शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

कुरुंदवाडच्या विकासासाठी सकारात्मक निर्णयांची गरज

By admin | Updated: November 5, 2014 00:22 IST

संस्थानकालीन भालचंद्र थिएटरचा प्रश्न : न्यायालयीन वाद येताहेत शहराच्या विकासाआड

गणपती कोळी - कुरुंदवाड -येथील संस्थानकालीन भालचंद्र थिएटर पाडून त्याठिकाणी शॉपिंग सेंटर बांधण्याच्या पालिकेच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे हा प्रश्न न्यायालयीन वादात सापडला असून पालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी, शहराच्या विकासासाठी राजकारण, प्रतिष्ठा बाजूला ठेवून पालिका पदाधिकारी, अधिकारी व याचिकाकर्त्यांनी एकत्रित येऊन शहराच्या विकासासाठी सकारात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. न्यायालयीन वाद शहराच्या विकासाला आड येऊ शकतो.शहर व परिसरातील लोकांना करमणुकीसाठी १९१७ साली पटवर्धन सरकारांनी भालचंद्र मेमोरियल हॉल बांधला आहे. सुमारे बारा ते पंधरा गुंठ्यांमध्ये हॉल आहे. संस्थानकाळानंतर या थिएटरचा ताबा पालिकेकडे आला. थिएटर चालविण्यासाठी ठेका दिला जातो. शहराची वाढती लोकसंख्या, त्यांच्या प्राथमिक गरजा भागविण्यासाठी पालिकेला करावी लागत असलेली कसरत यासाठी पालिकेने उत्पन्नवाढीकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या थिएटरपासून पालिकेला फारसे उत्पन्नही मिळत नाही. अन् घरोघरी अत्याधुनिक दूरचित्रवाहिनी संच असल्याने छोट्या पडद्यांवरील सिनेमा पाहणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे ही इमारत पाडून त्याठिकाणी शहरात भेडसावणारा तळमजल्यावर पार्किंग, दुसऱ्या मजल्यावर शॉपिंग सेंटर व अत्याधुनिक सिनेमागृह बांधण्यासाठी साडेपाच कोटी रुपये खर्चाच्या कामाला काही महिन्यांपूर्वी पालिका सभागृहाने मंजुरी दिली होती. त्याप्रमाणे नकाशा तयार करणे, इस्टिमेट करणे, बजेट मंजूर करून घेण्याचे कामही सुरू होते.मात्र, या इमारतीचे संवर्धन करावे यासाठी शहरातील कृष्णा लोकरे, अविनाश गुदले यांच्यासह चौघांनी पालिकेच्या ठरावाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर शनिवारी, पहिली सुनावणी होऊन थिएटर पाडण्याला तात्पुरती स्थगिती दिल्यामुळे शहराच्या विकासाचा प्रश्न न्यायालयीन वादात सापडला आहे. वादातून शहराचा विकास होणार नाही. त्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन शहराच्या विकासासाठी सकारात्मक निर्णय घेऊन त्यावर तोडगा काढण्याची गरज आहे.शहरातील वाहन पार्किंगचा प्रश्न, खोकीधारकांना दुकानगाळ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी शॉपिंग सेंटर बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पार्किंगचा प्रश्नही मिटणार आहे. शिवाय पालिकेला दुकानगाळ्यांचे वर्षाला लाखो रुपयांचे अतिरिक्त सिनेमागृह बांधण्याचे इस्टिमेट आहे. त्यामुळे शहराच्या वैभवासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे. - संजय खोत, नगराध्यक्ष