शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दुहेरी खूनप्रकरणी कोल्हापुरातील नऊ जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:21 IST

कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून व पैसे देवघेणीच्या वादातून टेंबलाई रेल्वे उड्डाणपूल परिसरात पाठलाग करून तलवार, चाकू, कोयता अशा प्राणघातक हत्याराने ...

कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून व पैसे देवघेणीच्या वादातून टेंबलाई रेल्वे उड्डाणपूल परिसरात पाठलाग करून तलवार, चाकू, कोयता अशा प्राणघातक हत्याराने दोघा तरुणांचा निर्घृण खून केल्याप्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी दहा पैकी नऊ जणांना दोषी ठरवले. त्यांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जयदीप उर्फ हणामा राजू चव्हाण (वय ३५), साहिल उर्फ घायल लक्ष्मण कावळे (३२ दोघेही रा. टेंबलाई झोपडपट्टी, रेल्वे फाटक), रियाज उर्फ काल्या सदरू देसाई (३८), विशाल सागर गिरी (२७), फारुक अहमद शेख (३४), सद्दामहुसेन नजीर देसाई (३०), इम्रान राजू मुजावर (३०), रोहित सुधीर कांबळे (२८, सर्व रा. विक्रमनगर), धनाजी वसंतराव मिसाळ,(रा. राजेंद्रनगर) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. जोशी यांनी शिक्षा ठोठावली. सरकारपक्षातर्फे सहायक सरकारी वकील मंजूषा बी. पाटील यांनी काम पाहिले.

याप्रकरणी नितीन महादेव शिंदे (वय २९, रा. राजारामपुरी १३वी गल्ली) व समीर सिराज खाटीक (वय २१, रा. टेंबलाईनगर झोपडपट्टी, रेल्वेफाटक) अशी खून झालेल्यांची नावे आहेत. तब्बल सात वर्षांनी खटल्याचा निकाल लागल्याने जिल्ह्याचे खटल्याकडे लक्ष लागले होते. प्रत्यक्षदर्शी पुरावा नसल्याने अमोल नंदकुमार हळदकर याची निर्दोष मुक्तता झाली.

खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की, समीर खाटीक व आरोपी घायल कवाळे हे दोघे शेजारी राहतात. त्यांच्यात किरकोळ कारणांवरून वादावादी झाल्याने एकमेकांवर राग होता. दरम्यान, नितीन शिंदे व समीर खाटीक यांच्या रमी क्लबवरील कामगार अमित हेगडे याने आरोपी हणमा चव्हाण याच्याकडून पैसे व्याजाने घेतले होते. ते परतफेडीवरून हणमा चव्हाण याने हेगडेसोबत दि. ३१ जानेवारी २०१४ रोजी बैठक घेतली. बैठकीत मध्यस्ती करणारा नितीन शिंदे याच्याशी वादावादी झाली. त्याबाबत हेगडे याने चव्हाण याच्याविरोधात राजारामपुरी पोलिसांत तक्रार दिली. तक्रार देताना हेगडे हा सोबत शिंदे होता. त्यानंतर दि. २ फेब्रुवारी २०१४ रोजी रात्री उशिरा नितीन शिंदे व समीर खाटीक हे टेंबलाई रेल्वेफाटक, उड्डाण पूुल परिसरात थांबले होते. त्यावेळी हणमा चव्हाण याच्यासह दहा जण चारचाकी वाहनातून चौकात आले. त्यावेळी तलवार, चॉपर, चाकू अशा हत्यारासह त्यांनी नितीन शिंदे व समीर खाटीक यांचा पाठलाग करून सपासप वार करून दगडाने ठेचून त्यांचा निर्घृण खून केला.

खटल्यात, एकूण ३४ साक्षीदार तपासले. यामध्ये तिघे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, दोन पोलीस, तीन वैद्यकीय अधिकारी आदींच्या साक्षी व सहायक सरकारी वकील एम. बी. पाटील यांचा युक्तिवाद महत्त्वपूर्ण ठरला. त्यातून नऊ आरोपींना न्यायाधीशांनी दोषी ठरवले. या सर्वांना कट रचणे, संघटित गैरप्रकार करणे, निर्घृण खून करणे या गुन्ह्याखाली मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पो. नि. नवनाथ घुगरे, उपनिरीक्षक विकास जाधव, किशोर डोंगरे, बाजीराव सूर्यवंशी, दिवंगत पोलीस विजय घाटगे, पैरवी अधिकारी मारुती नाईक, अशोक शिंदे यांनी केला.

मोठ्या संख्येने शिक्षा होण्याची दुसरी घटना

यापूर्वी पाचगावमधील अशोक पाटील याच्या खूनप्रकरणी सहा वर्षांपूर्वी न्यायालयाने दोन्ही गटांच्या तब्बल आठ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर शनिवारी दुहेरी खूनप्रकरणी सुमारे नऊ जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यामुळे मोठ्या संख्येने आरोपींना शिक्षा होण्याची जिल्ह्यातील ही दुसरी वेळ होय.

आरोपी ‘व्हिसी’द्वारे न्यायालयात हजर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व आरोपींना कारागृह प्रशासनाने दक्षता घेत शनिवारी खटल्याच्या निकालावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर केले.

नातेवाइकांचा आक्रोश

निकाल ऐकण्यासाठी आरोपींचे नातेवाइकांनी तसेच मित्रांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा जाहीर केल्याची माहिती मिळताच नातेवाइकांनी न्यायालय परिसरात आक्रोश केला.

फोटो पाठवत आहे.....