शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
4
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
5
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
6
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
7
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
8
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
9
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
10
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
11
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
12
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
13
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
14
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
15
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
16
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
17
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
18
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
19
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
20
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केबलचे नवे पॅकेज ३० टक्के जणांकडेच-: प्रतिसाद नसल्याने केबलचालकांची घालमेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 01:02 IST

टेलिकॉम रेग्युलेटरी आॅथॉरिटी आॅफ इंडिया (ट्राय)च्या निर्देशानुसार अटींसह नव्या दरपत्रकानुसार जानेवारी महिन्यापासून केबल प्रक्षेपणासाठी पॅकेजची नोंदणी सुरूआहे; परंतु अद्याप ३० टक्के लोकांनीच

ठळक मुद्देग्राहकांमध्ये अनास्था

कोल्हापूर : टेलिकॉम रेग्युलेटरी आॅथॉरिटी आॅफ इंडिया (ट्राय)च्या निर्देशानुसार अटींसह नव्या दरपत्रकानुसार जानेवारी महिन्यापासून केबल प्रक्षेपणासाठी पॅकेजची नोंदणी सुरूआहे; परंतु अद्याप ३० टक्के लोकांनीच केबलची नवीन पॅकेज घेतली आहेत. याबाबत ग्राहकांमध्ये अनास्था असून, विविध कारणे सांगून त्यांच्याकडून चालढकल केली जात असल्याचे चित्र आहे. यामुळे केबलचालकांची घालमेल वाढली आहे.

‘ट्राय’ने एमआरपी अ‍ॅक्टअंतर्गत नव्याने केबल दर निश्चित करून ग्राहकांनाच प्लॅन निवडण्याची मुभा देण्याचे धोरण जाहीर केले आहे. जानेवारी महिन्यापासून याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. नवीन धोरणामुळे केबलच्या चॅनेल पॅकेजसाठी ग्राहकांना २५० रुपयांपासून ६०० रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागत आहेत. जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागात बी न्यूज व एस न्यूजचे मिळून सुमारे साडेसहा लाख केबल कनेक्शनधारक आहेत. यामध्ये बी न्यूजचे सुमारे पाच लाख, तर एस न्यूजचे दीड लाख कनेक्शनधारक आहेत. यातील अद्याप ३० टक्केच म्हणजे सुमारे २ लाख लोकांनीच नवीन पॅकेज घेतले आहे. जानेवारीपासून मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंतचे हे चित्र आहे.सरकार नियम बदलणार असून, पूर्वीप्रमाणेच केबल सुरूराहणार आहे, या भरवशावर अजून ग्राहक आहेत. तसेच दहावीसह शालेय परीक्षा सुरूअसल्याने मुलांची अडचण नको म्हणूनही ग्राहकांकडून केबलचे पॅकेज घेण्याकडे कानाडोळा केला जात आहे. केबलचालकांकडून भेटीगाठी घेऊन नवीन पॅकेजसंदर्भात माहिती दिली जात असली, तरी ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. जुन्या केबलचे प्रक्षेपण हे ३१ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे; परंतु या केबलवर पे चॅनेल दिसत नसून, केवळ चार ते पाच राष्टÑीय चॅनेल्स दिसत आहेत. परीक्षेचे कारण पुढे करत ग्राहकांकडून होत असलेला कानाडोळा केबल चालकांची मात्र घालमेल वाढवीत आहे. साधारण एप्रिलअखेरपर्यंत असेच चित्र राहण्याची स्थिती आहे. 

केबलचे नवीन पॅकेज घेण्याबाबत ग्राहकांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नाही. परीक्षांसह विविध कारणे सांगून ग्राहकांकडून चालढकल केली जात आहे. ‘ट्राय’च्या धोरणानुसार ३१ मार्चपर्यंत नवीन पॅकेज ग्राहकांनी घेणे गरजेचे आहे.- प्रकाश महाडिक, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा केबल आॅपरेटर संघटना.केबलची पूर्वीची एका रकमेत सर्व चॅनेलची पद्धत सोईस्कर व किफायतशीर होती; परंतु नव्याने आलेल्या पॅकेज पद्धतीमुळे ग्राहकांच्या चॉईसवर गदा आली आहे. जादा पैसे आणि मर्यादित चॅनेल अशी ही पॅकेज पद्धत ग्राहकांसाठी सोईस्कर दिसत नाही.- उत्तम पाटील, केबल ग्राहक