शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

आॅक्सिजन पार्कची गरज

By admin | Updated: May 10, 2017 21:10 IST

वृक्षलागवडीची ओढ प्रत्येकाला निर्माण झाली पाहिजे यासाठी जनजागृती होणे गरजेचे

वृक्षांच्या माध्यमातून सावली मिळणे गरजेचे आहे. भविष्यात तापलेल्या शहरांमध्ये वृक्षलागवडीच्या माध्यमातून मोठा आॅक्सिजन पार्क उभा करण्याची गरज निर्माण होणार आहे. जिल्ह्यातही बांधाबांधावर चारीबाजूंनी वृक्षलागवड केल्यास शेतकऱ्यांची हद्दही निश्चित होईल आणि झाडाच्या सावलीखाली थोडी विश्रांतीही घेता येईल. कोल्हापुरात निसर्गमित्र संस्थेसारख्या काही संस्थेने जाणीवपूर्वक विविध उपक्रम आधीच सुरू केले आहेत. त्यांच्या एकेकट्या उपक्रमाला सामूहिक साथीची गरज आहे. दुर्मिळ वृक्षांचे जतन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यातून पर्यावरणाचाही समतोल साधता येईल.मोकळ्या जागी वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न करणे, त्याची लॅण्ड बँक तयार करणे, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड करणे महत्त्वाचे आहे. वन विभागाचे अधिकारी आणि प्रशासन दरवर्षी नेमेचि येतो मग पावसाळा या उक्तीनुसार काम करतात; पण या कामाला गती मिळत नाही. राज्य शासनाने जलयुक्त शिवारसारखा कार्यक्रम सुरू केला आहे. त्याच धर्तीवर वृक्षलागवडीचा आणि तो जतन करण्यासाठीही विशेष उपक्रम सुरू करणे गरजेचे आहे. यामध्ये पाणी फाउंडेशन, नामफाउंडेशन यासारख्या स्वयंसेवी संस्थांची मदत घेता येईल का याचीही चाचपणी करावी. वृक्षलागवडीसाठी पुरेशी आणि दर्जेदार रोपे रोपवाटिकांमधून आणली पाहिजेत. रोप लागवडीची स्थळ निश्चिती करणे, खड्डे तयार करून त्यात खत टाकून ठेवणे, वृक्षारोपण कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन करणे, रोप लावण्यासाठी लोकांना प्रेरित करून त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग मिळविणे गरजेचे आहे. लावलेले वृक्ष जगले पाहिजेत यासाठी जाणीवपूर्वक काम करण्याची गरज आहे. वृक्षलागवडीची ओढ प्रत्येकाला निर्माण झाली पाहिजे यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. यासाठी जागोजागी वृक्षलागवडीने आॅक्सिजन पार्क तयार होतील.संदीप आडनाईक