शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
4
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
5
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
6
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
7
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
8
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
9
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
10
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
11
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
12
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
13
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
14
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
15
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
16
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
17
Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता
18
"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
19
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
20
अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
Daily Top 2Weekly Top 5

अंबाई जलतरण तलावासाठी पाठपुराव्याची गरज ( उत्तरार्ध)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:18 IST

अमर पाटील : कळंबा ४३ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या अंबाई जलतरण तलावाचे रूप एक कोटी वीस लाखांच्या पुनर्विकास योजनेतून बदलणार ...

अमर पाटील : कळंबा

४३ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या अंबाई जलतरण तलावाचे रूप एक कोटी वीस लाखांच्या पुनर्विकास योजनेतून बदलणार असून, ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव माफक फीमध्ये उभा राहून जलतरणपटू तसेच खेळाडूंचा वनवास संपणार हे निश्चित ७५:२५ योजनेअंतर्गत अंबाई जलतरण तलावाचा विकास होणार असून, एक कोटी २० लाखांपैकी शासन निधी ९० लाख, तर पालिका निधी ३० लाख असणार आहे. सद्याचा १५ मीटर रुंद व ३३ मीटर लांब तलाव २५ मीटर लांब व ५० मीटर रुंद होणार आहे. जुन्या तलावाची पाणी खोली सात मीटर आहे, ती आता सर्वत्र समान १.५ मीटर असणार आहे. पुनर्विकासात नवीन भव्य प्रवेशद्वार, प्रशस्त कार्यालय, मॅनेजर केबिन, प्रथमोपचार केबिन, स्टोअर रूम, प्रेक्षकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, स्वतंत्र पुरुष, महिलांचे शॉवर व स्वच्छतागृहे असणार आहेत. पारंपरिक फिल्टरेशन प्लांट बदलून अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात येणार आहे. दहा स्टारटिंग ब्लॉक, लाईफ सेव्हिंग साधने, लेन मार्किंग, लेन सेप्रेटर लॅडर, तिकीट खिडकी, आदी सुविधांचा समावेश असणार आहे. ऑलिम्पिक दर्जाचा तलाव उभा करताना शासनाने पालिका कारभारावर अंकुश ठेवला आहे. तलावावर शासन क्रीडाशिक्षक नियुक्त करणार असून, क्रीडा बाबींखेरीज अन्य करणांसाठी तलावाचा वापर होणार नाही. शासकीय स्पर्धेसाठी मोफत, तर नागरिकांसाठी अल्प फीमध्ये तलाव उपलब्ध होणार आहे. सेवा-सुविधांचा खर्च पालिकेस पाहावा लागणार असून, बांधकाम अंदाजपत्रकात वाढ झाल्यास पालिकेस आर्थिक उपाययोजना करावी लागेल. ऑलिम्पिक दर्जाच्या तलावाचे काम पूर्णत्वास गेल्यास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कोल्हापूरची कीर्ती पसरणार असून, २०१७ पासून प्रशासकीय ताकतुंब्यात अडकलेल्या कामास गती मिळावी यासाठी आता प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची गरज आहे. शासन व पालिका निधीतून क्रीडाविश्वास उभारी देणारा हा प्रकल्प असल्याने सामूहिक प्रयत्नांची आता गरज आहे. श्रेयवादाचे राजकारण नको. अंबाई जलतरण तलावाच्या पुनर्विकासासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी त्यावेळी आमदार अमल महाडिक यांनी पाठपुरावा केला, परंतु पालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असल्याने एकाच विकासकामांचे दोन वेळा नारळ फोडण्यासाठीचे श्रेयवादाचे राजकारण गाजले होते. आता किमान श्रेयवाद बाजूला सारून तलावाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एकजुटीने काम करणे गरजेचे आहे.