शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

सतरा कारखान्यांना नोटिसा

By admin | Updated: December 9, 2014 00:59 IST

‘एफआरपी’चा प्रश्न : विभागीय सहसंचालकांची कारवाई : कायदेशीर दर द्या; अन्यथा फौजदारी

राजाराम लोंढे - कोल्हापूर -चौदा दिवसांत ‘एफआरपी’प्रमाणे दर न देणाऱ्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील १७ साखर कारखान्यांना प्रादेशिक साखर सहसंचालकांनी ‘कारणे दाखवा नोटिसा’ बजावल्या आहेत. विहित वेळेत दर न दिल्याने आपणावर गुन्हे का दाखल करू नयेत, याबाबत खुलासा मागितला असून, अद्याप केंद्राचे पॅकेज न मिळाल्याने पैसे द्यायचे कसे? असा प्रश्न कारखानदारांसमोर आहे. गेले तीन-साडेतीन महिने साखरेचे दर घसरत आहेत. परिणामी, साखर कारखान्यांना राज्य बँकेने त्या प्रमाणात उचल दिली आहे. कोल्हापूर विभागातील कारखान्यांची एफआरपी २४०० ते २६०० रुपये प्रतिटन होते. राज्य बँकेची उचल व एफआरपी याची सांगड बसत नसल्याने कारखानदारांसमोर पेच निर्माण झाला आहे. राज्य शासनाने ऊस खरेदी माफ करून कारखानदारांना दिलासा दिला; पण एवढ्या मदतीने उचलीचा प्रश्न सुटणार नाही. यासाठी केंद्राकडून मदत गरजेची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ आश्वासन दिले आहे, तोपर्यंत हिवाळी अधिवेशन सुरू झाल्याने मदतीचा प्रश्न लांबणीवर पडणार आहे. अशा परिस्थितीत एफआरपीप्रमाणे पैसे देण्याबाबत कारखानदारांची कोंडी झाली आहे. गेल्यावर्षीही एफआरपीप्रमाणे दर न देणाऱ्या कारखान्यांना सहसंचालकांनी नोटिसा काढल्या होत्या; पण कारवाई झाली नव्हती. यंदा राज्यातील सरकार बदलले आहे. त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलन न करता कारखानदारांनाच कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न आहे. १४ दिवसांत पैसे न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्यासाठी संघटनेने शासनाच्या मागे तगादा लावल्यानेच साखर विभाग आक्रमक झाला आहे. त्यातूनच १ ते १५ नोव्हेंबरदरम्यान सुरू झालेल्या १७ कारखान्यांना प्रादेशिक साखर सहसंचालक वाय. व्ही. सुर्वे यांनी नोटिसा लागू केल्या असून, त्यांना बुधवार (दि. १०)पर्यंत खुलासा देण्याचे आदेश दिले आहेत. फौजदारी होते केव्हा?१४ दिवसांत पैसे देणे कायद्याने बंधनकारक आहे. या वेळेत पैसे न दिल्यास तेथून पुढे जितके दिवस देणार नाही, तेवढ्या दिवसांचे दंडव्याज शेतकऱ्यांना द्यावे लागते. साखर कारखान्यांचे आर्थिक वर्ष सप्टेंबरपर्यंत असते. या वेळेत बिले नाही दिली तर मग फौजदारीची कारवाई होते, असे तज्ज्ञांचे मत आहे. यांना काढल्या नोटिसाकोल्हापूर : दत्त-शिरोळ, कुंभी-कुडित्रे, आप्पासाहेब नलवडे, छत्रपती शाहू, जवाहर-हुपरी, छत्रपती राजाराम, मंडलिक-हमीदवाडा, डॉ. डी. वाय. पाटील, दूधगंगा-बिद्री, दालमिया-आसुर्ले, गुरुदत्त-टाकळीवाडी (दोन दिवसांपूर्वी दालमिया व गुरुदत्त यांची ‘एफआरपी’प्रमाणे बिले अदा.) सांगली : हुतात्मा, क्रांती, सोनहिरा, विश्वास, उदगीर.‘एफआरपी’प्रमाणे मिळणारा दरही शेतकऱ्यांना परवडत नाही, ही वस्तुस्थिती आहे; पण साखरेचे दर घसरल्याने साखर उद्योग दुष्टचक्रात सापडला आहे. केंद्र व राज्य सरकारने अनुदान स्वरूपात मदत करून यातून मार्ग काढावा. - राजेंद्र पाटील-यड्रावकर (अध्यक्ष, ‘शरद साखर कारखाना’, नरंदे) साखरेचे दर घसरल्याने कारखान्यांसमोर अडचणी आहेत. राज्य व केंद्र शासनाने आर्थिक मदत करून यातून मार्ग काढावा. फौजदारीच्या नोटिसा काढून प्रश्न सुटणार नाही. प्रश्न सोडवण्यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. - के. पी. पाटील - अध्यक्ष, बिद्री साखर कारखाना कुवत आहे; पण पॅकेजची वाट !विभागातील काही कारखाने आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, ते एकरकमी उचल देऊ शकतात; पण ‘एफआरपी’प्रमाणे दर दिला तर आगामी केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीत अडचण नको, यासाठी काही कारखान्यांनी मुद्दाम बिले लांबवली आहेत.