शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

‘निनाई’प्रश्नी जिल्हा बँकेकडून फौजदारीची तयारी

By admin | Updated: May 12, 2015 00:41 IST

तारण जमिनीची विक्री : राज्य बँक, दालमिया कंपनीविरोधात तक्रार

सांगली : करुंगली-आरळा (ता. शिराळा) येथील निनाईदेवी सहकारी साखर कारखान्याची जिल्हा बँकेकडे असलेली १४.७० हेक्टर तारण जमीन राज्य बँकेने परस्पर दालमिया ग्रुपला विक्री केल्याप्रकरणी जिल्हा बँकेकडून राज्य बँक व दालमिया शुगर कंपनीविरोधात येथील जिल्हा न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्यात येणार आहे. त्याबाबतची तयारी बँकेमार्फत सुरू झाली आहे. स्थानिक पोलिसांनीही याबाबत तक्रार देऊनही संबंधितांवर गुन्हा दाखल केला नसल्याने जिल्हा बँकेचे अधिकारी याबाबतची तक्रार ऋण न्याय प्राधिकरणाकडे करणार आहेत.करुंगली-आरळा येथील निनाईदेवी सहकारी साखर कारखान्याला जिल्हा बँकेने २००१ मध्ये ८ कोटी ७० लाखांचे कर्ज दिले होते. सहभाग योजनेतून तीन कोटी रुपये आणि ऊस तोडणीसाठी वाहतूक उचल म्हणून सुमारे चार कोटी रुपये देण्यात आले आहेत. कर्जापोटी जिल्हा बँकेकडे कारखान्याने १४.६५ हेक्टर गायरान जमीन तारण दिली होती. याच कारखान्याला राज्य बँकेनेही सहभाग योजनेतून १४ कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. याच कर्जाच्या वसुलीसाठी राज्य सहकारी बँकेने हा कारखाना परस्पर दालमिया कंपनीला विकला. यामध्ये जिल्हा बँकेकडे तारण असलेल्या जमिनीचाही समावेश होता. जिल्हा बँकेने या प्रकरणी दालमिया कंपनी आणि राज्य सहकारी बँकेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिका दाखल करतानाच जिल्हा बँकेने स्थानिक पोलिसांकडे संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत फिर्याद दिली होती. पोलिसांनीही अद्याप या तक्रारीची दखल घेतलेली नाही. त्यामुळे पुन्हा न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्याची तयारी जिल्हा बँकेने केली आहे. जिल्हा बँकेमार्फत ‘निनाईदेवी’कडील कर्जवसुलीची प्रक्रिया सुरू असतानाच राज्य बँकेने विक्रीचा व्यवहार केल्याने बँकेसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. जिल्हा बँकेकडे तारण असलेली जमीन परस्पर दालमिया कंपनीच्या ताब्यात देण्याच्या या प्रकाराबाबत आता स्थानिक न्यायालयासह ऋण न्याय प्राधिकरणाकडेही तक्रार करणार असल्याचे जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पुन्हा एकदा ‘निनाईदेवी’च्या कर्जवसुलीचा मुद्दा गाजणार आहे. हा कारखाना राज्य बँकेने दालमिया कंपनीस २४ कोटी रुपयांना विकला आहे. (प्रतिनिधी)सशर्त परवानगीडिसेंबर महिन्यात उच्च न्यायालयाने दालमिया कंपनीला कारखान्याच्या गळीत हंगामासाठी सशर्त परवानगी दिली होती. गळीत हंगामासाठी ताब्यात आलेल्या कारखान्याच्या कोणत्याही जागेवर कर्ज न काढणे, त्यावर बोजा न चढविणे, परस्पर विक्री न करणे, अशा गोष्टींची बंधने घालण्यात आली आहेत.