शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

पूरग्रस्तांना न्याय देण्यासाठी एकीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:27 IST

गणपती कोळी कुरुंदवाड : पूरग्रस्तांच्या मागणीसाठी शिरोळ तालुक्यात आंदोलकांत दोन गट पडले आहेत. पूरग्रस्तांच्या समस्या तडीस लावण्यापेक्षा नेत्यांचे नेतृत्व, ...

गणपती कोळी

कुरुंदवाड : पूरग्रस्तांच्या मागणीसाठी शिरोळ तालुक्यात आंदोलकांत दोन गट पडले आहेत. पूरग्रस्तांच्या समस्या तडीस लावण्यापेक्षा नेत्यांचे नेतृत्व, श्रेयवाद, प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यातून प्रश्न सोडविण्याऐवजी श्रेयवादच रंगण्याची शक्यता असून पूरग्रस्तांना खरोखरच न्याय मिळवून द्यावयाचा असेल तर दोन्ही आंदोलक संघटनांनी एकत्र येऊन ताकद लावण्याची गरज आहे. अन्यथा पूरग्रस्तांच्या नावावर नेत्यांची राजकीय स्टंटबाजी ठरू शकेल.

पूरग्रस्तांना तातडीने सानुग्रह अनुदान मिळावे, पंचनाम्यातील जाचक अटी रद्द कराव्यात, २०१९ च्या शासन नियमाप्रमाणे पूरपंचनामा निश्चित करावा, पूरबाधित गावे शंभरटक्के पूरग्रस्त जाहीर करावीत आदी प्रमुख मागण्यांसाठी पूरग्रस्तांना घेऊन सर्वपक्षीय पूरग्रस्त संघर्ष समिती व शिरोळ तालुका पूरग्रस्त अन्याय निवारण कृती समितीच्यावतीने वेगवेगळे आंदोलन करण्यात येत आहे.

भाजपा नेते व कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, विश्वास बालीघाटे, सुरेश सासणे यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तालुका पूरग्रस्त अन्याय निवारण कृती समितीच्यावतीने गेल्या चार दिवसांपासून तालुक्यातील पूरबाधित गावांतून जनआंदोलन करत गावचावडीवर मोर्चा काढत आहेत.

तर दुसरीकडे सर्वपक्षीय पूरग्रस्त संघर्ष समितीच्या नावाखाली भाजपा नेते डॉ. संजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर, विजय भोजे, माजी आमदार उल्हास पाटील, भाजपा जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष पृथ्वीराज यादव, जयसिंगपूर नगराध्यक्षा नीता माने, धनाजी चुडमुंगे आदींच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्तांचा शिरोळ तहसीलवर मोर्चा काढण्यात आला. पूरग्रस्तांच्या प्रश्नांचा आधार घेत भाजपाला महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याची संधी मिळाली आहे.

पूरग्रस्तही आर्थिक नुकसानीत असल्याने आंदोलनाच्या माध्यमातून न्याय मिळेल या आशेने आंदोलनात सहभागी होत आहेत. त्यामुळे दोन्ही आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, पूरग्रस्तांच्या असहाय्यतेचा फायदा घेत केवळ मोर्चे, आंदोलन गाजवून प्रश्न मिटणार नाही. त्यासाठी आंदोलनाच्या सांघिक ताकदीची गरज आहे. तरच शासन आणि प्रशासन दखल घेतील. अन्यथा नेत्यांचे राजकीय मोर्चे होतील. मात्र, पूरग्रस्त वाऱ्यावर जातील.