शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

नीलेवाडीकरांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:17 IST

नवे पारगाव : हातकणंगले तालुक्यातील नीलेवाडीला महापुराने विळखा घातला आहे.शुक्रवारी रात्रीपर्यंत सुमारे दीड हजार नागरिकांचे स्थलांतर झाले. अद्याप शंभरभर ...

नवे पारगाव : हातकणंगले तालुक्यातील नीलेवाडीला महापुराने विळखा घातला आहे.शुक्रवारी रात्रीपर्यंत सुमारे दीड हजार नागरिकांचे स्थलांतर झाले. अद्याप शंभरभर लोक महापुरात अडकले आहेत.

आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाच्या साध्या दोन बोटीमधून नागरिक बाहेर काढण्याचे काम आज दिवसभर सुरु होते. वाढत्या महापुराने त्या बोटी भरकटू लागल्यामुळे आज रात्री नागरिकांना बाहेर काढण्याचे काम बंद करण्यात आले. आमदार राजूबाबा आवळे यांनी जिल्हा प्रशासनाला याबाबतची माहिती दिली असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापनकडून एनडीआरएफची टीम आल्यानंतरच या लोकांना बाहेर काढणे शक्य होणार आहे. गावातील घाटगेमळा, शिवाजी पुतळा परिसर व मोहिते गल्लीच्या उंचवट्याच्या ठिकाणी हे लोक गटागटाने मदतीची प्रतीक्षा करत बसले आहेत. शेतकऱ्यांची जनावरे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत. शेवटी जनावरांची दावी कापून त्यांना जड अंतकरणाने शेतकऱ्यांनी मुक्त केले आहे. त्यांचे पशुधन आता नशिबाच्या हवाली केले आहे. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हे नागरिक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

२३ निलेवाडी पूर