शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

पाणी योजनेने ‘उत्तर काशी’चे झाले टेंभू!

By admin | Updated: March 9, 2015 23:44 IST

पाणी आलं, जमिनी गेल्या : गोपाळ गणेश आगरकरांच्या गावाला मिळाली नवी ओळख--नावामागची कहाणी-दोन

शंकर पोळ - कोपर्डे हवेली  -टेंभू गावाची ओळख वेगवेगळ्या टप्प्यावर बदलत गेली. पूर्वी टेंभूला ‘उत्तर काशी’ म्हणून ओळखले जायचे. गोपाळ गणेश आगरकरांचे गाव म्हणून तर सध्या टेंभू योजनेचे गाव म्हणून राज्यात परिचित आहे.पूर्वेकडे डोंगर तर पश्चिमेकडे कृष्णा नदी़ मधोमध निसर्गरम्य ठिकाणी वसलेले टेंभू गाव. ऐतिहासिक, पौराणिक, स्वातंत्र्याचा इतिहास असणाऱ्या या गावात आशिया खंडातील प्रथम क्रमांकाचा बोगदा खणून जिरायती क्षेत्र बागायतीत आणण्याचा प्रयोग यशस्वी झाला़ हजारो हेक्टर जिरायती शेती बागायती झाली; पण त्याची झळ गावातील शेतकऱ्यांना पोहोचली. प्राचीन काळातील सर्व देवदेवतांची मंदिरे गावात आहेत़ मंदिरांची संख्या १२ ते १३ आहे़ काही मंदिरांचा जीर्णोध्दार करण्यात आला आहे़ तर काही मंदिरे मोडकळीस आली आहेत़ पूर्वी या गावात शेतकरी हळदीचे पीक घेत होते़ ब्रिटिश काळामध्ये गावाच्या उत्तर दिशेने कृष्णा कॅनॉल गेल्याने त्याचा लाभ शेजारील शेतजमिनीला झाला. त्यामुळे काही शेती बागायती झाली़ स्वातंत्र्य लढ्यामध्ये गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या लेखणीतून ब्रिटिशांवर चौफेर टीका केली़ आगरकरांबरोबरच या गावातील मारूती जगताप, भानुदास कदम, कृष्णत भुसारी, दत्तात्रय कुंभार, खाशाबा मदने आदींचाही स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता. महात्मा गांधींच्या हत्येनंतर गावातील समाज वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित झाला़ आगरकरांचे वंशज पुण्यात स्थायिक झाले़ गावाने आगरकरांची आठवण ठेवण्यासाठी त्यांच्या नावाने दिवंगत गोपाळ गणेश आगरकर विद्यालय सुरू केले आहे़ विद्यालयाच्या प्रांगणात आगरकरांचा पुतळा आहे़ टेंभू योजनेचा फायदा झाल्याने गाव १०० टक्के बागायती झाले आहे. टेंभू गावची सध्याची लोकसंख्या सुमारे ४ हजार आहे़ एकूण ११ ग्रामपंचायतींचे सदस्य निवडून जातात़ ग्रामपंचायतीची निवडणूक नेहमी अटीतटीची होत असते़ सत्ताधारी ६ सदस्य तर विरोधी ५ सदस्य आहेत़दारूबंदीसाठी वेळोवेळी ग्रामपंचायतीने ठराव मंजूर करूनही गावात दारूबंदी झाली नाही़ ग्रामपंचायतीने ‘निर्मलग्राम’चा पुरस्कार सलग तीनवेळा प्राप्त केला आहे. ...तरीही गावाला तोटाचटेंभू योजनेचा लाभ शेतीसाठी झाला असला तरी गावाला तोटाही मोठ्या प्रमाणात झाला आहे़ शेतकऱ्यांची ३०० ते ४०० एकर जमीन योजनेत गेली असल्याने शेतकरी भूमिहीन झाले आहेत. शासनाने ज्यांची जमीन गेली, त्यांना शासकीय नोकरीत घेऊ, असे आश्वासन दिले होते ते पूर्ण झाले नाही़ प्रकल्पग्रस्तांचे दाखले काहींना मिळाले तर काहींना मिळाले नाहीत़ १९९५ सालापासून शेतकऱ्यांना शासनाने झुलवत ठेवले आहे़टेंभू योजनेच्या पाण्यामुळे गाव सुजलाम सुफलाम झाले. या योजनेचे पाणी गावात आले आणि उत्तर काशी म्हणून ओळखले जाणारे गाव आता ‘टेंभू’ या नावाने सर्वत्र परिचित झाले आहे. - प्रताप सावंत, उपसरपंच, टेंभू