शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

अंबाबाई मंदिर परिसरात नव्या बांधकामांना मनाई

By admin | Updated: May 21, 2015 00:57 IST

महापालिकेचा निर्णय : केएमटी प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम न भरल्यास फौजदारी करणार; सभेत इशारा

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर विकासाचा प्रारुप आराखडा तयार करण्यात येत आहे. त्यामध्ये बाधित होणाऱ्या क्षेत्रात नवीन बांधकामांना महापालिका परवानगी देणार नाही असा निर्णय बुधवारच्या सर्वसाधारण सभेत झाला. अध्यक्षस्थानी महापौर तृप्ती माळवी होत्या.मंदिर विकासाचा प्रारुप आराखडा यापूर्वीच शासनास सादर झाला आहे, परंतु आता पुन्हा नव्याने सर्वेक्षण सुरु आहे. त्यामध्ये जे बाधित क्षेत्र निश्चित होईल, त्या क्षेत्रात नवीन बांधकामांना परवानगी नाही व आता जी बांधकामे सुरु आहेत, त्यांना नोटिसा काढण्यात येतील, असे नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोेत यांनी सभेत स्पष्ट केले. तसेच केएमटी कर्मचाऱ्यांच्या पगारातून प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम कापली जाते; परंतु ती संबंधित खात्याकडे भरली जात नाही. याबाबत फौजदारी करण्याचा इशारा या सभेत देण्यात आला. प्रारूप विकास आराखड्यातील क्षेत्र राखीव ठेवण्याबाबतच्या प्रस्तावात फेरबदल करण्याचा प्रस्ताव सभागृहात मंजूर झाला. यापुढे मंदिर परिसरात नवीन बांधकामांना परवानगी देऊ नये, अशी मागणी केली. आराखडा करताना जनसुनावणी घ्यावी, अशी सूचना भूपाल शेटे यांनी केली. आदिल फरास, आर. डी. पाटील यांनीही बांधकामास परवानगी थांबवा, अशी मागणी केली. खासगी मोबाईल कंपन्यांमार्फत ओ.एफ.सी. केबल टाकतेवेळी महापालिकेकरिता स्वतंत्र समांतर युटिलिटी डक्ट टाकणे बंधनकारक करण्याबाबतचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. तो मंजूर केला तर महापालिकेचे साडेआठ कोटी रुपयांचे नुकसान होणार असल्याचे भूपाल शेटे यांनी पटवून दिले. केएमटी कर्मचाऱ्यांच्या पगारातून प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम कपात करून घेतली जाते; परंतु ती संबंधित खात्याकडे भरली जात नाही. ही रक्कम तत्काळ भरली नाही तर ‘केएमटी’चे सहायक वाहतूक व्यवस्थापक संजय भोसले यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा राजेश लाटकर यांनी दिला. लाटकर यांनी चर्चेत भाग घेताना कर्मचाऱ्यांच्या पगारातून फंडाची रक्कम वसूल केली जाते; मात्र ती त्या विभागाकडे भरली जात नाही. ही रक्कम जर भरली नाही तर मी व्यक्तिगत भोसले यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे, असा इशारा दिला. केएमटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळच्या वेळी होत नाहीत. कर्मचाऱ्यांची अत्यंत गैरसोय होत आहे. अधिकारी म्हणून भोसले यांची काही जबाबदारी आहे की नाही? असा सवालही लाटकर यांनी केला. काही शंका निर्माण झाल्यामुळे निविदा मंजूर करायला आमच्याकडून थोडा विलंब झाला तर केएमटीच्या अधिकाऱ्यांची वृत्तपत्रांतून लोकप्रतिनिधींची बदनामी केली. आता बसेस यायला विलंब होत आहे, तर हे अधिकारी गप्प का बसले आहेत? असा जाब यशोदा मोहिते यांनी विचारला. बसेस यायला विलंब होत असल्याने प्रत्येक बसमागे दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे संजय भोसले यांनी स्पष्ट केले. पुढील आठ दिवसांत आणखी दहा बसेस येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)शहर वाहतूक शाखेला दलाल मार्के टमध्ये जागा देणार मिळकतींच्या सर्वेक्षणासाठी खासगी एजन्सी नियुक्त करणारशाहू समाधीची जागा दिल्याबद्दल छत्रपती परिवाराचे अभिनंदन.