शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

पिराचीवाडीची 'सुर्वांगसुंदर गाव' म्हणून नवी ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:25 IST

दत्ता पाटील म्हाकवे : नैसर्गिकदृष्ट्या मागासलेले आणि हमालांचे गाव म्हणून ओळख असणाऱ्या पिराचीवाडीने सरपंच सुभाष भोसले यांच्या पुढाकाराने एकजूट ...

दत्ता पाटील म्हाकवे : नैसर्गिकदृष्ट्या मागासलेले आणि हमालांचे गाव म्हणून ओळख असणाऱ्या पिराचीवाडीने सरपंच सुभाष भोसले यांच्या पुढाकाराने एकजूट दाखवत गावचे नाव जिल्ह्याच्या नकाशावर कोरले. दुर्गम, डोंगराळ सोयी-सुविधांअभावी मागे राहिलेल्या या गावाने झपाटल्याप्रमाणे केवळ दोन वर्षांत गावाचा कायापालट केला. एकसंधपणे घेतलेल्या परिश्रमाचे जिल्हा स्तरावरील प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने चीज झाले.

आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव हा पुरस्कार पिराचीवाडी गावाला जाहीर झाला.

सरपंच सुभाष भोसले यांनी सर्व सदस्य व ग्रामस्थांच्या मदतीने कोट्यवधीचा निधी खेचून आणला. कल्पनाविलासात रंगून जावी अशी वैकुंठभुमी, सुसज्ज, सोयीनीयुक्त ग्रामपंचायत इमारत, गावात सीसीटीव्ही कॅमेरे, रस्त्यांंच्या दुतर्फा झाडे, बंदिस्त गटारे, ऐतिहासिक तलाव यामुळे गावचे रूपडेच पालटले आहे.

दरम्यान, प्रत्येक कामासाठी शासकीय निधीची वाट न पाहता भोसले यांनी नदीतून तीन टप्प्यांत पाणी योजना, ऐतिहासिक बुरुजांची डागडुजी, संपूर्ण गावातील झाडे त्यांंना ठिबक यासाठी लाखो रुपये स्वतःच खर्ची घातले आहेत.

मुश्रीफांचे पाठबळ : भोसले

गावातील विकासाचे श्रेय सरपंच भोसले यांनी मंत्री मुश्रीफ यांच्या पारड्यात टाकले. गल्ली-बोळातील समस्या आणि सामान्य माणसाच्या गरजा माहीत असणारे मुश्रीफांसारखे ग्रामविकासमंत्री लाभणे हे भाग्यच आहे. त्यांच्या भक्कम पाठबळानेच आम्ही यशोशिखरापर्यंत पोहोचू शकलो. तसेच, जि. प. सदस्य मनोज फराकटे यांचेही मोलाचे सहकार्य लाभल्याचे भोसले यांनी सांगितले.