शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

चुकीची माहिती देणाऱ्या ३७ शिक्षकांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 00:57 IST

कोल्हापूर : सोयीच्या ठिकाणी बदली व्हावी यासाठी आॅनलाईन प्रक्रिया करताना पोर्टलवर चुकीची माहिती भरणाºया जिल्ह्यातील ३७ प्राथमिक शिक्षकांना ‘कारणे दाखवा नोटिसा’ काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. तसेच बदली झालेल्या सर्वच शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे.यंदा पहिल्यांदाच झालेल्या आॅनलाईन बदल्यांमध्ये अनेकांनी ‘सोयीची बदली’ व्हावी यासाठी चुकीची ...

कोल्हापूर : सोयीच्या ठिकाणी बदली व्हावी यासाठी आॅनलाईन प्रक्रिया करताना पोर्टलवर चुकीची माहिती भरणाºया जिल्ह्यातील ३७ प्राथमिक शिक्षकांना ‘कारणे दाखवा नोटिसा’ काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. तसेच बदली झालेल्या सर्वच शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे.यंदा पहिल्यांदाच झालेल्या आॅनलाईन बदल्यांमध्ये अनेकांनी ‘सोयीची बदली’ व्हावी यासाठी चुकीची माहिती भरल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. गंभीर आजाराने आजारी असलेल्या शिक्षकांचा ‘संवर्ग १’ मध्ये समावेश होतो. दुसºया संवर्गामध्ये ‘पती-पत्नी सोय’ हा घटक येतो. तिसºयासंवर्गामध्ये ‘सुगम दुर्गम शाळा’ हा प्रकार येत असून चौथ्या प्रकारामध्ये बाहेरच्या जिल्ह्णातून आलेल्या शिक्षकांनी आपली मूळ नियुक्ती तारीख लिहून सेवाज्येष्ठतेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आले आहे.काही शिक्षकांनी चुकीच्या पद्धतीने अपंग आणि आजारपणाचे दाखले घेतले आहेत तर काहींनी पती-पत्नी एकत्रिकरण नियमाचा फायदा घेण्यासाठी काही घोटाळे केले आहेत. हे सर्व प्रकार शासनाच्या निदर्शनास आले आहेत. यातील सकृतदर्शनी दोषी आढळलेल्या ३७ शिक्षक शिक्षिकांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी गुरुवारी ‘कारणे दाखवा नोटिसा’ काढल्या आहेत.तसेच गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकाºयांच्या नेतृत्वाखाली पथके तयार करण्यात आली असून बदली होऊन आलेल्या सर्व तालुक्यांतील शिक्षकांच्या कागदपत्रांची छाननी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येत्या १० दिवसांत ही छाननी करून याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल डॉ. खेमनार यांनी मागवला आहे. या प्रकरणी कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर कारवाईचाही इशारा देण्यात आला आहे.खोटी माहिती देणाºयांचेधाबे दणाणले‘आॅनलाईन माहिती भरली तर कोण विचारतोय,’ अशा आविर्भावात अनेकांनी चुकीच्या माहितीच्या आणि दाखल्यांच्या आधारे आपल्या बदल्या सोयीच्या कशा होतील याची जोडणी घातली. मात्र, आता दाखले कुणी दिले येथूनच चौकशी होणार असल्याने आणि चुकीची माहिती भरल्याने कारवाई अटळ मानली जात असल्याने अशांचे धाबे दणाणले आहे.