शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

भांडवलशाहीविरुद्ध लढा उभारण्याची गरज : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:20 IST

जयसिंगपूर : चळवळीचा हेतू स्पष्ट असला की चळवळीची ध्येय आणि उद्दिष्टे साध्य होतात. शाळा आणि महाविद्यालय या नफेखोरीसाठी नसून ...

जयसिंगपूर : चळवळीचा हेतू स्पष्ट असला की चळवळीची ध्येय आणि उद्दिष्टे साध्य होतात. शाळा आणि महाविद्यालय या नफेखोरीसाठी नसून ज्ञान आदान-प्रदानासाठी असतात. परंतु, सध्याच्या काळात या पैशाच्या स्रोत बनल्या आहेत आणि यातून भांडवलशाही पुढे येत आहेत. याविरुद्ध लढा उभा करणे ही गरज बनली आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. जयसिंगपूर येथील आयएमए सभागृहात स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकारी नियुक्ती मेळावा पार पडला. यावेळी शेट्टी म्हणाले, विद्यार्थी चळवळ ही लोक चळवळ बनली पाहिजे. माझ्यावर विद्यार्थिदशेतच चळवळीचे संस्कार झाले म्हणूनच मी घडलो. विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी निघाले आहेत. शिक्षणाचा बाजार होऊ नये, याची कटाक्षाने काळजी घेतली पाहिजे. स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून एक नवे आंदोलन उभे करू, अशी घोषणा त्यांनी केली.

स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. जालिंदर पाटील यांनी विद्यार्थी चळवळीचा इतिहास नमूद करून चळवळ कशी उभी केली पाहिजे, संघटन कसे असले पाहिजे आणि योग्य ध्येय व धोरणे आखून चळवळ कशी पुढे नेता येईल याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

याप्रसंगी सावकर मादनाईक, अमोल हिप्परगे, जनार्दन पाटील, मिलिंद साखरपे, सागर शंभूशेटे, मिलिंद साखरपे, सचिन शिंदे, शैलेश आडके, तानाजी वठारे, सौरभ शेट्टी यांच्यासह सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील विद्यार्थी उपस्थित होते.

फोटो - ०३०१२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळ - जयसिंगपूर येथे विद्यार्थी परिषदेत पदनियुक्ती व अभ्यास शिबिर पार पडले.