शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

नेजचा पाझर तलाव झुडपाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 23:50 IST

भरत शास्त्री । लोकमत न्यूज नेटवर्क बाहुबली : हातकणंगले तालुक्यातील नेज गावच्या पाझर तलावाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. ...

भरत शास्त्री ।लोकमत न्यूज नेटवर्कबाहुबली : हातकणंगले तालुक्यातील नेज गावच्या पाझर तलावाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. सध्या तलाव पूर्णपणे कोरडा पडला आहे शिवाय तलावाच्या बंधाऱ्याजवळ झाड-झुडपांमुळे बांधाच्या मजबुतीला तडा जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नेजचे ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून केली जात आहे.हा तलाव चार दशकांपूर्वी गावच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सन १९७२ मध्ये तयार करण्यात आला होता. नेज व आळते गावांच्या सीमेवर आळते गावाच्या हद्दीत या पाझर तलावाची निर्मिती करण्यात आली होती. सदर जमिनीचे अधिग्रहण सन १९७८ मध्येच पूर्ण झाले होते तेव्हाच त्याचे कामही पूर्ण करण्यात आले होते; परंतु अनेक वर्षे सुस्त शासकीय यंत्रणेमुळे सदर जमीन संपादनानंतर ही मालकी हक्क लावून घेण्याचे काम प्रशासनाने केले नाही.त्यामुळे अनेक शेतकºयांनी या गोष्टींचा गैरफायदा घेऊन तलावाच्या जमिनीमध्ये अतिक्रमण केले. अनेक एकर जमीन शेतकरी अवैध पद्धतीने कसत आहेत. हा सर्व प्रकार गेली अनेक वर्षे असाच सुरू आहे; पण तालुका व जिल्हा प्रशासन याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे. ज्या हेतूने चार दशकांपूर्वी दूरदृष्टीने तलाव तयार केला होता. त्याच्या मुख्य हेतूलाच हरताळ बसत आहे.हा तलाव ३३ एकर २१ गुंठ्यांमध्ये पसरलेला आहे. एवढा भव्य तलाव असल्याने याची चांगली डागडुजी व सतत नीगा राखल्यास ४०० ते ५०० एकर जमिनीवरील शेतीला याचा फायदा होईलच. शिवाय भागातील विहिरी व बोअरिंगच्या पाणीपातळीत वाढ होण्यास देखील मदत होईल. सध्या तलावाला डागडुजीची गरज आहे कारण जसे पावसात त्यामध्ये थोडे फार पाणी साठते ते पाणी बंधारा मजबूत नसल्याने गळून जाते.दरम्यान, तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यास तलावाच्या प्रभाव क्षेत्रामध्ये येणाºया विहिरींना वर्षभर पाणी उपलब्ध होऊन वर्षभर विविध प्रकारची पिके नेज-शिवपुरीच्या शेतकºयांना घेता येणार आहेत. तलावामधील अतिक्रमण व दुर्लक्षामुळे तलावाची उपयोगिता कमी झाली आहे. त्याचा फटका मात्र शेतकºयांना बसत आहे.गेल्यावर्षीपासून नेज ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू आहेत; परंतु म्हणावे तेवढे यश त्यांच्या हाती लागले नाही. येणाºया पावसाच्या आधी तलावाचे काम पूर्ण होऊन पूर्ण क्षमतेने त्याचा वापर होणे आवश्यक आहे. यासाठी तालुका, जिल्हा प्रशासन व नेज ग्रामपंचायत अधिक प्रयत्न करतील, हीच अपेक्षा.