शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

नीतेश राणे : वळसंगमध्ये काँग्रेसचा प्रचार प्रारंभ,

By admin | Updated: February 11, 2017 23:32 IST

राज्य सरकार विश्वासघातकी भाजप-शिवसेनेवर टीका

संख : राज्यातील भाजप-शिवसेना सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यामध्ये अपयशी ठरलेले आहे. अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये, निवडणुकीच्या कालावधीमध्ये दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. हे सरकार विश्वासघातकी आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे. शेतकऱ्यांची कर्जे माफ करायला पैसे नहीत, मात्र उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये जाहिरनाम्यात कर्जमाफीचे आश्वासन दिलेले आहे. या सरकारची आर्थिक कुवत नाही, असा आरोप आ. नीतेश राणे यांनी केला.वळसंग (ता. जत) येथील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कॉँग्रेस प्रचार सभेत ते बोलत होते. प्रचाराचा प्रारंभ राणे यांच्याहस्ते करण्यात आला. स्वागत उपसरपंच मनीष चव्हाण यांनी केले, तर प्रास्ताविक उद्योगपती सतीश चव्हाण यांनी केले. सतीश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.आ. राणे म्हणाले की, निवडणुकीच्या प्रचारसभेमध्ये लोकांना आश्वासने दाखवून मते मिळविली. भोळ्याभाबड्या जनतेने आश्वासनाला बळी पडून परिवर्तन केले; पण अडीच वर्षात शेतकऱ्यांसाठी त्यांनी काहीच केलेले नाही. आत्महत्यांचे सत्र वाढत चालले आहे. त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. आता जाब विचारण्याची गरज आहे. आम्ही विधिमंडळात कर्जमाफी करण्यासाठी मागणी केली. परंतु कर्जमाफी करण्याची आर्थिक क्षमताच त्यांची राहिलेली नाही. राज्यात कोपर्डीसारखी घटना घडल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कायदा, सुव्यवस्था सुरक्षित राहिली आहे काय? असा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली.सध्याचे सरकार हे नालायक लोकांचे सरकार आहे, असे मी म्हणत नाही, तर सत्तेत सहभागी असलेले शिवसेनेचे उद्धव ठाकरेच म्हणतात. शिवसेनेचे मंत्री वर्षा बंगल्यावर भेटायला गेले होते. बाहेर येऊन राजीनाम्याचे पत्र दाखवितात. हा पोरखेळ चालविला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. बाळासाहेब ठाकरे असते तर तोंडावर राजीनामा फेकला असता. हे सत्तेत चिकटून बसलेले आहेत. कॉँग्रेसला सत्ता द्या. आम्ही मराठा, धनगर, लिंंगायत समाजाला आरक्षण देऊ. तालुक्यातील प्रश्न मार्गी लावू. कॉँग्रेसच्या पाठीमागे उभा राहण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.यावेळी जनसुराज्य पक्षाचे नेते बसवराज पाटील, विक्रम सावंत, नाना शिंदे यांची भाषणे झाली. कार्यक्रमास तालुका अध्यक्ष पी. एम. पाटील, माजी जि. प. सदस्य आप्पाराय्या बिरादार, माजी सभापती बाबासाहेब कोडग, नगराध्यक्ष इकबाल गवंडी, उपनगराध्यक्ष श्रीकांत शिंदे, पं. स. सदस्य प्रकाश भोसले, साहेबराव टोणे व जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार उपस्थित होते. उमाजीराव सनमडीकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)चौकशीची मागणीजत तालुक्यामध्ये एमआरजीएस योजनेमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून भ्रष्टाचारी लोकांना तुरुगांची हवा खायला पाठविले पाहिजे,अशी मागणी यावेळी राणे यांनी केली.