शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

मास्क नाही तर वस्तुही नाही फलक नावालाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:21 IST

जयसिंगपूर : सहा महिन्यांपूर्वी जिल्हा प्रशासनाने मास्क नाही, प्रवेश नाही या मोहिमेची सुरुवात केली होती. मास्क न घातल्यास वस्तू ...

जयसिंगपूर : सहा महिन्यांपूर्वी जिल्हा प्रशासनाने मास्क नाही, प्रवेश नाही या मोहिमेची सुरुवात केली होती. मास्क न घातल्यास वस्तू मिळणार नाही, असा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला होता. मात्र, पुन्हा एकदा कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना सुरू असल्यातरी नागरिकांकडून नियमावलींचे पालन होतच नसल्याचे दिसून येत आहे.

शिरोळ तालुक्यात जयसिंगपूर, नांदणी, उदगाव येथे नव्याने कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मात्र, हे आदेश जुगारत बाजारपेठेत नागरिकांची भाजी खरेदीसाठी झुंबड उडालेली असते. यामध्ये संसर्ग वाढण्याची भीती नाकारता येत नाही. नियमानुसार फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे, सॅनिटायझर वापरणे आवश्यक आहे.

सध्या शहरासह ग्रामीण भागात देखील नागरिक विनामास्क फिरत असतात. त्यांच्यावर कडक कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र, नागरिकांनीही कारवाईची वाट न पाहता शिस्त पाळणे तेवढेच गरजेचे आहे. मागील वर्षी कोरोनाने हाहाकार केल्यानंतर मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्था कोलमडली होती. ही वेळ पुन्हा येऊ नये, यासाठी सर्वांनीच दक्षता घ्यायला हवी. कोरोनाने पुन्हा शिरकाव केला असतानाही आजही अनेक सामाजिक, राजकीय कार्यक्रमासह लग्न समारंभांमध्ये गर्दी होत असतानाचे चित्र पाहावयास मिळत आहे. यामध्ये अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नसते. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी स्वयंस्फूर्तीने नागरिकांनी नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. कोरोना संकट टाळण्यासाठी प्रत्येक दुकानदाराने मास्क लावूनच विक्री करावी. ग्राहकांनी देखील त्याचे पालन करावे. तरच शासनाच्या उपक्रमाची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी होणार आहे.