शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

यापुढे निवडणूक लढवणार नाही

By admin | Updated: April 15, 2017 01:10 IST

चंद्रकांतदादा पाटील : नेसरीत महासंपर्क अभियान कार्यक्रम उत्साहात

नेसरी : पक्षाकडून मी कधी आमदारकी मागितली नाही, कधी मंत्रिपद मागितले नाही. राज्यात नंबर २ चा नेता म्हणून पक्षाने विश्वास टाकला. मी तर सगळ्यात सुखी माणूस असेन, जेव्हा मोदीजी सांगतील की, बास, आपकी बहुत सेवा हुई, अब आपके घर मे आराम करो, तर मी ईश्वराची साधना आनंदात करण्यात वेळ घालवेन, असे प्रतिपादन करत कोणत्याही फळाची अपेक्षा न करता काम करा, असा सवाल देत मी येथून पुढे कुठलीही निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज येथे केली. नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे पं. दिनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी सोहळा, भाजप कार्यकर्ता मेळावा व नूतन जि. प. व पं. स. सदस्यांच्या संयुक्त सत्कार सोहळ्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे विभागीय संघटक रवी अनासपुरे होते. डॉ. प्रकाश शहापूरकर, मारुती राक्षे, गोपाळराव पाटील, प्रकाश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.येत्या वर्षभरात जिल्ह्यातील रखडलेले नऊ पाणी प्रकल्प मार्गी लावणार असून उचंगी, आंबेओहळ प्रकल्पात पुढच्या वर्षी पाणीसाठा होईल व जमीन संपादित केलेल्या शेतकऱ्यांना मे महिन्यात धनादेश देण्यात येणार असल्याची माहितीही दिली. आधीच्या सरकारने १५ वर्षांत २४ प्रकारच्या योजनांवर खर्च केला नाही, असा टोलाही यावेळी विरोधकांवर मारला.रवी अनासपुरे यांनी विविध योजनांची माहिती देत या योजनांचा लाभ कार्यकर्त्यांनी मिळवून द्यावा. बाबा देसाई म्हणाले, सगळीकडे आता कमळ फुलले आहे. भाजपचा विचार सर्वांना पटल्यामुळे आता विजय दूर नाही. तेव्हा २०१९ ला जिल्ह्यातील १० पैकी १० आमदार हे भाजपचेच असतील.जि. प. सदस्य अ‍ॅड. हेमंत कोलेकर यांनी स्वागत केले. यावेळी पं. स. सभापती जयश्री तेली, जगन्नाथ हुलजी, नूतन जि. प. सदस्य राणी खमलेट्टी, सुनीता रेडेकर, अनिता चौगुले, कल्लाप्पा भोगण, पं. स. सदस्य विठ्ठल पाटील, प्रकाश पाटील, आदींसह पदाधिकारी व लोकप्रतिनिधींचा मान्यवरांच्या हस्ते बुके व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी राजेंद्र तारळे, महादेव साखरे, एन. डी. पाटील, नामदेव पाटील, दयानंद चौगुले, बाबूराव पाटील, प्राचार्य डॉ. के. आर. पाटील, संग्रामसिंह शिंदे-नेसरीकर, प्राचार्य आर. बी. पाटील,यांच्यासह आजरा, चंदगड व गडहिंग्लज तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सामान्यांपर्यंत योजना पोहोचवाव्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक जनकल्याणकारी योजना आहेत. त्या फक्त कागदावर राहता कामा नयेत, तर त्याचा उपयोग गरजू व सर्वसामान्यांपर्यंत लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी पोहोचवाव्यात, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.