शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्यांकडून शेतकऱ्यांना नोटिसा

By admin | Updated: November 9, 2016 23:23 IST

नाराजीचा सूर : करारभंगमुळे कारवाईचा ससेमिरा

दत्तात्रय पाटील -- म्हाकवे -जिल्ह्यात गेल्या दशकात उसाचे क्षेत्र वाढल्यामुळे साखर कारखान्यांचीही संख्या वाढली आहे. त्यामुळे काही शेतकरी लावण केलेल्या ऊस क्षेत्राची नोंद दोन ते तीन कारखान्यांकडे करतात. परिणामी एकाच कारखान्याला हा ऊस मिळणार असून, अन्य कारखान्यांचा गाळप अंदाज चुकतो. त्यामुळे आता काही कारखान्यांनी गतवर्षी ऊस क्षेत्र नोंद केलेल्या, परंतु ऊस न पाठविलेल्या शेतकऱ्यांना नोटिसा पाठवून दंडात्मक कारवाईचा ससेमिरा त्यांच्या मागे लावला आहे. याबाबत शेतकऱ्यांतून नाराजीचे सूर उमटत आहेत.जिल्ह्यात सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड आहे. किंबहुना उसावरच येथील शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे, परंतु गतवर्षी दुष्काळजन्य परिस्थितीमुळे पाण्याअभावी येथील हजारो एकरांतील ऊसपीक वाळून गेले. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे येथील शेतकरी कासावीस झाला होता. पाण्याअभावी थोडे-फार नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनीही भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी करार केलेल्याच कारखान्याच्या ऊसतोडणीची वाट न पाहता मिळेल त्या कारखान्याकडे ऊस पाठविला होता.परंतु, काही कारखानदारांनी ऊस नोंदीचा करार भंग केल्यामुळे कारखान्याचे नुकसान झाले आहे. करार भंग करून आपण आमचेकडे नोंद केलेल्या उसाची अन्यत्र विल्हेवाट लावली आहे असे सांगत या नुकसानीची रक्कम आपणाकडून का वसूल करू नये? अशा नोटिसा संबंधित शेतकऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.दरम्यान, करारभंग करून उसाची अन्यत्र विल्हेवाट लावणाऱ्या शेतकऱ्यांकडून एकरी ७५० रुपये वसुली नुकसानभरपाई स्वरूपात कारखानदार करणार आहेत. तसेच संबंधित शेतकऱ्याने नोटीस पोहोचल्यापासून दहा दिवसांच्या आता याबाबत लेखी खुलासा करण्याचीही संधी दिली आहे. मात्र दहा दिवसांत कोणताही खुलासा न केल्यास अथवा केलेला खुलासा प्रशासनाला असमाधानकारक वाटल्यास नुकसान भरपाईची कारवाई करणार असल्याचेही या नोटिसीत नमूद केले आहे.त्या नुकसानीला जबाबदार कोण?काही कारखान्यांचे प्रशासन ऊसतोडणी कार्यक्रमात अदलाबदल करून आपल्या बगलबच्च्यांचा ऊस मुदतीपूर्वीच उचल करतात, तर काही कारखानदार को-२६५ उसाची लावण करू नका, त्याला रिकव्हरी बसत नाही असे सांगतात. मात्र, अनेक कारखान्यांच्या प्रशासनातील संचालक, कारभाऱ्यांचाच को-२६५ ऊस क्रमपाळी डावलून तोडला जातो. यावेळी प्रामाणिकपणे जिवापाड कष्ट करून उसाची जपणूक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जातिवंत (६७१, ६६००३२) ऊसही शेतात खितपत पडतो. यावेळी कुठला कारखानदार संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यायला येतो? अशा संतापजनक प्रतिक्रियाही शेतकऱ्यांतून उमटू लागल्या आहेत. त्या नुकसानीला जबाबदार कोण?काही कारखान्यांचे प्रशासन ऊसतोडणी कार्यक्रमात अदलाबदल करून आपल्या बगलबच्च्यांचा ऊस मुदतीपूर्वीच उचल करतात, तर काही कारखानदार को-२६५ उसाची लावण करू नका, त्याला रिकव्हरी बसत नाही असे सांगतात. मात्र, अनेक कारखान्यांच्या प्रशासनातील संचालक, कारभाऱ्यांचाच को-२६५ ऊस क्रमपाळी डावलून तोडला जातो. यावेळी प्रामाणिकपणे जिवापाड कष्ट करून उसाची जपणूक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जातिवंत (६७१, ६६००३२) ऊसही शेतात खितपत पडतो. यावेळी कुठला कारखानदार संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यायला येतो? अशा संतापजनक प्रतिक्रियाही शेतकऱ्यांतून उमटू लागल्या आहेत. गतवर्षी जानेवारी-फेब्रुवारीनंतर कागल तालुक्यातील कालव्यात पाणी येण्याची शक्यता दुर्मीळच होती. तसेच आमची शेतीही पठाराकडील भागातील माळरानावरील आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात १० ते १५ दिवसाला पाणी लागते. पाण्याअभावी १०० टक्के नुकसान होण्याची भीती असल्यानेच आम्ही उसाची तोड मिळेल त्या कारखान्याकडे ऊस पाठविला. - विजय महादेव डाकवे, शेतकरी.