शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

हद्दवाढीसाठी नव्याने प्रस्ताव

By admin | Updated: May 5, 2015 01:09 IST

सर्वेक्षण सुरू : नगररचना लागले कामाला; आठवड्यात आयुक्तांना अहवाल

कोल्हापूर : शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाने फेटाळल्यानंतर महापालिकेच्या नगररचना विभागात आयुक्त पी. शिवशंकर यांच्या आदेशाने नवा प्रस्ताव तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. महापालिका हद्दीपासून एक ते दोन किलोमीटर परिघात किती गावे समाविष्ट करून घेता येऊ शकतील, याची शास्त्रीय पद्धतीने माहिती संकलनाचे काम सुरू झाले आहे. आठवड्यात नव्या हद्दवाढीचा प्रस्ताव आयुक्तांसमोर सादर करणार असल्याची माहिती सहायक संचालक नगररचना डी. एस. खोत यांनी ‘लोकमत’ला सांगितली. राज्य शासनाने एप्रिल महिन्यात ‘राजकीय विरोधामुळे कोल्हापूरची हद्दवाढ नाकारण्यात येत आहे,’ असे दोन ओळींचे पत्र लिहून कोल्हापूरची हद्दवाढ नाकारली. शासनाने हद्दवाढीस नकार दर्शविला असला तरी महापालिका प्रशासनाने प्रयत्न सोडलेले नाहीत. आयुक्त पी. शिवशंकर यांनी हद्दवाढीत समाविष्ट होणाऱ्या संभावित १९ गावातील नागरिकांची मनधरणी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, शहराच्या हद्दीच्या पाच किलोमीटर परिघात ७८ गावे तर १० किलोमीटर परिघात ९३ गावे येतात. त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने गावे शहरात समाविष्ठ करण्यापेक्षा लगतच्या एक ते दोन किलोमीटर अंतरावरील गावांना शहरात समाविष्ठ करण्याच्या विचार पुढे आला. त्यानुसार नगररचना विभागाने अहवाल तयार करण्याचे काम सुरू केले. शहराच्या हद्दीच्या एक किलोमिटर हद्दीत वडणगे, शिये, कळंबा, उचगाव, पाचगाव, आदी लहान-मोठी दहा गावे येतात तर दोन किलोमीटरच्या अंतरावर आंबेवाडी, निगवे, शिरोली एमआयडीसीसह १५ गावे येतात. या गावांचे विद्यमान जमीन वापर पृथ:करण, त्यावर अवलंबून असणारी लोक संख्या, शेती व्यवसायावर आधारित लोक संख्या, शहरातील साधन संपत्तीचा वापर करणारे लोक यांचे पृथ:करण व त्यानंतर सर्वेक्षण करण्याचे काम जलदगतीने सुरू आहे. आठवड्यात सर्वेक्षणाचे काम पूर्ण करून आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती डी. एस. खोत यांनी दिली. (प्रतिनिधी)