शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

पंचगंगा प्रदूषणप्रश्नी ‘राजाराम’ला नोटीस

By admin | Updated: April 7, 2015 01:16 IST

नदीत दूषित पाणी सोडले : शिये पाणवठ्याजवळ मासे मेल्याने गंभीर दखल

कोल्हापूर : शिये (ता. करवीर) हद्दीत पंचगंगा नदीत मोठ्या प्रमाणात मासे मेल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. त्यानंतर प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (एमपीसीबी) तक्रार दाखल करून पंचनामा करण्याची मागणी केली. सोमवारी तक्रारदारांसह एमपीसीबी व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कसबा बावड्यातील राजाराम बंधारा ते शिये पूलदरम्यान नदीपात्राचा पंचनामा केला. यावेळी उंबरमळी भागातून राजाराम साखर कारखान्याने मळीमिश्रित पाणी नदीत सोडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मंडळाने सात दिवसांत खुलासा करण्याची नोटीस कारखान्यास बजावली.शिये नदीच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात दूषित पाण्यामुळे मासे मेल्याचा प्रकार उघडकीस आला. उच्च न्यायालयात पंचगंगा प्रदूषणप्रश्नी २३ एप्रिलला सुनावणी होणार आहे. त्यातच मासे मेल्याची घटना घडल्याने प्रशासनात खळबळ उडाली. दिलीप देसाई यांच्या तक्रारीवरून मंडळाचे प्रादेशिक अधिकारी एस. एस. डोके, उपप्रादेशिक अधिकारी मनिष होळकर, नायब तहसीलदार एम. ए. शिंदे, मत्स्य विभागाचे प्रतिनिधी एच. एस. जाधव, महापालिकेचे प्रतिनिधी तेजस्विनी माळी, राजाराम कारखान्याचे प्रतिनिधी नंदकुमार जाधव यांनी राजाराम बंधारा ते शिये पाणवट्यापर्यंत नदीची पाहणी केली.यावेळी केलेल्या पाहणीत राजाराम बंधाऱ्याच्या वरील बाजूस पाणी स्वच्छ असून एकही मासा मेल्याचे आढळले नाही. थोड्या अंतरावरून शियेकडील बाजूच्या नदीच्या दोन्हीपात्राच्या बाजूला मोठ्या प्रमाणात मासे मृत झाल्याचे उघडकीस आले. नदीच्या पाण्यावर हिरवट तेलकट तवंग आढळला. राजाराम कारखान्याच्या पश्चिमेच्या बाजूस अंदाचे ५०० मीटरच्या अंतरावर असणाऱ्या उंबरमळी या भागात शेतालगत भूमिगत पाईपलाईनद्वारे राजाराम कारखान्यातून सांडपाणी नदीत मिसळत असल्याचे पथकाला आढळले. आजूबाजूचे गवत व झुडपे जळून दूषित पाणी नदीत मिसळत असल्याची नोंद मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पंचनाम्यात केली. येथील पाणी मंडळाने तपासणीसाठी घेतले तसेच राजाराम कारखान्यास जलप्रदूषण कायदा १९७४ व वायू प्रदूषण कायदा १९८१ तसेच दूषित पाणी विल्हेवाट अधिनियमन २००८ नुसार कारवाईची नोटीस कारखाना व्यवस्थापनास बजावली. सात दिवसांत कारखान्याने खुलासा करण्याचे आदेश उपप्रादेशिक अधिकारी मनिष होळकर यांनी नोटिसीद्वारे दिली आहे. (प्रतिनिधी)पंचगंगा नदीपात्र क्षेत्रात पाच साखर कारखाने आहेत. आता हंगाम संपत आल्याने कारखाना धुतल्यानंतरचे पाणी नदीत सोडण्याचा प्रकार घडण्याची शक्यता आहे. ‘राजाराम’सह या उर्वरित कारखान्यांवर कारवाई करण्यासाठी २३ एप्रिलला उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे मागणी करणार आहे. - दिलीप देसाई कारखाना ३१ मार्चला बंद झाला आहे. त्यामुळे दूषित पाणी सोडण्याचा प्रश्नच येत नाही. नदी प्रदूषणाबाबत कोणतीही नोटीस कारखान्यास मिळालेली नाही. अशी नोटीस आल्यास कारखानाही त्यास कायदेशीर उत्तर देईल. - आर. सी. पाटील(कार्यकारी संचालक)