शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

चुकीची माहिती देणाऱ्या ३७ शिक्षकांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 00:57 IST

कोल्हापूर : सोयीच्या ठिकाणी बदली व्हावी यासाठी आॅनलाईन प्रक्रिया करताना पोर्टलवर चुकीची माहिती भरणाºया जिल्ह्यातील ३७ प्राथमिक शिक्षकांना ‘कारणे दाखवा नोटिसा’ काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. तसेच बदली झालेल्या सर्वच शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे.यंदा पहिल्यांदाच झालेल्या आॅनलाईन बदल्यांमध्ये अनेकांनी ‘सोयीची बदली’ व्हावी यासाठी चुकीची ...

कोल्हापूर : सोयीच्या ठिकाणी बदली व्हावी यासाठी आॅनलाईन प्रक्रिया करताना पोर्टलवर चुकीची माहिती भरणाºया जिल्ह्यातील ३७ प्राथमिक शिक्षकांना ‘कारणे दाखवा नोटिसा’ काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. तसेच बदली झालेल्या सर्वच शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे.यंदा पहिल्यांदाच झालेल्या आॅनलाईन बदल्यांमध्ये अनेकांनी ‘सोयीची बदली’ व्हावी यासाठी चुकीची माहिती भरल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. गंभीर आजाराने आजारी असलेल्या शिक्षकांचा ‘संवर्ग १’ मध्ये समावेश होतो. दुसºया संवर्गामध्ये ‘पती-पत्नी सोय’ हा घटक येतो. तिसºयासंवर्गामध्ये ‘सुगम दुर्गम शाळा’ हा प्रकार येत असून चौथ्या प्रकारामध्ये बाहेरच्या जिल्ह्णातून आलेल्या शिक्षकांनी आपली मूळ नियुक्ती तारीख लिहून सेवाज्येष्ठतेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आले आहे.काही शिक्षकांनी चुकीच्या पद्धतीने अपंग आणि आजारपणाचे दाखले घेतले आहेत तर काहींनी पती-पत्नी एकत्रिकरण नियमाचा फायदा घेण्यासाठी काही घोटाळे केले आहेत. हे सर्व प्रकार शासनाच्या निदर्शनास आले आहेत. यातील सकृतदर्शनी दोषी आढळलेल्या ३७ शिक्षक शिक्षिकांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी गुरुवारी ‘कारणे दाखवा नोटिसा’ काढल्या आहेत.तसेच गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकाºयांच्या नेतृत्वाखाली पथके तयार करण्यात आली असून बदली होऊन आलेल्या सर्व तालुक्यांतील शिक्षकांच्या कागदपत्रांची छाननी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येत्या १० दिवसांत ही छाननी करून याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल डॉ. खेमनार यांनी मागवला आहे. या प्रकरणी कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर कारवाईचाही इशारा देण्यात आला आहे.खोटी माहिती देणाºयांचेधाबे दणाणले‘आॅनलाईन माहिती भरली तर कोण विचारतोय,’ अशा आविर्भावात अनेकांनी चुकीच्या माहितीच्या आणि दाखल्यांच्या आधारे आपल्या बदल्या सोयीच्या कशा होतील याची जोडणी घातली. मात्र, आता दाखले कुणी दिले येथूनच चौकशी होणार असल्याने आणि चुकीची माहिती भरल्याने कारवाई अटळ मानली जात असल्याने अशांचे धाबे दणाणले आहे.