शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

शासनाच्या मदतीपासून कोणी वंचित राहणार नाही: संजयसिंह चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:24 IST

महापुरामुळे अनेक कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत. शासनाच्या धोरणाप्रमाणे सर्वांना मदत पोहोचवली जाईल. यातून एकही पूरग्रस्त वंचित राहणार नाही, अशी ...

महापुरामुळे अनेक कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत. शासनाच्या धोरणाप्रमाणे सर्वांना मदत पोहोचवली जाईल. यातून एकही पूरग्रस्त वंचित राहणार नाही, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिली. ते उदगाव येथील बेघर वसाहतीच्या पूरग्रस्त पाहणी दौऱ्यात बोलत होते.

यावेळी चव्हाण म्हणाले, शासन पूरग्रस्तांसाठी जो निर्णय करेल त्याची पूर्णतः अंमलबजावणी करण्यात येईल. त्यासाठी प्रशासन सज्ज आहे. आरोग्य व स्वछतेबाबत तातडीने पावले उचलावीत, निवारा केंद्रातील पूरग्रस्तांची योग्य व्यवस्था ठेवावी, असे आदेश त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला दिले. यावेळी जि.प. सदस्या स्वाती सासणे म्हणाल्या, चिंचवाडसारख्या पूर्णतः बाधित असणाऱ्या गावातील सर्वच नागरिक स्थलांतित झाले होते. त्यांना सरसकट सानुग्रह अनुदान मिळावे.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ, गटविकास अधिकारी शंकर कवितके, ग्रामविकास अधिकारी रायसिंग वळवी, सरपंच कलीमुन नदाफ, उपसरपंच रमेश मगदूम, राजू मगदूम, बाचू बंडगर, सलिम पेंढारी, जगन्नाथ पुजारी, अरुण कोळी, अमोल माने यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

फोटो ओळ- उदगाव, ता. शिरोळ येथील बेघर वसाहतीतील पूरग्रस्तांची समस्या जाणून घेताना सीईओ संजयसिंह चव्हाण, जि. प. सदस्या स्वाती सासणे यांच्यासह अधिकारी व ग्रामस्थ.

छाया- अजित चौगुले, उदगाव