शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

साहित्यातून जीवनास नवी ऊर्जा

By admin | Updated: May 10, 2017 00:16 IST

प्रकाश आबिटकर : गारगोटी येथे वेदसागर साहित्य मंचच्या पुरस्कारांचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क  ==गारगोटी : साहित्यातून मानवी जीवनाला नवी ऊर्जा व शक्ती मिळते. यासाठी साहित्यात भावभावनांचे प्रतिबिंब उमटले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले.ते गारगोटी येथील शाहू वाचनालयात आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते. मराठी साहित्याचे जतन व संवर्धन करण्यासाठी २५ वर्षे साहित्य चळवळीच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या वेदसागर साहित्य मंचच्या विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार बजरंग देसाई होते. उद्घाटन आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे उपस्थित होते.ज्येष्ठ साहित्यिक वेदसागर साहित्य मंचचे अध्यक्ष राजन कोनवडेकर यांनी स्वागत, तर उपाध्यक्ष कवी गोविंद पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. यावेळी म्हात्रे म्हणाले की, ज्या साहित्यात मानवता व नैतिकता ही मूल्ये असतात, असेच साहित्य जिवंत राहते आणि मानवी जीवनाला दिशा देण्याचे काम करते. माजी आमदार देसाई म्हणाले, साहित्य हे मानवी मनाचे टॉनिक आहे. साहित्यात मन, मेंदू आणि मनगट यांना बळकट करण्याची शक्ती आहे. यावेळी संजय देसाई, धनाजी कुंभार, डॉ. मा. ग. गुरव, प्रवीण गुरव, एम. एच. बारड, मधुकर आसबे, बी. एस. दंडवते, अमृता शिरगांवकर, अंचित दाभोळे, आदी उपस्थित होते.प्रौढ साहित्य पुरस्कार - सदानंद पुंडपाळ (उत्तूर), डॉ. नलिनी महाडिक (सातारा), दीपक फाळके (बुलढाणा). बालवाङ्मय पुरस्कार- यशवंत माळी (देशिंग), राजाराम कोळी (वडूज), शि. नि. हंचनाळे (हलकणी). विशेष पुरस्कार- डॉ. स्मिता पाटील (मोहोळ), संजय खोचारे (मुरुक्टे), छाया घाटगे (मुंबई), पी. एन. देशपांडे (कोल्हापूर). प्रबोधनात्मक पुरस्कार-संग्रामसिंह मस्कर (पारधेवाडी) यांना पारितोषिक, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.