शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

पूरग्रस्तांना न्याय देण्यासाठी एकीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:27 IST

गणपती कोळी कुरुंदवाड : पूरग्रस्तांच्या मागणीसाठी शिरोळ तालुक्यात आंदोलकांत दोन गट पडले आहेत. पूरग्रस्तांच्या समस्या तडीस लावण्यापेक्षा नेत्यांचे नेतृत्व, ...

गणपती कोळी

कुरुंदवाड : पूरग्रस्तांच्या मागणीसाठी शिरोळ तालुक्यात आंदोलकांत दोन गट पडले आहेत. पूरग्रस्तांच्या समस्या तडीस लावण्यापेक्षा नेत्यांचे नेतृत्व, श्रेयवाद, प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यातून प्रश्न सोडविण्याऐवजी श्रेयवादच रंगण्याची शक्यता असून पूरग्रस्तांना खरोखरच न्याय मिळवून द्यावयाचा असेल तर दोन्ही आंदोलक संघटनांनी एकत्र येऊन ताकद लावण्याची गरज आहे. अन्यथा पूरग्रस्तांच्या नावावर नेत्यांची राजकीय स्टंटबाजी ठरू शकेल.

पूरग्रस्तांना तातडीने सानुग्रह अनुदान मिळावे, पंचनाम्यातील जाचक अटी रद्द कराव्यात, २०१९ च्या शासन नियमाप्रमाणे पूरपंचनामा निश्चित करावा, पूरबाधित गावे शंभरटक्के पूरग्रस्त जाहीर करावीत आदी प्रमुख मागण्यांसाठी पूरग्रस्तांना घेऊन सर्वपक्षीय पूरग्रस्त संघर्ष समिती व शिरोळ तालुका पूरग्रस्त अन्याय निवारण कृती समितीच्यावतीने वेगवेगळे आंदोलन करण्यात येत आहे.

भाजपा नेते व कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, विश्वास बालीघाटे, सुरेश सासणे यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तालुका पूरग्रस्त अन्याय निवारण कृती समितीच्यावतीने गेल्या चार दिवसांपासून तालुक्यातील पूरबाधित गावांतून जनआंदोलन करत गावचावडीवर मोर्चा काढत आहेत.

तर दुसरीकडे सर्वपक्षीय पूरग्रस्त संघर्ष समितीच्या नावाखाली भाजपा नेते डॉ. संजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर, विजय भोजे, माजी आमदार उल्हास पाटील, भाजपा जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष पृथ्वीराज यादव, जयसिंगपूर नगराध्यक्षा नीता माने, धनाजी चुडमुंगे आदींच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्तांचा शिरोळ तहसीलवर मोर्चा काढण्यात आला. पूरग्रस्तांच्या प्रश्नांचा आधार घेत भाजपाला महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याची संधी मिळाली आहे.

पूरग्रस्तही आर्थिक नुकसानीत असल्याने आंदोलनाच्या माध्यमातून न्याय मिळेल या आशेने आंदोलनात सहभागी होत आहेत. त्यामुळे दोन्ही आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, पूरग्रस्तांच्या असहाय्यतेचा फायदा घेत केवळ मोर्चे, आंदोलन गाजवून प्रश्न मिटणार नाही. त्यासाठी आंदोलनाच्या सांघिक ताकदीची गरज आहे. तरच शासन आणि प्रशासन दखल घेतील. अन्यथा नेत्यांचे राजकीय मोर्चे होतील. मात्र, पूरग्रस्त वाऱ्यावर जातील.