शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आॅक्सिजन पार्कची गरज

By admin | Updated: May 10, 2017 21:10 IST

वृक्षलागवडीची ओढ प्रत्येकाला निर्माण झाली पाहिजे यासाठी जनजागृती होणे गरजेचे

वृक्षांच्या माध्यमातून सावली मिळणे गरजेचे आहे. भविष्यात तापलेल्या शहरांमध्ये वृक्षलागवडीच्या माध्यमातून मोठा आॅक्सिजन पार्क उभा करण्याची गरज निर्माण होणार आहे. जिल्ह्यातही बांधाबांधावर चारीबाजूंनी वृक्षलागवड केल्यास शेतकऱ्यांची हद्दही निश्चित होईल आणि झाडाच्या सावलीखाली थोडी विश्रांतीही घेता येईल. कोल्हापुरात निसर्गमित्र संस्थेसारख्या काही संस्थेने जाणीवपूर्वक विविध उपक्रम आधीच सुरू केले आहेत. त्यांच्या एकेकट्या उपक्रमाला सामूहिक साथीची गरज आहे. दुर्मिळ वृक्षांचे जतन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यातून पर्यावरणाचाही समतोल साधता येईल.मोकळ्या जागी वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न करणे, त्याची लॅण्ड बँक तयार करणे, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड करणे महत्त्वाचे आहे. वन विभागाचे अधिकारी आणि प्रशासन दरवर्षी नेमेचि येतो मग पावसाळा या उक्तीनुसार काम करतात; पण या कामाला गती मिळत नाही. राज्य शासनाने जलयुक्त शिवारसारखा कार्यक्रम सुरू केला आहे. त्याच धर्तीवर वृक्षलागवडीचा आणि तो जतन करण्यासाठीही विशेष उपक्रम सुरू करणे गरजेचे आहे. यामध्ये पाणी फाउंडेशन, नामफाउंडेशन यासारख्या स्वयंसेवी संस्थांची मदत घेता येईल का याचीही चाचपणी करावी. वृक्षलागवडीसाठी पुरेशी आणि दर्जेदार रोपे रोपवाटिकांमधून आणली पाहिजेत. रोप लागवडीची स्थळ निश्चिती करणे, खड्डे तयार करून त्यात खत टाकून ठेवणे, वृक्षारोपण कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन करणे, रोप लावण्यासाठी लोकांना प्रेरित करून त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग मिळविणे गरजेचे आहे. लावलेले वृक्ष जगले पाहिजेत यासाठी जाणीवपूर्वक काम करण्याची गरज आहे. वृक्षलागवडीची ओढ प्रत्येकाला निर्माण झाली पाहिजे यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. यासाठी जागोजागी वृक्षलागवडीने आॅक्सिजन पार्क तयार होतील.संदीप आडनाईक