शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

उदगावमध्ये रस्ता सुरक्षितता उपाययोजनांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:13 IST

शुभम गायकवाड / उदगाव : सांगली-कोल्हापूर महामार्ग हा नेहमीच गजबजलेला असतो. वाढत्या वाहतुकीमुळे हा महामार्ग पुन्हा मृत्यूचा सापळा बनत ...

शुभम गायकवाड / उदगाव : सांगली-कोल्हापूर महामार्ग हा नेहमीच गजबजलेला असतो. वाढत्या वाहतुकीमुळे हा महामार्ग पुन्हा मृत्यूचा सापळा बनत आहे. रस्ता सुरक्षिततेसाठी आंदोलनेही झाली आहेत. सांगली-कोल्हापूर मुख्य महामार्ग हा उदगावच्या प्रवेशद्वारातूनच जातो. वाहतुकीच्या कोंडीची सुरुवातच उदगावपासून होत आहे. कोंडीमुळे वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे उदगावच्या प्रवेशद्वारालाच ही परिस्थिती असल्याने गावचा श्वास गुदमरत आहे. उदगाव हे कोल्हापूर जिल्ह्याचे सुरुवातीचे गाव आहे. लगतच दोन औद्योगिक वसाहती आहेत. याच मार्गावरून पाच साखर कारखान्यांची वाहतूक सुरू असते. अवजड वाहतूक उदगाव-शिरोळ बायपास मार्गाने करावी; तर सामान्य वाहतूक उदगाव-जयसिंगपूर मार्गे करावी, असे स्पष्ट निर्देश आहेत. तरीदेखील वाहनचालक मनमानी करीत असल्याने वाहतूक समस्या निर्माण होत आहेत.

गेल्या महिन्याभरात अपघातात सहाजणांनी जीव गमावला; तर पंधराजण जखमी झाले आहेत. उदगावच्या रेल्वे पुलाजवळील कमानही अवजड वाहतुकीमुळे पडली होती. असे असतानाही त्यावर उपाययोजना होताना दिसत नाही. जर अवजड वाहतूकदार त्यांची मनमानी करीत असतील यावर मोठे आंदोलन करू, अशी नागरिकांची भूमिका असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.

-----------------

कोट -

उदगाव येथील रेल्वे पूल व रिलायन्स पंप येथे पांढरे पट्टे मारणे व गतिरोधक बसविणे, दिशादर्शक फलक लावणे अशा उपाययोजना आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू; तर टेक्निकल शाळेजवळही विद्यार्थ्यांची सुरक्षितता म्हणून पांढरे पट्टे मारण्यात येतील.

- जे. सी. बागवान, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम

-------------------- कोट

सांगली-कोल्हापूर महामार्ग हा नेहमीच वर्दळीचा आहे. त्यावर रस्ता चौपदरी करणे, उड्डाणपूल बांधणे हे प्रश्न उच्चस्तरीय जरी असले तरी स्थानिक प्रशासनाने सामान्य उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.

- अशोक वरेकर, उदगाव ग्रामस्थ.

फोटो - १९०२२०२१-जेएवाय-०६

फोटो ओळ - सांगली-कोल्हापूर महामार्गावरील उदगावच्या प्रवेशद्वाराला वाहतुकीच्या कोंडीला सुरुवात होते.