शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

घरभेटीतून ‘निर्मल ग्राम’चे प्रबोधन

By admin | Updated: August 27, 2016 00:48 IST

सुषमा देसाई : २ आॅक्टोबरपर्यंत जिल्हा शौचालययुक्त करणार; लोकप्रतिनिधींचा सहभाग

कोल्हापूर : जिल्हा ८९ टक्के निर्मल ग्राम झाला असून, २ आॅक्टोबरपर्यंत संपूर्ण जिल्हा शौचालययुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, त्यासाठी घरभेटीच्या माध्यमातून प्रबोधन करणार आहे. यामध्ये मंत्री, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. राज्यातील सर्वांत जास्त निर्मल ग्रामपंचायती म्हणून कोल्हापूर जिल्ह्याचा गौरव झाला आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामुळे केंद्र शासनाच्या पातळीवरही जिल्ह्याने कामाचा ठसा उमटविला. केंद्र सरकारने जून २०१५ मध्ये ‘स्वच्छ भारत’ मोहिमेअंतर्गत ‘शौचालययुक्त गावा’ची संकल्पना नव्याने मांडली. सध्या जिल्ह्यात ६४९ ग्रामपंचायती निर्मल झाल्या आहेत. ३८० ग्रामपंचायती २ आॅक्टोबरपूर्वी निर्मल करण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्हा ९७ टक्के निर्मलग्राम असतानाही जिल्ह्यातील १ लाख २९ हजार ८०८ कुटुंबांकडे शौचालय नसल्याचे निदर्शनास आले असून, यापैकी ५८ हजार शौचालये बांधण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी तालुकानिहाय ‘घरभेटी’चे नियोजन केले असून, सहा हजार घरभेटी पूर्ण केल्या आहेत. या भेटींत हस्तपत्रिका वाटप करून शौचालय नसणाऱ्या घरांवर ‘रेड स्टिकर्स’ लावली जाणार आहेत. या भेटीत मंत्रिमहोदयांसह लोकप्रतिनिधींनीही सहभागी व्हावे, असे अभिप्रेत असल्याचे सुषमा देसाई यांनी सांगितले. (प्रतिनिधी)‘स्वच्छ भारत’ मिशनअंतर्गत २ आॅक्टोबरपर्यंत जिल्हा शौचालययुक्त करण्याचा संकल्प असून यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.- चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्रीबारा हजारांचे अनुदान!शौचालय बांधणाऱ्या लाभार्थ्याला बारा हजारांचे अनुदान दिले जाणार आहे. अनुदानामध्ये केंद्र सरकारचा ६० टक्के, तर राज्य सरकारचा ४० टक्के वाटा राहणार असून, वर्षभरात आठ कोटींचे अनुदान दिल्याचे सुषमा देसाई यांनी सांगितले.