शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

‘व्हॉट्सअॅपवरील तक्रार’ उपक्रमाचे नव्याचे नऊ दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:27 IST

समीर देशपांडे कोल्हापूर : जिल्हा परिषदेतील पदाधिकारी आणि अधिकारी बदलले की त्यांचे प्राधान्यक्रम बदलतात. नवी निवड झाली किंवा ...

समीर देशपांडे

कोल्हापूर : जिल्हा परिषदेतील पदाधिकारी आणि अधिकारी बदलले की त्यांचे प्राधान्यक्रम बदलतात. नवी निवड झाली किंवा बदली होऊन नवे अधिकारी आले की थोड्या दिवसांत काही उपक्रम जाहीर केलेे जातात. परंतु नंतर ते बंद पडतात. ‘व्हॉट्सअॅपवरील तक्रार’ या उपक्रमाची हीच अवस्था झाली आहे. गेल्या दोन वर्षांत असा काही उपक्रम होता हेही आता कोणाच्या लक्षात राहिलेले नाही.

जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रविकांत आडसूळ हजर झाल्यानंतर त्यांनी ‘दिव्यांग उन्नती अभियान’ यशस्वी केले. त्यानंतर त्यांनी ‘व्हॉट्सअॅपवर तक्रार’ हा उपक्रम सुरू केला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या कामकाजाबाबत काही तक्रार असल्यास ती ८६०५२७९९०० या व्हॉटस्अॅप क्रमांकावर पाठवायची. त्याची दखल घेऊन संबंधित तक्रारी सामान्य प्रशासन विभागाकडून त्या त्या विभागाला पाठवल्या जायच्या व त्याबाबत पुढील कार्यवाही केली जात होती.

हा उपक्रम जाहीर झाल्यानंतर काही महिने या क्रमांकावर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाऊ लागली. त्यावर कार्यवाही होऊ लागली. प्रशासनाच्या नियमित बैठकांमध्ये आढावाही घेतला जाऊ लागला. मात्र रविकांत आडसूळ यांच्या बदलीनंतर हा उपक्रमच मागे पडला. दरम्यानच्या काळात कोरोनाची दुसरी लाटही सुरू झाली. अनेक विषयांप्रमाणे हा उपक्रम जिल्हा परिषदेने सुरू केला होता हे देखील कोणाच्या आता लक्षात नाही.

चौकट

सगळेच नवीन

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शौमिका महाडिक असताना हा उपक्रम सुरू झाला. त्यानंतर बजरंग पाटील अध्यक्ष बनले. तर आता राहुल पाटील अध्यक्ष आहेत. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल होते आता संजयसिंह चव्हाण आहेत. आडसूळ यांच्या ठिकाणी मनीषा देसाई उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सामान्य प्रशासनकडे कार्यरत आहेत. मग जुन्या उपक्रमाचा आग्रह धरणार तरी कोण, असा प्रश्न उपस्थित होतो.

कोट

असा उपक्रम जिल्हा परिषदेने सुरू केला होता. परंतु त्याचे नंतर काय झाले हे समजले नाही. जर नागरिकांचा या उपक्रमाला प्रतिसाद मिळत होता तर हा उपक्रम पुन्हा सुरू करावा.

राजवर्धन निंबाळकर

जिल्हा परिषद सदस्य

चौकट

व्हॉट्सअॅपवरून मिळालेल्या एकूण तक्रारी १२३

निर्गत झालेल्या तक्रारी ८८

प्रलंबित तक्रारी ३५

चौकट

सर्वाधिक तक्रारी ग्रामपंचायतींबद्दल

एकूण दाखल १२३ तक्रारींपैकी सर्वाधिक ४१ तक्रारी ग्रामपंचायत विभागाकडे दाखल झाल्या आहेत. यातील २७ तक्रारींची निर्गत करण्यात आली असून १४ प्रलंबित आहेत. ग्रामपंचायतींच्या गैरकारभाराबाबत यातील बहुतांशी तक्रारी आहेत.