शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

रस्ते प्रकल्पाला नाही, नवीन रेखांकनाला आमचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:23 IST

कोपार्डे : भुये, भुयेवाडी गावातून जाणाऱ्या रस्ते प्रकल्पाला विरोध नाही. पण या दोन गावातून एक-दोन नव्हे तब्बल चार ते ...

कोपार्डे : भुये, भुयेवाडी गावातून जाणाऱ्या रस्ते प्रकल्पाला विरोध नाही. पण या दोन गावातून एक-दोन नव्हे तब्बल चार ते पाच रस्ते प्रकल्प प्रस्तावित आहेत. यामुळे या गावातील शेती व स्थावर मालमत्ता प्रभावित होणार आहे. सर्वसंमतीने मंजूर करण्यात आलेल्या रेखांकनानुसार रस्ते प्रकल्प राबविण्यात आले तर लाख मोलाची पिकाऊ शेती वाचविता येणार आहे. त्यामुळे सरकारने केलेल्या रेखांकनाला आमचा विरोध आहे. अशी भूमिका भुये, भुयेवाडी ग्रामस्थांनी घेतली आहे.

भुये व भुयेवाडी गावातून राज्य मार्ग १९४ हा रस्ता कार्यरत आहे. सध्या प्रस्तावित असलेला रत्नागिरी नागपूर-राष्ट्रीय महामार्ग, रिंग रोड, कोकण रेल्वे, सुंदर जोतिबा विकास योजनेअंतर्गतचा रस्ता या दोन गावांतूनच जात आहेत. या दोन गावातून जाणाऱ्या राज्य मार्ग १९४ चे दोन्ही बाजूने रुंदीकरण करून नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचे रेखांकन सर्वसंमतीने मंजूर करण्यात आले होते. यामुळे या गावातील पिकाऊ शेती नैसर्गिक जलस्त्रोत असणाऱ्या सहा ते सात विहिरी व कूपनलिका वाचणार आहेत. या शिवाय भूसंपादनात जाणारी घरे, शेती यासाठी द्यावी लागणाऱ्या किमतीतून शासनाचे ३०० ते ४०० कोटी रुपये वाचणार आहेत. मात्र, सध्या जेथून राष्ट्रीय महामार्गाचे रेखांकन केले आहे त्याची स्थळ पहाणीच केली गेलेली नाही असा आरोप करण्यात येत आहे. यामुळे जोतिबा डोंगरातून वाहणारे नैसर्गिक ओढे, नाले, ओघळ या नैसर्गिक स्त्रोतांचा अथवा त्यांच्या जलनिस्सारणाचा कुठेही उल्लेख व विचार केलेला दिसत नाही.

चौकट

पूर्वीचे रेखांकन बदलून पर्यावरणीय अटींचा भंग

वारणा कोडोली ते वाठार असे नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचे रेखांकन होते. ते बदलून केर्ली, भुयेवाडी, भुये, शिये या दाट लोकवस्ती व कसदार पिकाऊ शेतीतून करण्यात आले आहे. हा पट्टा पूररेषेत येत असल्याने पर्यावरणीय अटींचा यात भंग झाल्याचे स्पष्ट होत आहे.

कोट : प्रस्तावित महामार्गाच्या रेखांकनामधे प्रकल्पाचे पर्यावरणीय परिणाम, स्थानिक सुपीक शेतीचा जैवअधिवास आणि भूरुपस्थान तसेच जोतिबा डोंगररांगेतून पंचगंगा नदीस मिळणाऱ्या प्रवाहाची जलनिस्सारण प्रणाली त्यामुळे तयार होणारे पूरप्रणव क्षेत्र तसेच शेकडो हेक्टर बागायती शेतीस उपलब्ध होणारे उपसा व भूजल सिंचन यांना होणारी बाधा याचा कुठेही उल्लेख किंवा अभ्यास अथवा निरीक्षण केल्याचे दिसत नाही.

- प्रा. डॉ. अभिजीत ज पाटील, भूवैज्ञानिक

कोट : शिये ते भुयेवाडी हा भाग भविष्यात होऊ घालणारे शहर आहे. राष्ट्रीय महामार्ग, रिंग रोड, कोकण रेल्वेमार्ग, अंतर्गत होणारे प्रकल्प या सर्वांसाठी या एकाच भागावरती होणारे अन्यायकारक भूमीसंपादन शासनाच्या विविध विभागांमधे समन्वय ठेवल्यास टाळले जाऊ शकते.

सुभद्रा पाटील,

महिला शेतकरी.

कोट : महामार्गाच्या अधिसूचनेवरती शेतकरी व ग्रामस्थ यांनी दिलेल्या लेखी हरकतीबाबत पारदर्शकपणे सुनावणी होणे गरजेचे आहे. महामार्गाला विरोध नाही. नियोजनशून्य प्रकल्प व स्थळ पहाणी न करता केलेल्या रेखांकनास विरोध आहे.

आनंदराव पाटील

प्रगतशील शेतकरी, भुयेवाडी