शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
4
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
5
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
6
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
7
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
8
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
9
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
10
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
12
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
13
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
16
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
17
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
18
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
19
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
20
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?

नेजचा पाझर तलाव झुडपाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 23:50 IST

भरत शास्त्री । लोकमत न्यूज नेटवर्क बाहुबली : हातकणंगले तालुक्यातील नेज गावच्या पाझर तलावाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. ...

भरत शास्त्री ।लोकमत न्यूज नेटवर्कबाहुबली : हातकणंगले तालुक्यातील नेज गावच्या पाझर तलावाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. सध्या तलाव पूर्णपणे कोरडा पडला आहे शिवाय तलावाच्या बंधाऱ्याजवळ झाड-झुडपांमुळे बांधाच्या मजबुतीला तडा जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नेजचे ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून केली जात आहे.हा तलाव चार दशकांपूर्वी गावच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सन १९७२ मध्ये तयार करण्यात आला होता. नेज व आळते गावांच्या सीमेवर आळते गावाच्या हद्दीत या पाझर तलावाची निर्मिती करण्यात आली होती. सदर जमिनीचे अधिग्रहण सन १९७८ मध्येच पूर्ण झाले होते तेव्हाच त्याचे कामही पूर्ण करण्यात आले होते; परंतु अनेक वर्षे सुस्त शासकीय यंत्रणेमुळे सदर जमीन संपादनानंतर ही मालकी हक्क लावून घेण्याचे काम प्रशासनाने केले नाही.त्यामुळे अनेक शेतकºयांनी या गोष्टींचा गैरफायदा घेऊन तलावाच्या जमिनीमध्ये अतिक्रमण केले. अनेक एकर जमीन शेतकरी अवैध पद्धतीने कसत आहेत. हा सर्व प्रकार गेली अनेक वर्षे असाच सुरू आहे; पण तालुका व जिल्हा प्रशासन याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे. ज्या हेतूने चार दशकांपूर्वी दूरदृष्टीने तलाव तयार केला होता. त्याच्या मुख्य हेतूलाच हरताळ बसत आहे.हा तलाव ३३ एकर २१ गुंठ्यांमध्ये पसरलेला आहे. एवढा भव्य तलाव असल्याने याची चांगली डागडुजी व सतत नीगा राखल्यास ४०० ते ५०० एकर जमिनीवरील शेतीला याचा फायदा होईलच. शिवाय भागातील विहिरी व बोअरिंगच्या पाणीपातळीत वाढ होण्यास देखील मदत होईल. सध्या तलावाला डागडुजीची गरज आहे कारण जसे पावसात त्यामध्ये थोडे फार पाणी साठते ते पाणी बंधारा मजबूत नसल्याने गळून जाते.दरम्यान, तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यास तलावाच्या प्रभाव क्षेत्रामध्ये येणाºया विहिरींना वर्षभर पाणी उपलब्ध होऊन वर्षभर विविध प्रकारची पिके नेज-शिवपुरीच्या शेतकºयांना घेता येणार आहेत. तलावामधील अतिक्रमण व दुर्लक्षामुळे तलावाची उपयोगिता कमी झाली आहे. त्याचा फटका मात्र शेतकºयांना बसत आहे.गेल्यावर्षीपासून नेज ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू आहेत; परंतु म्हणावे तेवढे यश त्यांच्या हाती लागले नाही. येणाºया पावसाच्या आधी तलावाचे काम पूर्ण होऊन पूर्ण क्षमतेने त्याचा वापर होणे आवश्यक आहे. यासाठी तालुका, जिल्हा प्रशासन व नेज ग्रामपंचायत अधिक प्रयत्न करतील, हीच अपेक्षा.