शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

यापुढे निवडणूक लढवणार नाही

By admin | Updated: April 15, 2017 01:10 IST

चंद्रकांतदादा पाटील : नेसरीत महासंपर्क अभियान कार्यक्रम उत्साहात

नेसरी : पक्षाकडून मी कधी आमदारकी मागितली नाही, कधी मंत्रिपद मागितले नाही. राज्यात नंबर २ चा नेता म्हणून पक्षाने विश्वास टाकला. मी तर सगळ्यात सुखी माणूस असेन, जेव्हा मोदीजी सांगतील की, बास, आपकी बहुत सेवा हुई, अब आपके घर मे आराम करो, तर मी ईश्वराची साधना आनंदात करण्यात वेळ घालवेन, असे प्रतिपादन करत कोणत्याही फळाची अपेक्षा न करता काम करा, असा सवाल देत मी येथून पुढे कुठलीही निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज येथे केली. नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे पं. दिनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी सोहळा, भाजप कार्यकर्ता मेळावा व नूतन जि. प. व पं. स. सदस्यांच्या संयुक्त सत्कार सोहळ्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे विभागीय संघटक रवी अनासपुरे होते. डॉ. प्रकाश शहापूरकर, मारुती राक्षे, गोपाळराव पाटील, प्रकाश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.येत्या वर्षभरात जिल्ह्यातील रखडलेले नऊ पाणी प्रकल्प मार्गी लावणार असून उचंगी, आंबेओहळ प्रकल्पात पुढच्या वर्षी पाणीसाठा होईल व जमीन संपादित केलेल्या शेतकऱ्यांना मे महिन्यात धनादेश देण्यात येणार असल्याची माहितीही दिली. आधीच्या सरकारने १५ वर्षांत २४ प्रकारच्या योजनांवर खर्च केला नाही, असा टोलाही यावेळी विरोधकांवर मारला.रवी अनासपुरे यांनी विविध योजनांची माहिती देत या योजनांचा लाभ कार्यकर्त्यांनी मिळवून द्यावा. बाबा देसाई म्हणाले, सगळीकडे आता कमळ फुलले आहे. भाजपचा विचार सर्वांना पटल्यामुळे आता विजय दूर नाही. तेव्हा २०१९ ला जिल्ह्यातील १० पैकी १० आमदार हे भाजपचेच असतील.जि. प. सदस्य अ‍ॅड. हेमंत कोलेकर यांनी स्वागत केले. यावेळी पं. स. सभापती जयश्री तेली, जगन्नाथ हुलजी, नूतन जि. प. सदस्य राणी खमलेट्टी, सुनीता रेडेकर, अनिता चौगुले, कल्लाप्पा भोगण, पं. स. सदस्य विठ्ठल पाटील, प्रकाश पाटील, आदींसह पदाधिकारी व लोकप्रतिनिधींचा मान्यवरांच्या हस्ते बुके व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी राजेंद्र तारळे, महादेव साखरे, एन. डी. पाटील, नामदेव पाटील, दयानंद चौगुले, बाबूराव पाटील, प्राचार्य डॉ. के. आर. पाटील, संग्रामसिंह शिंदे-नेसरीकर, प्राचार्य आर. बी. पाटील,यांच्यासह आजरा, चंदगड व गडहिंग्लज तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सामान्यांपर्यंत योजना पोहोचवाव्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक जनकल्याणकारी योजना आहेत. त्या फक्त कागदावर राहता कामा नयेत, तर त्याचा उपयोग गरजू व सर्वसामान्यांपर्यंत लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी पोहोचवाव्यात, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.