शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘कारभाऱ्यां’च्या गावात ‘निर्मलग्राम’चा फज्जा

By admin | Updated: May 29, 2015 00:01 IST

तासगाव तालुक्यातील अवस्था : जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांची उदासीनता

दत्ता पाटील - तासगाव  विकास कामांच्या श्रेयवादासाठी चढाओढ करणाऱ्या कारभाऱ्यांच्या गावातच हागणदारीमुक्त योजनेचा फज्जा उडाल्याचे चित्र तासगाव तालुक्यात आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या उदासीन भूमिकेमुळे तालुक्यातील एकाही सदस्याचे गाव अद्यापपर्यंत हागणदारीमुक्त झालेले नाही. एवढेच नव्हे, तर आमदार आणि खासदारांच्या गावाचीही परिस्थिती निराशाजनकच आहे. तालुक्यातील केवळ तीन गावेच हागणदारीमुक्त झालेली आहेत. काही उदात्त हेतू समोर ठेवून आघाडी शासनाने हागणदारीमुक्त गाव योजना राबवली. पहिल्या टप्प्यात त्यास प्रतिसादही उत्तम मिळाला. सध्याच्या भाजप सरकारनेही त्यास प्रोत्साहन देत हागणदारीमुक्तीसाठी शौचालय उभारण्यासाठीच्या शासकीय अनुदानात वाढ केली आहे. यापूर्वी साडेचार हजार रूपये असणारे अनुदान आता बारा हजार रूपये करण्यात आले आहे. योजना प्रभावीपणे राबविली जावी, यासाठी शासकीय स्तरावरून मोठी प्रसिध्दी देण्यात आली. परंतु ही योजना राबविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये मात्र कमालीची उदासीनता आहे. कोणत्याच सदस्याने पुढाकार घेतला नाही. काही काळ भरारी पथकाच्या माध्यमातून हागणदारीमुक्तीसाठी प्रयत्न करण्यात आला. महिन्या-दोन महिन्यानंतर पुन्हा ही मोहीम थंंडावली. त्यानंतर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीन भूमिकेमुळे हागणदारीमुक्त गावाला खीळ बसली. तालुक्यातून जिल्हा परिषदेचे सहा आणि पंचायत समितीचे १२ सदस्य प्रतिनिधीत्व करत आहते. कवठेएकंद, मणेराजुरी, सावळज या तीन गावातून एकाच गावात दोन प्रतिनिधी आहेत. मात्र यापैकी एकाही सदस्याचे गाव हागणदारीमुक्त झालेले नाही.तासगाव तालुक्यात एकूण ६८ गावे आहेत. त्यापैकी केवळ तीनच गावे हागणदारीमुक्त झालेली आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीतून मिळणारा विकास निधी आपल्या मतदारसंघाला जास्त मिळावा, वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ आपल्याच मतदार संघात मिळावा, यासाठी बहुतांश सदस्यांचा अट्टाहास चाललेला असतो. परंतु लोकांचे प्रबोधन करून त्यांना शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहित करताना मात्र हे सदस्य दिसून येत नाहीत.खासदार-आमदारांची गावेही मागेच...गाव निर्मल व्हावे, स्वच्छता राहावी, ग्रामजीवन एका विशिष्ट दर्जाचे बनावे, गावोगावी सुधारणांचे वारे पोहोचावे, या हेतूृने निर्मलग्राम योजना राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. तालुक्याचे नेते आर. आर. पाटील यांनी ग्रामविकासमंत्री असताना उभारलेल्या कामातूनच या योजनेची सुरूवात झाली. मात्र सध्या त्यांच्याच तालुक्यात लोकप्रतिनिधींची उदासीनता दिसून येत आहे. हागणदारीमुक्त ग्राम योजनेत सदस्यांबरोबरच आमदार, खासदार यांच्या गावातही निराशाजनक कामगिरी आहे. आमदार सुमनताई पाटील यांच्या अंजनी गावात १३७ कुटुंबांकडे, तर खासदार संजय पाटील यांच्या चिंंचणी गावात ६४९ कुटुंबांकडे अद्यापही शौचालय नाही. माजी समाजकल्याण सभापती आणि जिल्हा परिषद सदस्या छाया खरमाटे यांचा मतदारसंघ असणारे विसापूर हे गाव तर सर्वात पिछाडीवर असून, या गावात एकूण १ हजार ३१८ कुटुंबांपैकी अद्याप १ हजार २ कुटुंबांकडे शौचालय नाही.जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या गावात...जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य म्हणून मिरवणाऱ्या जवळपास सर्वच नेत्यांच्या गावात शौचालय नसलेल्या कुटुंबांची संख्या मोठी आहे. चिंचणीत ६४९, अंजनीत १३७, बोरगाव-४४४, डोंगरसोनी-४९२, हातनूर-३०५, कवठेएकंद-१७४, मणेराजुरी-४३०, मांजर्डे-८३०, नागाव (नि.) -२१८, पेड-७३१, सावळज-६८२, सावर्डे-४१०, तुरची-१९७, विसापूर-१००२, वंजारवाडी-६२, तर येळावीतील ७१८ कुटुंबांकडे शौचालय नाही.गावापेक्षा वाडी सरस वाडीपेक्षा गावे सुधारलेली असतात, असा पूर्वापार समज आहे. मात्र हागणदारीमुक्त गावांची आकडेवारी पाहिल्यास ‘गावापेक्षा वाडी सरस’ असेच चित्र आहे. तालुक्यातील गोटेवाडी, कचरेवाडी, नागेवाडी या वाड्या हागणदारीमुक्त झालेल्या आहेत, तर इतरही वाड्यांवरील शौचालयांची टक्केवारीही गावांपेक्षा सरस आहे. त्यामुळे या वाड्यांचा आदर्श घेऊन गावेही हागणदारी मुक्तीच्या दिशेने वाटचाल करतील, अशीही अपेक्षा आहे.