शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

नीतेश राणे : वळसंगमध्ये काँग्रेसचा प्रचार प्रारंभ,

By admin | Updated: February 11, 2017 23:32 IST

राज्य सरकार विश्वासघातकी भाजप-शिवसेनेवर टीका

संख : राज्यातील भाजप-शिवसेना सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यामध्ये अपयशी ठरलेले आहे. अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये, निवडणुकीच्या कालावधीमध्ये दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. हे सरकार विश्वासघातकी आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे. शेतकऱ्यांची कर्जे माफ करायला पैसे नहीत, मात्र उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये जाहिरनाम्यात कर्जमाफीचे आश्वासन दिलेले आहे. या सरकारची आर्थिक कुवत नाही, असा आरोप आ. नीतेश राणे यांनी केला.वळसंग (ता. जत) येथील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कॉँग्रेस प्रचार सभेत ते बोलत होते. प्रचाराचा प्रारंभ राणे यांच्याहस्ते करण्यात आला. स्वागत उपसरपंच मनीष चव्हाण यांनी केले, तर प्रास्ताविक उद्योगपती सतीश चव्हाण यांनी केले. सतीश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.आ. राणे म्हणाले की, निवडणुकीच्या प्रचारसभेमध्ये लोकांना आश्वासने दाखवून मते मिळविली. भोळ्याभाबड्या जनतेने आश्वासनाला बळी पडून परिवर्तन केले; पण अडीच वर्षात शेतकऱ्यांसाठी त्यांनी काहीच केलेले नाही. आत्महत्यांचे सत्र वाढत चालले आहे. त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. आता जाब विचारण्याची गरज आहे. आम्ही विधिमंडळात कर्जमाफी करण्यासाठी मागणी केली. परंतु कर्जमाफी करण्याची आर्थिक क्षमताच त्यांची राहिलेली नाही. राज्यात कोपर्डीसारखी घटना घडल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कायदा, सुव्यवस्था सुरक्षित राहिली आहे काय? असा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली.सध्याचे सरकार हे नालायक लोकांचे सरकार आहे, असे मी म्हणत नाही, तर सत्तेत सहभागी असलेले शिवसेनेचे उद्धव ठाकरेच म्हणतात. शिवसेनेचे मंत्री वर्षा बंगल्यावर भेटायला गेले होते. बाहेर येऊन राजीनाम्याचे पत्र दाखवितात. हा पोरखेळ चालविला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. बाळासाहेब ठाकरे असते तर तोंडावर राजीनामा फेकला असता. हे सत्तेत चिकटून बसलेले आहेत. कॉँग्रेसला सत्ता द्या. आम्ही मराठा, धनगर, लिंंगायत समाजाला आरक्षण देऊ. तालुक्यातील प्रश्न मार्गी लावू. कॉँग्रेसच्या पाठीमागे उभा राहण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.यावेळी जनसुराज्य पक्षाचे नेते बसवराज पाटील, विक्रम सावंत, नाना शिंदे यांची भाषणे झाली. कार्यक्रमास तालुका अध्यक्ष पी. एम. पाटील, माजी जि. प. सदस्य आप्पाराय्या बिरादार, माजी सभापती बाबासाहेब कोडग, नगराध्यक्ष इकबाल गवंडी, उपनगराध्यक्ष श्रीकांत शिंदे, पं. स. सदस्य प्रकाश भोसले, साहेबराव टोणे व जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार उपस्थित होते. उमाजीराव सनमडीकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)चौकशीची मागणीजत तालुक्यामध्ये एमआरजीएस योजनेमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून भ्रष्टाचारी लोकांना तुरुगांची हवा खायला पाठविले पाहिजे,अशी मागणी यावेळी राणे यांनी केली.