शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

जैन समाजाच्या तत्त्वांची देशाला गरज

By admin | Updated: August 29, 2014 00:54 IST

जिल्हाधिकारी एन. जयराम : सदलगा येथे शांती सद्भावना रॅली

निपाणी : सत्य, संयम आणि अहिंसा यांबाबत जैन समाजाला तत्त्वांची देणगी आहे. त्यामुळेच देशबांधव सुखी, समाधानी जीवन जगत आहेत. जगाच्या तुलनेत भारत देश जैन तत्त्वे आणि सिद्धांतामुळे आपले वेगळे अस्तित्व टिकवून आहे. म्हणूनच जैन समाजाच्या तत्त्वांची देशाला खरी गरज आहे, असे प्रतिपादन बेळगावचे जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी केले.सदलगा येथे शाकाहार, अहिंसा, राष्ट्रीय एकात्मता, व्यसनमुक्ती, सद्भावना रॅलीचे उद्घाटन करून ते बोलत होते. प्रारंभी सदलगा हायस्कूलमध्ये धर्मध्वजवंदन आणि शांतिमंत्रपठण झाले. सद्भावना रॅलीमध्ये बाळासाहेब पाटील याच्या हस्ते शांतिकलशाचे पूजन झाले; तर प्रकाश पाटील यांच्या हस्ते शांतिरथाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी खासदार प्रकाश हुक्केरी म्हणाले, शांतिसागर महाराज पुण्यतिथीचा कार्यक्रम हा इतिहास आहे. याठिकाणी कायमस्वरूपी काम करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. जैन समाजाची तत्त्वे वेगळी असून त्यामुळे मानसिक समाधान मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. भर पावसातही सद्भावना रॅलीत हजारो श्रावक-श्राविका सहभागी झाल्या होत्या. रॅलीमध्ये विविध भागांतील जैन मुनी संघ, दयोदय जीवरक्षा केंद्र, झाडे लावा, झाडे जगवा, गोमटेश मस्तकाभिषेक, आधुनिक शेतीप्रयोग, राष्ट्रीय एकात्मता, जय जवान-जय किसान, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव असे ॅविविध ऐतिहासिक देखावे सादर करण्यात आले.कार्यक्रमास दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, अण्णासाहेब गुंडकल्ले, रावसाहेब कुन्नुरे, पापा पाटील, सदाशिव वाळके, संजय गोपलकर, सागर चौगुले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)