शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

अमृत योजनेला दानोळीचा ठाम विरोध

By admin | Updated: April 9, 2016 00:41 IST

वारणा पाणी प्रश्न : वारणा बचाव कृती समितीची स्थापना; उद्या दानोळी ‘बंद’ करणार

दानोळी : येथील वारणा नदीचे पाणी इचलकरंजी शहराला देणार नाही, अशी ठाम भूमिका वारणा बचाव कृती समितीने दानोळी येथे आयोजित केलेल्या बैठकीत घेतली असून, कोणत्याही परिस्थितीत या अमृत योजनेला हद्दपार करू, असा इशारा देऊन इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा होऊ देणार नसल्याचे सांगितले आहे. उद्या, रविवारी ‘दानोळी बंद’चाही इशारा देण्यात आला आहे़ यावेळी माजी बांधकाम सभापती महादेव धनवडे म्हणाले, इचलकरंजी शहराची ही अमृत योजना नसून, भविष्यात दानोळीच्या शेतकऱ्यांना विष घेऊन आत्महत्या करणारी आहे़ आमदार हाळवणकर यांनी जनतेची दिशाभूल करून अमृत योजना घाईगडबडीत मंजूर केल्यामुळे यात नक्कीच काळाबाजार आहे़ इचलकरंजीची नदी ही पंचगंगा असून वारणा ही दानोळी परिसरातील लाखो नागरिकांची आहे़ या पाण्यावर इचलकरंजीकरांनी हक्क सांगू नये, अन्यथा वारणेचा हिसका दाखवू़ यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुरेश कांबळे म्हणाले, इचलकरंजी शहराने पंचगंगा नदीला दूषित केले आहे़ त्यामुळे या अमृत योजनेला आलेला ७१ कोटी रुपयांचा निधी पंचगंगा नदीचे पाणी शुद्धिकरण प्रकल्पासाठी वापरून इचलकरंजीकरांनी पंचगंगेचेच पाणी प्यावे, असा इशारा दिला़यावेळी पंचायत समितीचे सदस्य सर्जेराव शिंदे म्हणाले, दानोळी ग्रामपंचायतीने फक्त शिष्टाचाराचे काम केले असून, याबाबतचा ग्रामपंचायतीने कोणताही ठराव दिलेला नाही़ आतापर्यंत कोणी मागितली नाही़, अशा परिस्थितीत ही योजना मंजूर कशी झाली, असा सवाल केला़ माजी सरपंच गुंडू दळवी म्हणाले, इचलकरंजीला पाणी देऊन दानोळी परिसरातील लोकांनी पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी कोठून घेणार? ही योजना जरी मंजूर झाली असली तरी वारणाकाठचे लोक या मंजुरीचा डाव हाणून पाडतील़ यावेळी माजी सरपंच बापूसो दळवी म्हणाले, दानोळीचा मराठवाडा व विदर्भ व्हायला नको़ तसेच गावातील कोणत्याही व्यक्तींने मतभेद न ठेवता एकत्र येऊन या इचलकरंजी अमृत योजनेला हाकलून लावण्यासाठी सज्ज राहावे. यावेळी मानाजीराव भोसले, सरपंच सुजाता शिंदे, उपसरपंच गब्रू गावडे, रावसाहेब भिलवडे, केशव राऊत, विश्राम चव्हाण, सुनील शिंदे, अनिल खेत्राप्पा, आण्णासो पोलिस, पद्माकर कांबळे, सुरेश माणगावे, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते़सभेत झालेले ठरावइचलकरंजी शहराला पाणी देण्यास विरोध, दानोळी गावात पंपहाऊस उपसा संचासाठी कोणताही शेतकरी जमीन देणार नाही, सर्व शासकीय अधिकारी, लोप्रतिनिधी यांना या योजनेसंदर्भात जबरदस्ती प्रवेश करू दिला जाणार नाही, जिल्हाधिकाऱ्यांकडे खोची ते कनवाडपर्यंतच्या गावांनी नामंजुरीचा ग्रामपंचायतीचा ठराव देणे, कोणाचाही राजकीय दबाव आल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल,याची दखल न घेतल्यास याचिका दाखल करणाऱ, इचलकरंजी नगरपालिकेने पर्यायी व्यवस्था शोधावी, असे ठराव सभेत मंजूर करण्यात आले़जयसिंगपूर-सांगलीचा प्रस्ताव नाकारलाजयसिंगपूर व सांगली शहराने यापूर्वी दानोळी येथून पाणी उपसा करण्याचा प्रस्ताव दिला होता़ मात्र, दानोळीकरांनी हा प्रस्ताव धुडकावला असताना इचलकरंजी नगरपालिकेने अमृत योजनेस मंजुरी आणून दानोळी, कोथळी, उमळवाड, कवठेसार, कुंभोज, खोची, नरंदे, दुधगाव, कवठेपिराण, समडोळी, आदी गावांसह अनेक गावांना दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत़ त्यामुळे दानोळी गावाने एल्गार उगारला आहे़