शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जैन समाजाच्या तत्त्वांची देशाला गरज

By admin | Updated: August 29, 2014 00:54 IST

जिल्हाधिकारी एन. जयराम : सदलगा येथे शांती सद्भावना रॅली

निपाणी : सत्य, संयम आणि अहिंसा यांबाबत जैन समाजाला तत्त्वांची देणगी आहे. त्यामुळेच देशबांधव सुखी, समाधानी जीवन जगत आहेत. जगाच्या तुलनेत भारत देश जैन तत्त्वे आणि सिद्धांतामुळे आपले वेगळे अस्तित्व टिकवून आहे. म्हणूनच जैन समाजाच्या तत्त्वांची देशाला खरी गरज आहे, असे प्रतिपादन बेळगावचे जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी केले.सदलगा येथे शाकाहार, अहिंसा, राष्ट्रीय एकात्मता, व्यसनमुक्ती, सद्भावना रॅलीचे उद्घाटन करून ते बोलत होते. प्रारंभी सदलगा हायस्कूलमध्ये धर्मध्वजवंदन आणि शांतिमंत्रपठण झाले. सद्भावना रॅलीमध्ये बाळासाहेब पाटील याच्या हस्ते शांतिकलशाचे पूजन झाले; तर प्रकाश पाटील यांच्या हस्ते शांतिरथाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी खासदार प्रकाश हुक्केरी म्हणाले, शांतिसागर महाराज पुण्यतिथीचा कार्यक्रम हा इतिहास आहे. याठिकाणी कायमस्वरूपी काम करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. जैन समाजाची तत्त्वे वेगळी असून त्यामुळे मानसिक समाधान मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. भर पावसातही सद्भावना रॅलीत हजारो श्रावक-श्राविका सहभागी झाल्या होत्या. रॅलीमध्ये विविध भागांतील जैन मुनी संघ, दयोदय जीवरक्षा केंद्र, झाडे लावा, झाडे जगवा, गोमटेश मस्तकाभिषेक, आधुनिक शेतीप्रयोग, राष्ट्रीय एकात्मता, जय जवान-जय किसान, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव असे ॅविविध ऐतिहासिक देखावे सादर करण्यात आले.कार्यक्रमास दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, अण्णासाहेब गुंडकल्ले, रावसाहेब कुन्नुरे, पापा पाटील, सदाशिव वाळके, संजय गोपलकर, सागर चौगुले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)