शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

अंबाई जलतरण तलावासाठी पाठपुराव्याची गरज ( उत्तरार्ध)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:18 IST

अमर पाटील : कळंबा ४३ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या अंबाई जलतरण तलावाचे रूप एक कोटी वीस लाखांच्या पुनर्विकास योजनेतून बदलणार ...

अमर पाटील : कळंबा

४३ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या अंबाई जलतरण तलावाचे रूप एक कोटी वीस लाखांच्या पुनर्विकास योजनेतून बदलणार असून, ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव माफक फीमध्ये उभा राहून जलतरणपटू तसेच खेळाडूंचा वनवास संपणार हे निश्चित ७५:२५ योजनेअंतर्गत अंबाई जलतरण तलावाचा विकास होणार असून, एक कोटी २० लाखांपैकी शासन निधी ९० लाख, तर पालिका निधी ३० लाख असणार आहे. सद्याचा १५ मीटर रुंद व ३३ मीटर लांब तलाव २५ मीटर लांब व ५० मीटर रुंद होणार आहे. जुन्या तलावाची पाणी खोली सात मीटर आहे, ती आता सर्वत्र समान १.५ मीटर असणार आहे. पुनर्विकासात नवीन भव्य प्रवेशद्वार, प्रशस्त कार्यालय, मॅनेजर केबिन, प्रथमोपचार केबिन, स्टोअर रूम, प्रेक्षकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, स्वतंत्र पुरुष, महिलांचे शॉवर व स्वच्छतागृहे असणार आहेत. पारंपरिक फिल्टरेशन प्लांट बदलून अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात येणार आहे. दहा स्टारटिंग ब्लॉक, लाईफ सेव्हिंग साधने, लेन मार्किंग, लेन सेप्रेटर लॅडर, तिकीट खिडकी, आदी सुविधांचा समावेश असणार आहे. ऑलिम्पिक दर्जाचा तलाव उभा करताना शासनाने पालिका कारभारावर अंकुश ठेवला आहे. तलावावर शासन क्रीडाशिक्षक नियुक्त करणार असून, क्रीडा बाबींखेरीज अन्य करणांसाठी तलावाचा वापर होणार नाही. शासकीय स्पर्धेसाठी मोफत, तर नागरिकांसाठी अल्प फीमध्ये तलाव उपलब्ध होणार आहे. सेवा-सुविधांचा खर्च पालिकेस पाहावा लागणार असून, बांधकाम अंदाजपत्रकात वाढ झाल्यास पालिकेस आर्थिक उपाययोजना करावी लागेल. ऑलिम्पिक दर्जाच्या तलावाचे काम पूर्णत्वास गेल्यास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कोल्हापूरची कीर्ती पसरणार असून, २०१७ पासून प्रशासकीय ताकतुंब्यात अडकलेल्या कामास गती मिळावी यासाठी आता प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची गरज आहे. शासन व पालिका निधीतून क्रीडाविश्वास उभारी देणारा हा प्रकल्प असल्याने सामूहिक प्रयत्नांची आता गरज आहे. श्रेयवादाचे राजकारण नको. अंबाई जलतरण तलावाच्या पुनर्विकासासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी त्यावेळी आमदार अमल महाडिक यांनी पाठपुरावा केला, परंतु पालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असल्याने एकाच विकासकामांचे दोन वेळा नारळ फोडण्यासाठीचे श्रेयवादाचे राजकारण गाजले होते. आता किमान श्रेयवाद बाजूला सारून तलावाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एकजुटीने काम करणे गरजेचे आहे.