शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

स्त्रीत्व जपणं काळाची गरज- स्मिता जयकर

By admin | Updated: February 7, 2017 00:37 IST

पेठवडगावमध्ये कल्याणी महोत्सवाची सांगता

पेठवडगाव : स्त्रीत्व जपणं काळाची गरज बनली आहे. यामध्ये वायू, पाणी, हवा, धरती व लक्ष्मी ही स्त्रीत्व आहेत. महिलांनी स्त्रीत्वांची जपणूक करून सृष्टीचे पावित्र्य राखावे, असे आवाहन सिनेअभिनेत्री स्मिता जयकर यांनी केले.येथील कल्याणी महोत्सवाच्या सांगता सभारंभप्रसंगी स्मिता जयकर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्षा विद्या पोळ होत्या. यावेळी माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ, विजयादेवी यादव, नगरसेविका अनिता चव्हाण, संगीता मिरजकर, जवाहर सलगर प्रमुख उपस्थित होते. खासगी वाहिनीवरील ‘तुज्यात जीव रंगला’ या मालिकेतील अभिनेता राणा (हार्दिक जोशी) याने महिलांशी संवाद साधला.स्मिता जयकर म्हणाल्या, स्त्रीशक्तीमधील ताकद ओळखा. प्रत्येक स्त्रीमधील शक्ती जागृत झाल्यास समाजव्यवस्था सुधारते. महिलांच्या जीवनात परिवर्तनाची धडपड विद्या पोळ करीत आहेत. त्यांच्या पाठीशी महिलांनी राहावे. तसेच महिलांनी स्वत:मध्ये सुधारणा केल्यास जग बदलेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.प्रेमाची जर्नी या फिल्ममधील कलाकारांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला. यानंतर संदीप पंचवाडकर यांचा जीवन की यादगार लम्हे हा संगीतमय कार्यक्रम सादर केला. यावेळी पाककला स्पर्धा घेण्यात आल्या. अनुक्रमे निकाल असा -फिश पदार्थ- उर्मिला पाटील, तेजस्विनी उंडाळे, माधुरी कांबळे, मटन पदार्थ - पायल गोणी, प्रिया पोळ, चिकन पदार्थ - नीलम दबडे, शुभांगी भंडारी, सुजाता माने, शुभांगी चव्हाण. शाकाहारी-उकडलेले पदार्थ - पायल गोणी, कांचन पाटील, शुभांगी भंडारे, सॅलेड व फ्रूट डेकोरेशन अनुक्रमे - उर्मिला पाटील, स्नेहल शिखरे, नीलम दबडे, लायमा शिकलगार. परीक्षक संगीता देवकर होत्या. कल्याणी बझारची बक्षिसे पूनम होनोले, राजेंद्र पाटील यांना मिळाली, तर मानाची कल्याणी पैठणी अश्विनी खटावकर यांना प्राप्त झाली. (प्रतिनिधी)