शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

फुले यांच्या विचारांची सध्या गरज

By admin | Updated: November 28, 2014 23:45 IST

राजन गवस : महात्मा जोतीराव फुले यांचा १२४ वा स्मृतिदिन

कोल्हापूर : सध्या विकासाची फूग दिसत असली, तरी पूर्वीच्या चालीरिती, रूढी, परंपरा कोणत्या बदलल्या, असा सवाल करीत कधी नव्हती इतकी जोतिराव फुले यांच्या विचारांची गरज सध्या निर्माण झाल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी मांडले. महात्मा जोतिराव फुले यांच्या १२४ व्या स्मृतिदिनानिमित्त राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्यावतीने आज, शुक्रवारी शाहू सभागृहात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. अशोक चौसाळकर होते. डॉ. गवस म्हणाले, फुले यांनी व्यवस्था मोडीत काढताना पर्यायी व्यवस्था उभी केली म्हणूनच ते समाजपरिवर्तन करू शकले. शेतकऱ्यांची बाजू मांडताना त्यांच्या चुकांवरही रोखठोक हल्ले चढविले. त्यांच्या मांडणीचा केंद्रबिंदू महिला होत्या; कारण रूढी-परंपरा, जातीय भिंती तोडण्याची ताकद केवळ महिलांमध्ये आहे. फुले यांनी ज्या व्यवस्थेविरोधात हल्ले चढविले, त्या गोष्टींत आपण तसूभर तरी पुढे गेलो का? याचा विचार करणे गरजेचे आहे. डॉ. अशोक चौसाळकर म्हणाले, पुरोहितशाही, भांडवलशाही व साम्राज्यशाही या शाह्यांनी पूर्वी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले; आता तरी यांनी पाठ सोडली आहे का? त्यांनी शोषणाची पद्धत बदलली, म्हणूनच शेतकरी आत्महत्या करीत आहेत. ट्रस्टचे सचिव विवेक आगवणे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ट्रस्टचे राजदीप सुर्वे, आदी उपस्थित होते. कोल्हापूर : सध्या विकासाची फूग दिसत असली, तरी पूर्वीच्या चालीरिती, रूढी, परंपरा कोणत्या बदलल्या, असा सवाल करीत कधी नव्हती इतकी जोतिराव फुले यांच्या विचारांची गरज सध्या निर्माण झाल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी मांडले. महात्मा जोतिराव फुले यांच्या १२४ व्या स्मृतिदिनानिमित्त राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्यावतीने आज, शुक्रवारी शाहू सभागृहात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. अशोक चौसाळकर होते. डॉ. गवस म्हणाले, फुले यांनी व्यवस्था मोडीत काढताना पर्यायी व्यवस्था उभी केली म्हणूनच ते समाजपरिवर्तन करू शकले. शेतकऱ्यांची बाजू मांडताना त्यांच्या चुकांवरही रोखठोक हल्ले चढविले. त्यांच्या मांडणीचा केंद्रबिंदू महिला होत्या; कारण रूढी-परंपरा, जातीय भिंती तोडण्याची ताकद केवळ महिलांमध्ये आहे. फुले यांनी ज्या व्यवस्थेविरोधात हल्ले चढविले, त्या गोष्टींत आपण तसूभर तरी पुढे गेलो का? याचा विचार करणे गरजेचे आहे. डॉ. अशोक चौसाळकर म्हणाले, पुरोहितशाही, भांडवलशाही व साम्राज्यशाही या शाह्यांनी पूर्वी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले; आता तरी यांनी पाठ सोडली आहे का? त्यांनी शोषणाची पद्धत बदलली, म्हणूनच शेतकरी आत्महत्या करीत आहेत. ट्रस्टचे सचिव विवेक आगवणे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ट्रस्टचे राजदीप सुर्वे, आदी उपस्थित होते.