शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:25 IST

तुरंबे : नवीन शैक्षणिक धोरण सैद्धांतिकदृष्ट्या चांगले असले, तरी व्यावहारिकदृष्ट्या मात्र ते कुचकामी आहे, असे मत शिवाजी विद्यापीठातील ...

तुरंबे : नवीन शैक्षणिक धोरण सैद्धांतिकदृष्ट्या चांगले असले, तरी व्यावहारिकदृष्ट्या मात्र ते कुचकामी आहे, असे मत शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. पी. एस. कांबळे यांनी व्यक्त केले. ते प्रोटान (प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या) कोल्हापूर विभागीय ऑनलाईन अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अधिवेशनाचे अध्यक्ष डॉ. धनराज वाघमारे होते. कांबळे पुढे म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आंतरशाखीय शिक्षणाची सोय करण्यात आलेली आहे. शैक्षणिक धोरण हे शिक्षणाला विकेंद्रीकरणकडून केंद्रीकरणकडे घेऊन जात आहे. शिक्षणाचे विकेंद्रीकरण होऊन ते सर्वदूर पसरवणे हे गरजेचे असते. अशा परिस्थितीमध्ये शिक्षणाचे केंद्रीकरण झाल्यास शिक्षण हे खासगी मालकीचे होऊन जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

यावेळी डॉ. विवेक धुपदाळे यांनी कामगार कायद्यांवर मार्गदर्शन केले. डॉ. पी. बी. आचार्य यांनी प्रस्थापित कामगार संघटनांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, इतक्या कामगार संघटना, शिक्षक संघटना असूनसुद्धा शिक्षकांचे, कामगारांचे प्रश्न आणि समस्या या वाढतच आहेत. यावेळी डॉ. विद्यानंद खंडागळे, डॉ. अस्मिता प्रधान, माननीय सदाशिव वारे, माननीय श्रीपाल गायकवाड, डॉ. अर्जुन ओहळ, डॉ. उर्मिला पोळ, सतीश गायकवाड, संदेश कदम, राजेंद्र कांबळे उपस्थित होते.