शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

जैन समाजाच्या तत्त्वांची देशाला गरज

By admin | Updated: August 29, 2014 00:54 IST

जिल्हाधिकारी एन. जयराम : सदलगा येथे शांती सद्भावना रॅली

निपाणी : सत्य, संयम आणि अहिंसा यांबाबत जैन समाजाला तत्त्वांची देणगी आहे. त्यामुळेच देशबांधव सुखी, समाधानी जीवन जगत आहेत. जगाच्या तुलनेत भारत देश जैन तत्त्वे आणि सिद्धांतामुळे आपले वेगळे अस्तित्व टिकवून आहे. म्हणूनच जैन समाजाच्या तत्त्वांची देशाला खरी गरज आहे, असे प्रतिपादन बेळगावचे जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी केले.सदलगा येथे शाकाहार, अहिंसा, राष्ट्रीय एकात्मता, व्यसनमुक्ती, सद्भावना रॅलीचे उद्घाटन करून ते बोलत होते. प्रारंभी सदलगा हायस्कूलमध्ये धर्मध्वजवंदन आणि शांतिमंत्रपठण झाले. सद्भावना रॅलीमध्ये बाळासाहेब पाटील याच्या हस्ते शांतिकलशाचे पूजन झाले; तर प्रकाश पाटील यांच्या हस्ते शांतिरथाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी खासदार प्रकाश हुक्केरी म्हणाले, शांतिसागर महाराज पुण्यतिथीचा कार्यक्रम हा इतिहास आहे. याठिकाणी कायमस्वरूपी काम करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. जैन समाजाची तत्त्वे वेगळी असून त्यामुळे मानसिक समाधान मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. भर पावसातही सद्भावना रॅलीत हजारो श्रावक-श्राविका सहभागी झाल्या होत्या. रॅलीमध्ये विविध भागांतील जैन मुनी संघ, दयोदय जीवरक्षा केंद्र, झाडे लावा, झाडे जगवा, गोमटेश मस्तकाभिषेक, आधुनिक शेतीप्रयोग, राष्ट्रीय एकात्मता, जय जवान-जय किसान, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव असे ॅविविध ऐतिहासिक देखावे सादर करण्यात आले.कार्यक्रमास दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, अण्णासाहेब गुंडकल्ले, रावसाहेब कुन्नुरे, पापा पाटील, सदाशिव वाळके, संजय गोपलकर, सागर चौगुले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)