शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
4
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
5
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
6
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
7
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
8
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
9
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
10
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
11
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
12
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
13
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
14
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
15
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
16
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
17
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
18
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
19
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
20
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...

अमृत योजनेला दानोळीचा ठाम विरोध

By admin | Updated: April 9, 2016 00:41 IST

वारणा पाणी प्रश्न : वारणा बचाव कृती समितीची स्थापना; उद्या दानोळी ‘बंद’ करणार

दानोळी : येथील वारणा नदीचे पाणी इचलकरंजी शहराला देणार नाही, अशी ठाम भूमिका वारणा बचाव कृती समितीने दानोळी येथे आयोजित केलेल्या बैठकीत घेतली असून, कोणत्याही परिस्थितीत या अमृत योजनेला हद्दपार करू, असा इशारा देऊन इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा होऊ देणार नसल्याचे सांगितले आहे. उद्या, रविवारी ‘दानोळी बंद’चाही इशारा देण्यात आला आहे़ यावेळी माजी बांधकाम सभापती महादेव धनवडे म्हणाले, इचलकरंजी शहराची ही अमृत योजना नसून, भविष्यात दानोळीच्या शेतकऱ्यांना विष घेऊन आत्महत्या करणारी आहे़ आमदार हाळवणकर यांनी जनतेची दिशाभूल करून अमृत योजना घाईगडबडीत मंजूर केल्यामुळे यात नक्कीच काळाबाजार आहे़ इचलकरंजीची नदी ही पंचगंगा असून वारणा ही दानोळी परिसरातील लाखो नागरिकांची आहे़ या पाण्यावर इचलकरंजीकरांनी हक्क सांगू नये, अन्यथा वारणेचा हिसका दाखवू़ यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुरेश कांबळे म्हणाले, इचलकरंजी शहराने पंचगंगा नदीला दूषित केले आहे़ त्यामुळे या अमृत योजनेला आलेला ७१ कोटी रुपयांचा निधी पंचगंगा नदीचे पाणी शुद्धिकरण प्रकल्पासाठी वापरून इचलकरंजीकरांनी पंचगंगेचेच पाणी प्यावे, असा इशारा दिला़यावेळी पंचायत समितीचे सदस्य सर्जेराव शिंदे म्हणाले, दानोळी ग्रामपंचायतीने फक्त शिष्टाचाराचे काम केले असून, याबाबतचा ग्रामपंचायतीने कोणताही ठराव दिलेला नाही़ आतापर्यंत कोणी मागितली नाही़, अशा परिस्थितीत ही योजना मंजूर कशी झाली, असा सवाल केला़ माजी सरपंच गुंडू दळवी म्हणाले, इचलकरंजीला पाणी देऊन दानोळी परिसरातील लोकांनी पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी कोठून घेणार? ही योजना जरी मंजूर झाली असली तरी वारणाकाठचे लोक या मंजुरीचा डाव हाणून पाडतील़ यावेळी माजी सरपंच बापूसो दळवी म्हणाले, दानोळीचा मराठवाडा व विदर्भ व्हायला नको़ तसेच गावातील कोणत्याही व्यक्तींने मतभेद न ठेवता एकत्र येऊन या इचलकरंजी अमृत योजनेला हाकलून लावण्यासाठी सज्ज राहावे. यावेळी मानाजीराव भोसले, सरपंच सुजाता शिंदे, उपसरपंच गब्रू गावडे, रावसाहेब भिलवडे, केशव राऊत, विश्राम चव्हाण, सुनील शिंदे, अनिल खेत्राप्पा, आण्णासो पोलिस, पद्माकर कांबळे, सुरेश माणगावे, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते़सभेत झालेले ठरावइचलकरंजी शहराला पाणी देण्यास विरोध, दानोळी गावात पंपहाऊस उपसा संचासाठी कोणताही शेतकरी जमीन देणार नाही, सर्व शासकीय अधिकारी, लोप्रतिनिधी यांना या योजनेसंदर्भात जबरदस्ती प्रवेश करू दिला जाणार नाही, जिल्हाधिकाऱ्यांकडे खोची ते कनवाडपर्यंतच्या गावांनी नामंजुरीचा ग्रामपंचायतीचा ठराव देणे, कोणाचाही राजकीय दबाव आल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल,याची दखल न घेतल्यास याचिका दाखल करणाऱ, इचलकरंजी नगरपालिकेने पर्यायी व्यवस्था शोधावी, असे ठराव सभेत मंजूर करण्यात आले़जयसिंगपूर-सांगलीचा प्रस्ताव नाकारलाजयसिंगपूर व सांगली शहराने यापूर्वी दानोळी येथून पाणी उपसा करण्याचा प्रस्ताव दिला होता़ मात्र, दानोळीकरांनी हा प्रस्ताव धुडकावला असताना इचलकरंजी नगरपालिकेने अमृत योजनेस मंजुरी आणून दानोळी, कोथळी, उमळवाड, कवठेसार, कुंभोज, खोची, नरंदे, दुधगाव, कवठेपिराण, समडोळी, आदी गावांसह अनेक गावांना दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत़ त्यामुळे दानोळी गावाने एल्गार उगारला आहे़