शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
2
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
3
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
4
Operation Sindoor: भारताचा एक घाव अन् उरले भग्न अवशेष! मसूद अजहरच्या अड्ड्याचे सॅटेलाईट फोटो
5
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
6
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना
7
Asim Munir Net Worth: रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?
8
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
9
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
10
कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल
11
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी
12
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
13
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
14
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
15
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
16
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
18
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
19
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!

ही जन आशीर्वाद नव्हे, शिव्याशाप यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:29 IST

कोल्हापूर : प्रचंड प्रमाणात महागाई वाढली असताना भाजपच्या मंत्र्यांची महाराष्ट्रातील जन आशीर्वाद ...

कोल्हापूर : प्रचंड प्रमाणात महागाई वाढली असताना भाजपच्या मंत्र्यांची महाराष्ट्रातील जन आशीर्वाद यात्रा ही शिव्याशाप यात्रा आहे अशी बोचरी टीका जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. येथे एका कार्यक्रमासाठी आलेल्या पाटील यांनी भाजपचा समाचार घेतला.

पाटील म्हणाले, पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर प्रचंड वाढले आहेत. जनता यामुळे हैराण झालेली असताना भाजपची महाराष्ट्रातून जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे. बिचारे गावागावातून फिरत आहेत; परंतु महागाईमुळे हैराण झालेल्या जनतेचे शिव्याशापच त्यांना मिळत आहेत. कल्याणसिंग यांच्या पार्थिवावर ठेवलेल्या तिरंग्यावर भाजपचा तिरंगा पांघरल्यामुळे राष्ट्राला प्राधान्य देणाऱ्या नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत. नागरिक हे सहन करणार नाहीत. भाजपला देशापेक्षा पक्ष मोठा वाटतो हेच यातून दिसले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी ‘न कळणाऱ्यांना दिलं; परंतु कळणाऱ्यांना द्यायला वेळ का लागतोय’ अशी विचारणा केली असता यावर आपल्याला बोलण्याची आवश्यकता वाटत नसल्याचे सांगितले, तसेच शेट्टी यांच्या सांगलीतील पत्रकार परिषदेला भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते याबाबत विचारल्यानंतर मात्र पाटील यांची कोंडी झाली. शेट्टी हे महाविकास आघाडीचे घटक असताना असे कसे असे विचारल्यानंतर, बघू, असे सांगत प्रतिक्रिया देणे टाळले. शेट्टी यांच्या मागण्यांचा तपशील माझ्याकडे आला नसल्याचे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

न्यायालयीन याचिकांमुळे काही निर्णय बाकी आहेत. म्हणूनच शिवस्मारकाचे काम थांबले आहे. आमच्या सरकारची ते पूर्ण करण्याची इच्छा आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.