शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

भरपाई नको, कर्जमाफी द्या

By admin | Updated: June 3, 2015 00:59 IST

मुख्यमंत्र्यांना साकडे : बाळ मानेंचा सरकारला घरचा आहेर

रत्नागिरी : अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानासाठी राज्य सरकारने मदत म्हणून देऊ केलेल्या २०० कोटी रुपयांमधून ६९ कोटी ८५ लाख रुपये आंबा, काजू उत्पादकांना मिळणार आहेत. मात्र, कोकणातील उत्पादकांना भरपाई नको, त्यापेक्षा कर्जमाफी द्यावी, असा घरचा आहेर भाजपचे माजी आमदार आणि प्रदेश प्रवक्ते बाळ माने यांनी सरकारला दिला आहे. ही मागणी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ठेवली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.मंगळवारी राज्य सरकारने अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्यांसाठी २०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली. कोकणातील चार जिल्ह्यांच्या वाट्याला त्यातील ६९ कोटी ८५ लाख रुपये येणार आहेत. ही भरपाई पुरेशी नाही. प्रशासकीय स्तरावरून चुकीची माहिती मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात आली आहे आणि त्यामुळे कोकणावर अन्याय होत आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.राज्य सरकारने २०० कोटी रुपये कर्जमाफी द्यावी आणि उर्वरित कर्ज फेडण्यासाठी तीन वर्षांची मुदत मिळावी. त्यावरील व्याज माफ व्हावे, अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर ठेवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.सरकारी अधिकाऱ्यांनी चुकीची आकडेवारी सरकारसमोर ठेवली आहे. आंबा किंवा काजूला क्षेत्रावर आधारित नुकसानभरपाई देऊ नये, असा मुद्दाही मांडला आहे. त्यावरही जोर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)५५० कोटी रुपयांचे कर्जरत्नागिरी जिल्ह्यात २२ हजार आंबा, काजू बागायतदारांनी ३५० कोटी, तर सिंधुदुर्गातील बागायतदारांनी १९५ कोटी असे ५५० कोटी रुपये कर्ज घेतले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक, खासगी बँका, राष्ट्रीयीकृत बँकांकडून हा कर्ज पुरवठा झाल्याची माहिती कृषी खात्याकडेही उपलब्ध आहे.मात्र, केवळ अवकाळी पाऊसच नाही, तर निसर्गाच्या लहरीपणामुळे आंबा आणि काजू पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जवळपास ७० टक्के पीक हातचे गेले आहे. त्यामुळे या ५५० कोटी कर्जांपैकी २०० कोटी रुपये कर्जमाफी मिळाली, तरच रत्नागिरी-सिंधुदुर्गातील बागायतदारांना दिलासा मिळू शकेल, असे ते म्हणाले.