शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

भरपाई नको, कर्जमाफी द्या

By admin | Updated: June 3, 2015 00:59 IST

मुख्यमंत्र्यांना साकडे : बाळ मानेंचा सरकारला घरचा आहेर

रत्नागिरी : अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानासाठी राज्य सरकारने मदत म्हणून देऊ केलेल्या २०० कोटी रुपयांमधून ६९ कोटी ८५ लाख रुपये आंबा, काजू उत्पादकांना मिळणार आहेत. मात्र, कोकणातील उत्पादकांना भरपाई नको, त्यापेक्षा कर्जमाफी द्यावी, असा घरचा आहेर भाजपचे माजी आमदार आणि प्रदेश प्रवक्ते बाळ माने यांनी सरकारला दिला आहे. ही मागणी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ठेवली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.मंगळवारी राज्य सरकारने अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्यांसाठी २०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली. कोकणातील चार जिल्ह्यांच्या वाट्याला त्यातील ६९ कोटी ८५ लाख रुपये येणार आहेत. ही भरपाई पुरेशी नाही. प्रशासकीय स्तरावरून चुकीची माहिती मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात आली आहे आणि त्यामुळे कोकणावर अन्याय होत आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.राज्य सरकारने २०० कोटी रुपये कर्जमाफी द्यावी आणि उर्वरित कर्ज फेडण्यासाठी तीन वर्षांची मुदत मिळावी. त्यावरील व्याज माफ व्हावे, अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर ठेवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.सरकारी अधिकाऱ्यांनी चुकीची आकडेवारी सरकारसमोर ठेवली आहे. आंबा किंवा काजूला क्षेत्रावर आधारित नुकसानभरपाई देऊ नये, असा मुद्दाही मांडला आहे. त्यावरही जोर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)५५० कोटी रुपयांचे कर्जरत्नागिरी जिल्ह्यात २२ हजार आंबा, काजू बागायतदारांनी ३५० कोटी, तर सिंधुदुर्गातील बागायतदारांनी १९५ कोटी असे ५५० कोटी रुपये कर्ज घेतले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक, खासगी बँका, राष्ट्रीयीकृत बँकांकडून हा कर्ज पुरवठा झाल्याची माहिती कृषी खात्याकडेही उपलब्ध आहे.मात्र, केवळ अवकाळी पाऊसच नाही, तर निसर्गाच्या लहरीपणामुळे आंबा आणि काजू पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जवळपास ७० टक्के पीक हातचे गेले आहे. त्यामुळे या ५५० कोटी कर्जांपैकी २०० कोटी रुपये कर्जमाफी मिळाली, तरच रत्नागिरी-सिंधुदुर्गातील बागायतदारांना दिलासा मिळू शकेल, असे ते म्हणाले.