शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

पुढील लक्ष्य ‘महापौर’पद महादेवराव महाडिक : राजाराम साखर कारखान्यावर भाजपा-ताराराणीच्या नगरसेवकांचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 01:32 IST

कसबा बावडा : कोल्हापुरात आता रामराज्याची सुरुवात झाली असून, येणारा महापौर आपला असेल, असे उद्गार माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी येथे काढले.

कसबा बावडा : कोल्हापुरात आता रामराज्याची सुरुवात झाली असून, येणारा महापौर आपला असेल, असे उद्गार माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी येथे काढले. छत्रपती राजाराम साखर कारखान्यावर नूतन स्थायी सभापती आशिष ढवळे तसेच भाजपा व ताराराणी आघाडीचे नगरसेवक, प्रमुख कार्यकर्ते भेटण्यास आल्यानंतर ते बोलत होते. यावेळी महाडिक यांनी ढवळे यांना उचलून आनंद व्यक्त केला. याप्रसंगी आमदार अमल महाडिक उपस्थित होते.

ते म्हणाले, रामराज्यामध्ये कधीही कोणावरही अन्याय, अत्याचार झाला नव्हता. आता सर्वांनी असाच एकोपा ठेवावा व काम करावे. स्थायीनंतर आता पुढील लक्ष्य महापौरपद असून, त्यातही भाजपा-ताराराणीचाच झेंडा फडकविण्यासाठी सर्वांनी आतापासून कामाला लागावे, असेही ते म्हणाले. यावेळी भाजपा-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी कारखान्यावर जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाच्या उधळणीबरोबरच माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या जयघोषाच्या घोषणा देऊन नगरसेवक व कार्यकर्त्यांनी हा परिसर दणाणून सोडला.यावेळी गटनेते सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, शेखर कुसाळे, किरण नकाते, सीमा कदम, रुपाराणी निकम, शशिकांत भालकर, वैभव माने, संतोष गायकवाड, स्वप्निल नाईकनवरे, सुनंदा मोहिते, सविता घोरपडे, गीता गुरव, आदी उपस्थित होते.ढवळे दुसºयांदा सभापतीमहापालिकेच्या आर्थिक नाड्या असलेल्या स्थायी समितीच्या सभापतिपदी एकदा निवड व्हावी, अशी अनेक नगरसेवकांची तीव्र इच्छा असते. अनेकांना प्रयत्न करूनही हे पद मिळत नाही; परंतु आशिष ढवळे यांना आठ वर्षांत दुसºयांदा सभापती होण्याचा मान मिळाला. यापूर्वी सन २०१० मध्ये जनसुराज्य पक्षाच्यावतीने त्यांना प्रथम सभापती होण्याची संधी दिली होती. त्यानंतर सोमवारी ‘भाजपा’कडून संधी मिळाली. ढवळे प्रभाग क्रमांक १६ शिवाजी पार्क येथून निवडून आले आहेत. एक शांत, सुशिक्षित व अभ्यास नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. सन २०१५ मध्ये झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत राष्टÑवादीचे शहराध्यक्ष राजेश लाटकर यांचा त्यांनी पराभव केला होता. शहरातील पाण्याच्या गळतीमुळे होणारे नुकसान, एलईडी बल्बमुळे होणारी बचत याचे अभ्यासपूर्ण विवेचन करून ढवळे यांनी प्रशासनाचे डोळे उघडले होते.सुनीता राऊत यांच्याकडून निषेधशिवाजी पेठेतील माजी महापौर सुनीता राऊत व त्यांचे पती माजी नगरसेवक अजित राऊत यांनी अजिंक्य चव्हाण यांचा निषेध केला आहे. चव्हाण यांची वागणूक लज्जास्पद आहे. मागच्या निवडणुकीत मी त्याग करून त्यांना संधी देत निवडून आणले. आज त्यांनी विरोधी गटास मतदान करून शिवाजी पेठेची बदनामी केली आहे. जनतेचा अपमान केला आहे. त्यांचा आम्ही निषेध करत आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.