शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘निनाई’प्रश्नी जिल्हा बँकेकडून फौजदारीची तयारी

By admin | Updated: May 12, 2015 00:41 IST

तारण जमिनीची विक्री : राज्य बँक, दालमिया कंपनीविरोधात तक्रार

सांगली : करुंगली-आरळा (ता. शिराळा) येथील निनाईदेवी सहकारी साखर कारखान्याची जिल्हा बँकेकडे असलेली १४.७० हेक्टर तारण जमीन राज्य बँकेने परस्पर दालमिया ग्रुपला विक्री केल्याप्रकरणी जिल्हा बँकेकडून राज्य बँक व दालमिया शुगर कंपनीविरोधात येथील जिल्हा न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्यात येणार आहे. त्याबाबतची तयारी बँकेमार्फत सुरू झाली आहे. स्थानिक पोलिसांनीही याबाबत तक्रार देऊनही संबंधितांवर गुन्हा दाखल केला नसल्याने जिल्हा बँकेचे अधिकारी याबाबतची तक्रार ऋण न्याय प्राधिकरणाकडे करणार आहेत.करुंगली-आरळा येथील निनाईदेवी सहकारी साखर कारखान्याला जिल्हा बँकेने २००१ मध्ये ८ कोटी ७० लाखांचे कर्ज दिले होते. सहभाग योजनेतून तीन कोटी रुपये आणि ऊस तोडणीसाठी वाहतूक उचल म्हणून सुमारे चार कोटी रुपये देण्यात आले आहेत. कर्जापोटी जिल्हा बँकेकडे कारखान्याने १४.६५ हेक्टर गायरान जमीन तारण दिली होती. याच कारखान्याला राज्य बँकेनेही सहभाग योजनेतून १४ कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. याच कर्जाच्या वसुलीसाठी राज्य सहकारी बँकेने हा कारखाना परस्पर दालमिया कंपनीला विकला. यामध्ये जिल्हा बँकेकडे तारण असलेल्या जमिनीचाही समावेश होता. जिल्हा बँकेने या प्रकरणी दालमिया कंपनी आणि राज्य सहकारी बँकेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिका दाखल करतानाच जिल्हा बँकेने स्थानिक पोलिसांकडे संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत फिर्याद दिली होती. पोलिसांनीही अद्याप या तक्रारीची दखल घेतलेली नाही. त्यामुळे पुन्हा न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्याची तयारी जिल्हा बँकेने केली आहे. जिल्हा बँकेमार्फत ‘निनाईदेवी’कडील कर्जवसुलीची प्रक्रिया सुरू असतानाच राज्य बँकेने विक्रीचा व्यवहार केल्याने बँकेसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. जिल्हा बँकेकडे तारण असलेली जमीन परस्पर दालमिया कंपनीच्या ताब्यात देण्याच्या या प्रकाराबाबत आता स्थानिक न्यायालयासह ऋण न्याय प्राधिकरणाकडेही तक्रार करणार असल्याचे जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पुन्हा एकदा ‘निनाईदेवी’च्या कर्जवसुलीचा मुद्दा गाजणार आहे. हा कारखाना राज्य बँकेने दालमिया कंपनीस २४ कोटी रुपयांना विकला आहे. (प्रतिनिधी)सशर्त परवानगीडिसेंबर महिन्यात उच्च न्यायालयाने दालमिया कंपनीला कारखान्याच्या गळीत हंगामासाठी सशर्त परवानगी दिली होती. गळीत हंगामासाठी ताब्यात आलेल्या कारखान्याच्या कोणत्याही जागेवर कर्ज न काढणे, त्यावर बोजा न चढविणे, परस्पर विक्री न करणे, अशा गोष्टींची बंधने घालण्यात आली आहेत.