शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

कोविड काळात तणाव व्यवस्थापन काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:27 IST

कोल्हापूर : काही दिवसांपासून संपूर्ण जग कोविड महामारीने त्रस्त असून, यामुळे अनेक समस्या मानवी जीवनात उभ्या राहिल्या असून, विद्यापीठ ...

कोल्हापूर : काही दिवसांपासून संपूर्ण जग कोविड महामारीने त्रस्त असून, यामुळे अनेक समस्या मानवी जीवनात उभ्या राहिल्या असून, विद्यापीठ प्रशासनालासुद्धा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यातून कर्मचाऱ्यांसमोर समस्या निर्माण होत असून त्यांना विविध प्रकारच्या ताण-तणावाला सामोरे जावे लागत आहे. याचा परिणाम मानसिक आरोग्याबरोबर शारीरिक आरोग्यावर होत असून, यासाठी या ताण-तणावाचे योग्य व्यवस्थापन करण्याचे कौशल्य आत्मसात करणे काळाची गरज असल्याचे मत शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक शिक्षणतज्ज्ञ डॉ. बी. एम. हिर्डेकर यांनी व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ सेवक संघ व कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रातर्फे आयोजित महाराष्ट्रातील विद्यापीठ कर्मचारी व त्यांचे कुटुंबीयांसाठी ‘कोविड काळातील व्यवस्थापन’ या विषयावरील पाच दिवसीय व्याख्यानमालेतील पहिले पुष्प डॉ. हिर्डेकर यांनी गुंफले. या वेळी प्रा. डॉ. ए. एम. गुरव, बाबा सावंत उपस्थित होते. ताण-तणाव योग्य व्यवस्थापनाने कमी करता येतो. व्यक्तीला येणारा तणाव हा इतर कारणामुळे कमी, परंतु त्या व्यक्तीच्या नकारात्मक दृष्टिकोनातून जास्त तणाव निर्माण होत असतो. यासाठी परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याची सवय प्रत्येकाने करून घेणे गरजेचे असल्याचे डॉ. हिर्डेकर यांनी सांगितले. अतुल एतवाडकर यांनी आभार मानले.