शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

साहित्यातून जीवनास नवी ऊर्जा

By admin | Updated: May 10, 2017 00:16 IST

प्रकाश आबिटकर : गारगोटी येथे वेदसागर साहित्य मंचच्या पुरस्कारांचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क  ==गारगोटी : साहित्यातून मानवी जीवनाला नवी ऊर्जा व शक्ती मिळते. यासाठी साहित्यात भावभावनांचे प्रतिबिंब उमटले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले.ते गारगोटी येथील शाहू वाचनालयात आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते. मराठी साहित्याचे जतन व संवर्धन करण्यासाठी २५ वर्षे साहित्य चळवळीच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या वेदसागर साहित्य मंचच्या विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार बजरंग देसाई होते. उद्घाटन आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे उपस्थित होते.ज्येष्ठ साहित्यिक वेदसागर साहित्य मंचचे अध्यक्ष राजन कोनवडेकर यांनी स्वागत, तर उपाध्यक्ष कवी गोविंद पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. यावेळी म्हात्रे म्हणाले की, ज्या साहित्यात मानवता व नैतिकता ही मूल्ये असतात, असेच साहित्य जिवंत राहते आणि मानवी जीवनाला दिशा देण्याचे काम करते. माजी आमदार देसाई म्हणाले, साहित्य हे मानवी मनाचे टॉनिक आहे. साहित्यात मन, मेंदू आणि मनगट यांना बळकट करण्याची शक्ती आहे. यावेळी संजय देसाई, धनाजी कुंभार, डॉ. मा. ग. गुरव, प्रवीण गुरव, एम. एच. बारड, मधुकर आसबे, बी. एस. दंडवते, अमृता शिरगांवकर, अंचित दाभोळे, आदी उपस्थित होते.प्रौढ साहित्य पुरस्कार - सदानंद पुंडपाळ (उत्तूर), डॉ. नलिनी महाडिक (सातारा), दीपक फाळके (बुलढाणा). बालवाङ्मय पुरस्कार- यशवंत माळी (देशिंग), राजाराम कोळी (वडूज), शि. नि. हंचनाळे (हलकणी). विशेष पुरस्कार- डॉ. स्मिता पाटील (मोहोळ), संजय खोचारे (मुरुक्टे), छाया घाटगे (मुंबई), पी. एन. देशपांडे (कोल्हापूर). प्रबोधनात्मक पुरस्कार-संग्रामसिंह मस्कर (पारधेवाडी) यांना पारितोषिक, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.