शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
4
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
5
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
6
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
7
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
8
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
9
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
10
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
11
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
12
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
13
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
14
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
15
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
16
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
17
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
18
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
19
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
20
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!

‘कारभाऱ्यां’च्या गावात ‘निर्मलग्राम’चा फज्जा

By admin | Updated: May 29, 2015 00:01 IST

तासगाव तालुक्यातील अवस्था : जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांची उदासीनता

दत्ता पाटील - तासगाव  विकास कामांच्या श्रेयवादासाठी चढाओढ करणाऱ्या कारभाऱ्यांच्या गावातच हागणदारीमुक्त योजनेचा फज्जा उडाल्याचे चित्र तासगाव तालुक्यात आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या उदासीन भूमिकेमुळे तालुक्यातील एकाही सदस्याचे गाव अद्यापपर्यंत हागणदारीमुक्त झालेले नाही. एवढेच नव्हे, तर आमदार आणि खासदारांच्या गावाचीही परिस्थिती निराशाजनकच आहे. तालुक्यातील केवळ तीन गावेच हागणदारीमुक्त झालेली आहेत. काही उदात्त हेतू समोर ठेवून आघाडी शासनाने हागणदारीमुक्त गाव योजना राबवली. पहिल्या टप्प्यात त्यास प्रतिसादही उत्तम मिळाला. सध्याच्या भाजप सरकारनेही त्यास प्रोत्साहन देत हागणदारीमुक्तीसाठी शौचालय उभारण्यासाठीच्या शासकीय अनुदानात वाढ केली आहे. यापूर्वी साडेचार हजार रूपये असणारे अनुदान आता बारा हजार रूपये करण्यात आले आहे. योजना प्रभावीपणे राबविली जावी, यासाठी शासकीय स्तरावरून मोठी प्रसिध्दी देण्यात आली. परंतु ही योजना राबविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये मात्र कमालीची उदासीनता आहे. कोणत्याच सदस्याने पुढाकार घेतला नाही. काही काळ भरारी पथकाच्या माध्यमातून हागणदारीमुक्तीसाठी प्रयत्न करण्यात आला. महिन्या-दोन महिन्यानंतर पुन्हा ही मोहीम थंंडावली. त्यानंतर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीन भूमिकेमुळे हागणदारीमुक्त गावाला खीळ बसली. तालुक्यातून जिल्हा परिषदेचे सहा आणि पंचायत समितीचे १२ सदस्य प्रतिनिधीत्व करत आहते. कवठेएकंद, मणेराजुरी, सावळज या तीन गावातून एकाच गावात दोन प्रतिनिधी आहेत. मात्र यापैकी एकाही सदस्याचे गाव हागणदारीमुक्त झालेले नाही.तासगाव तालुक्यात एकूण ६८ गावे आहेत. त्यापैकी केवळ तीनच गावे हागणदारीमुक्त झालेली आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीतून मिळणारा विकास निधी आपल्या मतदारसंघाला जास्त मिळावा, वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ आपल्याच मतदार संघात मिळावा, यासाठी बहुतांश सदस्यांचा अट्टाहास चाललेला असतो. परंतु लोकांचे प्रबोधन करून त्यांना शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहित करताना मात्र हे सदस्य दिसून येत नाहीत.खासदार-आमदारांची गावेही मागेच...गाव निर्मल व्हावे, स्वच्छता राहावी, ग्रामजीवन एका विशिष्ट दर्जाचे बनावे, गावोगावी सुधारणांचे वारे पोहोचावे, या हेतूृने निर्मलग्राम योजना राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. तालुक्याचे नेते आर. आर. पाटील यांनी ग्रामविकासमंत्री असताना उभारलेल्या कामातूनच या योजनेची सुरूवात झाली. मात्र सध्या त्यांच्याच तालुक्यात लोकप्रतिनिधींची उदासीनता दिसून येत आहे. हागणदारीमुक्त ग्राम योजनेत सदस्यांबरोबरच आमदार, खासदार यांच्या गावातही निराशाजनक कामगिरी आहे. आमदार सुमनताई पाटील यांच्या अंजनी गावात १३७ कुटुंबांकडे, तर खासदार संजय पाटील यांच्या चिंंचणी गावात ६४९ कुटुंबांकडे अद्यापही शौचालय नाही. माजी समाजकल्याण सभापती आणि जिल्हा परिषद सदस्या छाया खरमाटे यांचा मतदारसंघ असणारे विसापूर हे गाव तर सर्वात पिछाडीवर असून, या गावात एकूण १ हजार ३१८ कुटुंबांपैकी अद्याप १ हजार २ कुटुंबांकडे शौचालय नाही.जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या गावात...जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य म्हणून मिरवणाऱ्या जवळपास सर्वच नेत्यांच्या गावात शौचालय नसलेल्या कुटुंबांची संख्या मोठी आहे. चिंचणीत ६४९, अंजनीत १३७, बोरगाव-४४४, डोंगरसोनी-४९२, हातनूर-३०५, कवठेएकंद-१७४, मणेराजुरी-४३०, मांजर्डे-८३०, नागाव (नि.) -२१८, पेड-७३१, सावळज-६८२, सावर्डे-४१०, तुरची-१९७, विसापूर-१००२, वंजारवाडी-६२, तर येळावीतील ७१८ कुटुंबांकडे शौचालय नाही.गावापेक्षा वाडी सरस वाडीपेक्षा गावे सुधारलेली असतात, असा पूर्वापार समज आहे. मात्र हागणदारीमुक्त गावांची आकडेवारी पाहिल्यास ‘गावापेक्षा वाडी सरस’ असेच चित्र आहे. तालुक्यातील गोटेवाडी, कचरेवाडी, नागेवाडी या वाड्या हागणदारीमुक्त झालेल्या आहेत, तर इतरही वाड्यांवरील शौचालयांची टक्केवारीही गावांपेक्षा सरस आहे. त्यामुळे या वाड्यांचा आदर्श घेऊन गावेही हागणदारी मुक्तीच्या दिशेने वाटचाल करतील, अशीही अपेक्षा आहे.