शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

यंत्रमाग कामगारासाठी नवे किमान वेतन

By admin | Updated: February 3, 2015 23:58 IST

शासनाकडून नवीन अधिसूचना : कामगारांना अनुक्रमे सहा, सात व आठ हजार रुपये वाढ शक्य

इचलकरंजी : राज्यातील यंत्रमाग उद्योगामधील कामगारांसाठी शासनाने नवीन किमान वेतन जाहीर केले आहे. यानुसार कुशल कामगारांना प्रती महिना ६००० रुपये, अर्धकुशल कामगाराला ७००० रुपये व अकुशल कामगाराला ८००० रुपये अशी वाढ मिळेल. ही अधिसूचना उद्योग-ऊर्जा व कामगार मंत्रालयाने यंत्रमाग कामगार किमान वेतनप्रकरणी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये सादर केली असल्याची माहिती याचिकाकर्ते लालबावटा सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेच्यावतीने ए. बी. पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.यंत्रमाग उद्योगातील कामगारांना जानेवारी १९८६ नंतर गेली २८ वर्षे शासनाने किमान वेतन जाहीर केलेले नव्हते. लालबावटा कामगार संघटनेसह अनेक संघटनांनी किमान वेतनासाठी वारंवार आंदोलने केली. न्याय मागण्यासाठी वेगवेगळ््या पातळीवर त्याचा पाठपुरावा झाला. अखेर कामगार संघटनेतर्फे ए. बी. पाटील यांनी १३ नोव्हेंबर २०१४ रोजी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्याची न्यायाधीश मोहीम शहा व कुलाबावाला यांच्यासमोर ४ जानेवारीला सुनावणी झाली. यंत्रमाग कामगारांच्या किमान वेतनप्रकरणी ३१ जानेवारीपूर्वी शासनाने अधिसूचना काढावी आणि पुढील सुनावणीसाठी २ फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहावे, असे आदेश उच्च न्यायालयाने जारी केला.न्यायालयाच्या आदेशानुसार उपसचिव दि. सा. रजपूत यांनी उपरोक्त अधिसूचना २९ जानेवारीला किमान वेतन अधिनियमास अनुसरून जारी केल्याचे पाटील यांना सांगितले. कामगार संघटनेच्यावतीने अ‍ॅड. प्रसन्न कुमार व अक्षय पाटील यांनी काम पाहिले. पत्रकार परिषदेसाठी कामगार नेते दत्तात्रय माने, आनंदराव चव्हाण, सुभाष निकम, कृष्णात कुलकर्णी, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)कोणाला किती लाभ शासनाच्या नवीन अधिसूचनेनुसार कुशल कामगाराला महापालिका क्षेत्रात १०,१०० रुपये, नगरपालिका क्षेत्रात ९,५०० रुपये व ग्रामीण क्षेत्रात ८,५०० रुपये इतके मूळ वेतन जाहीर झाले असून, सन २००१ चा महागाई भत्ता १०० निर्देशांक गृहीत धरून पुढे वाढीव निर्देशांकाप्रमाणे भत्त्यात वाढ होणार आहे. त्याप्रमाणे सध्या मूळ पगारात ३,७७० रुपये इतकी वाढ होईल. अशाच प्रकारे अर्धकुशल कामगाराला वरील उल्लेखनीय क्षेत्रानुसार अनुक्रमे ९,५०० रुपये, ९००० रुपये व ८००० रुपये आणि अकुशल कामगाराला अनुक्रमे ९००० रुपये, ८००० रुपये व ७५०० रुपये इतका दरमहा पगार आठ तास पाळीच्या कामासाठी मिळणार आहे. सध्या या कामगारांना अत्यंत तुटपुंजे वेतन मिळत असून, कुशल कामगारांना सुमारे ६००० रुपये, अर्धकुशल कामगारांना ७००० रुपये, तर अकुशल कामगारांना ८००० रुपये इतकी दरमहा वाढ मिळेल. मात्र, या नवीन अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी कामगार संघटनांना आंदोलन करावे लागेल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.