शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

साहित्यातून निकोप समाज घडावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:22 IST

पेरणोली : ललित लेखन तहान भूक विसरायला लावते. लेखक हा कलावंत असतो. साहित्य म्हणजे समाज मनाचा आरसा असून नव्या ...

पेरणोली :

ललित लेखन तहान भूक विसरायला लावते. लेखक हा कलावंत असतो. साहित्य म्हणजे समाज मनाचा आरसा असून नव्या लेखकांनी साहित्यातून निकोप समाज घडवावा, असे मत लेखक प्रा. सुभाष कोरे यांनी व्यक्त केले.

आजरा येथे लेखिका अश्विनी व्हरकट-सावंत यांच्या आठवणीच्या हिंदोळ्यावर या पुस्तकाचे प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. राजीव टोपले होते.

कोरे म्हणाले, अलिकडे वाचन वाढत आहे. त्यामुळे वास्तवातील समस्या मांडल्या पाहिजे. साहित्य मनोरंजनासाठी नसून समाज जागृतीसाठी परखड लिहावे

कॉ. संपत देसाई म्हणाले, लेखक बाळ सावंत यांचा वारसा अश्विनी यांनी जपला आहे. पुस्तकात ग्रामीण भागातील अंतरंगाचा व महिलांच्या मनातील स्पंदनांचा उलगडा केला आहे.

लेखिका अश्विनी व्हरकट-सावंत यांनी पुस्तकाची भूमिका मांडली. यावेळी जि.प. सदस्य जीवन पाटील, पांडुरंग लोंढे, शुभांगी निकम, डॉ. सागर वांद्रे, संतराम केसरकर, सुनीता खाडे यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी सरपंच उषा जाधव, उपसरपंच उत्तम देसाई, के.व्ही. पाटील, आनंदराव व्हरकट, संकेत सावंत, जयवंत चोरगे, सचिन सावंत, रवींद्र खैरे, नीलेश घाटगे, शैलेश मुळीक आदी उपस्थित होते. दयानंद भंडारे यांनी सूत्रंसचालन केले. अमर सावंत यांनी आभार मानले.

--------------------------

* फोटो ओळी : आजरा येथे आठवणीच्या हिंदोळ्यावर या पुस्तकाचे प्रकाशन करताना सुभाष कोरे, लेखिका अश्विनी व्हरकट-सावंत, सरपंच उषा जाधव, कॉ. संपत देसाई, उपप्राचार्य राजीव टोपले, जीवन पाटील, पांडुरंग लोंढे आदी उपस्थित होते.

क्रमांक : ०४०४२०२१-गड-०८