपाई स्वरूपात कारखानदार करणार आहेत. तसेच संबंधित शेतकऱ्याने नोटीस पोहोचल्यापासून दहा दिवसांच्या आता याबाबत लेखी खुलासा करण्याचीही संधी दिली आहे. मात्र दहा दिवसांत कोणताही खुलासा न केल्यास अथवा केलेला खुलासा प्रशासनाला असमाधानकारक वाटल्यास नुकसान भरपाईची कारवाई करणार असल्याचेही या नोटिसीत नमूद केले आहे.त्या नुकसानीला जबाबदार कोण?काही कारखान्यांचे प्रशासन ऊसतोडणी कार्यक्रमात अदलाबदल करून आपल्या बगलबच्च्यांचा ऊस मुदतीपूर्वीच उचल करतात, तर काही कारखानदार को-२६५ उसाची लावण करू नका, त्याला रिकव्हरी बसत नाही असे सांगतात. मात्र, अनेक कारखान्यांच्या प्रशासनातील संचालक, कारभाऱ्यांचाच को-२६५ ऊस क्रमपाळी डावलून तोडला जातो. यावेळी प्रामाणिकपणे जिवापाड कष्ट करून उसाची जपणूक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जातिवंत (६७१, ६६००३२) ऊसही शेतात खितपत पडतो. यावेळी कुठला कारखानदार संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यायला येतो? अशा संतापजनक प्रतिक्रियाही शेतकऱ्यांतून उमटू लागल्या आहेत. त्या नुकसानीला जबाबदार कोण?काही कारखान्यांचे प्रशासन ऊसतोडणी कार्यक्रमात अदलाबदल करून आपल्या बगलबच्च्यांचा ऊस मुदतीपूर्वीच उचल करतात, तर काही कारखानदार को-२६५ उसाची लावण करू नका, त्याला रिकव्हरी बसत नाही असे सांगतात. मात्र, अनेक कारखान्यांच्या प्रशासनातील संचालक, कारभाऱ्यांचाच को-२६५ ऊस क्रमपाळी डावलून तोडला जातो. यावेळी प्रामाणिकपणे जिवापाड कष्ट करून उसाची जपणूक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जातिवंत (६७१, ६६००३२) ऊसही शेतात खितपत पडतो. यावेळी कुठला कारखानदार संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यायला येतो? अशा संतापजनक प्रतिक्रियाही शेतकऱ्यांतून उमटू लागल्या आहेत. गतवर्षी जानेवारी-फेब्रुवारीनंतर कागल तालुक्यातील कालव्यात पाणी येण्याची शक्यता दुर्मीळच होती. तसेच आमची शेतीही पठाराकडील भागातील माळरानावरील आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात १० ते १५ दिवसाला पाणी लागते. पाण्याअभावी १०० टक्के नुकसान होण्याची भीती असल्यानेच आम्ही उसाची तोड मिळेल त्या कारखान्याकडे ऊस पाठविला. - विजय महादेव डाकवे, शेतकरी.