शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

अंबाबाई मंदिर परिसरात नव्या बांधकामांना मनाई

By admin | Updated: May 21, 2015 00:57 IST

महापालिकेचा निर्णय : केएमटी प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम न भरल्यास फौजदारी करणार; सभेत इशारा

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर विकासाचा प्रारुप आराखडा तयार करण्यात येत आहे. त्यामध्ये बाधित होणाऱ्या क्षेत्रात नवीन बांधकामांना महापालिका परवानगी देणार नाही असा निर्णय बुधवारच्या सर्वसाधारण सभेत झाला. अध्यक्षस्थानी महापौर तृप्ती माळवी होत्या.मंदिर विकासाचा प्रारुप आराखडा यापूर्वीच शासनास सादर झाला आहे, परंतु आता पुन्हा नव्याने सर्वेक्षण सुरु आहे. त्यामध्ये जे बाधित क्षेत्र निश्चित होईल, त्या क्षेत्रात नवीन बांधकामांना परवानगी नाही व आता जी बांधकामे सुरु आहेत, त्यांना नोटिसा काढण्यात येतील, असे नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोेत यांनी सभेत स्पष्ट केले. तसेच केएमटी कर्मचाऱ्यांच्या पगारातून प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम कापली जाते; परंतु ती संबंधित खात्याकडे भरली जात नाही. याबाबत फौजदारी करण्याचा इशारा या सभेत देण्यात आला. प्रारूप विकास आराखड्यातील क्षेत्र राखीव ठेवण्याबाबतच्या प्रस्तावात फेरबदल करण्याचा प्रस्ताव सभागृहात मंजूर झाला. यापुढे मंदिर परिसरात नवीन बांधकामांना परवानगी देऊ नये, अशी मागणी केली. आराखडा करताना जनसुनावणी घ्यावी, अशी सूचना भूपाल शेटे यांनी केली. आदिल फरास, आर. डी. पाटील यांनीही बांधकामास परवानगी थांबवा, अशी मागणी केली. खासगी मोबाईल कंपन्यांमार्फत ओ.एफ.सी. केबल टाकतेवेळी महापालिकेकरिता स्वतंत्र समांतर युटिलिटी डक्ट टाकणे बंधनकारक करण्याबाबतचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. तो मंजूर केला तर महापालिकेचे साडेआठ कोटी रुपयांचे नुकसान होणार असल्याचे भूपाल शेटे यांनी पटवून दिले. केएमटी कर्मचाऱ्यांच्या पगारातून प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम कपात करून घेतली जाते; परंतु ती संबंधित खात्याकडे भरली जात नाही. ही रक्कम तत्काळ भरली नाही तर ‘केएमटी’चे सहायक वाहतूक व्यवस्थापक संजय भोसले यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा राजेश लाटकर यांनी दिला. लाटकर यांनी चर्चेत भाग घेताना कर्मचाऱ्यांच्या पगारातून फंडाची रक्कम वसूल केली जाते; मात्र ती त्या विभागाकडे भरली जात नाही. ही रक्कम जर भरली नाही तर मी व्यक्तिगत भोसले यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे, असा इशारा दिला. केएमटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळच्या वेळी होत नाहीत. कर्मचाऱ्यांची अत्यंत गैरसोय होत आहे. अधिकारी म्हणून भोसले यांची काही जबाबदारी आहे की नाही? असा सवालही लाटकर यांनी केला. काही शंका निर्माण झाल्यामुळे निविदा मंजूर करायला आमच्याकडून थोडा विलंब झाला तर केएमटीच्या अधिकाऱ्यांची वृत्तपत्रांतून लोकप्रतिनिधींची बदनामी केली. आता बसेस यायला विलंब होत आहे, तर हे अधिकारी गप्प का बसले आहेत? असा जाब यशोदा मोहिते यांनी विचारला. बसेस यायला विलंब होत असल्याने प्रत्येक बसमागे दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे संजय भोसले यांनी स्पष्ट केले. पुढील आठ दिवसांत आणखी दहा बसेस येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)शहर वाहतूक शाखेला दलाल मार्के टमध्ये जागा देणार मिळकतींच्या सर्वेक्षणासाठी खासगी एजन्सी नियुक्त करणारशाहू समाधीची जागा दिल्याबद्दल छत्रपती परिवाराचे अभिनंदन.