शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

सबसिडी नको, धान्यच मिळाले पाहिजे

By admin | Updated: February 25, 2015 00:03 IST

कोल्हापुरात विराट मोर्चा : सर्वसामान्य महिला मोठ्या संख्येने रस्त्यावर ; यापुढच्या काळात व्यापक लढ्याचा इशारा

कोल्हापूर : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत रोख सबसिडी नको तर अन्न सुरक्षा कायद्यानुसार सर्वांना पुरेसे धान्य मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी मंगळवारी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला. येथील रेशन बचाव समितीने आयोजित केलेल्या मोर्चात सुमारे दहा हजारांहून अधिक लोक सहभागी झाले होते, महिलांचा मोठ्या संख्येने समावेश होता. सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या अलीकडील काळात निघालेला हा सर्वांत मोठा मोर्चा होता. मिरजकर तिकटी येऊन दुपारी साडेबारा वाजता मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, महानगरपालिका, आईसाहेब महाराज पुतळा, लक्ष्मीपुरी, व्हीनस कॉनर्रमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. भरउन्हात मोर्चा निघूनही मोर्चेकऱ्यांचा उत्साह कमालीचा होता. कोल्हापूर, इचलकरंजी शहरांसह जिल्ह्णातील ४०० ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील महिला-पुरुष मोर्चात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. मोर्चासमोर भाषणात वक्त्यांनी राज्य व केंद्र सरकारवर सडकून टीका केलीच, शिवाय जनतेचा हा धान्य मागणीसाठीचा लढा यापुढच्या काळातही व्यापक प्रमाणात आंदोलन करून लढू, असा गंभीर इशारा दिला. रेशन बचाव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत यादव यांनी जनतेची कदर न करणारे हे सरकार असल्याचा आरोप केला. जर छत्तीसगड, बंगाल, त्रिपुरा, कर्नाटक, मिझोराम यासह अनेक राज्यांत जर रेशन धान्य दुकानांतून विविध प्रकारचे धान्य दिले जात असेल तर मग महाराष्ट्रात का नाही, असा सवाल करत केंद्रात व राज्यात सत्तांतर झाले आणि पहिला फटका सर्वसामान्यांना बसला. अनेक जिल्ह्यात धान्य पोहोचले नाही. चार महिन्यांपासून केशरी कार्डधारकांनाही धान्य मिळालेले नाही. ‘अच्छे दिन येणार’ असल्याचे सांगून सत्तेवर आलेल्यांनी आता सर्वसामान्य जनतेचा धोक्याचा इशारा समजावा, असे यादव म्हणाले.विद्यमान सरकार हे गरीब जनतेच्या जिवाशी खेळत असल्याचा घणाघात राज्य संघटनेचे अध्यक्ष डी. एन. पाटील यांनी केला. जोपर्यंत अंत्योदय योजनेद्वारे ३५ किलो धान्य, एपीएल कार्डधारकांना माणसी १० किलो धान्य मिळत नाही आणि रॉकेल कोटा वाढवून मिळत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही, असा इशाराही पाटील यांनी यावेळी दिला. आॅल इंडिया संघटनेचे अध्यक्ष काका देशमुख यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. ज्यांना कुटुंबच नाही त्या पंतप्रधानांना कुटुंबाची व्याख्या आणि समस्या काय माहीत, असा सवाल यावेळी काका देशमुख यांनी केला. गॅस सिलिंडरचा वापर करणाऱ्यांसह सर्वांना माणसी चार लिटर रॉकेल दिले पाहिजे, अशी मागणीही केली. या मोर्चात रवींद्र मोरे, शौकत महालकरी, नामदेव गावडे, सतीश कांबळे, नगरसेवक राजू पसारे, संगीता देवेकर, सविता संकपाळ आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)