शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
टेरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली...
3
...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार...
4
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
5
बाजाराचा मोह सोडा! ३ कोटी ९ लाखांचा मालक तर PPF चं बनवेल; फक्त पती-पत्नीला हा फॅार्म्युला वापरावा लागेल
6
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
7
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
8
Deep Amavasya 2025: दीप अमावास्येला दिवे उजळून 'अशी' करा शास्त्रोक्त पूजा आणि आरती!
9
"आपण भारतात राहतो, बंदूक घेऊन ठेवावी लागेल", प्रेग्नंसीवेळी घाबरलेली रिचा चड्डा; कारण काय?
10
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
11
पाच फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांतच विसर्जन करा, पर्यावरण विभागाची सूचना!
12
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
13
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
14
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
15
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
16
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार, गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा घेणारच : परब
18
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
19
‘उडत्या’ मिनेल्ले फारुकीची पाकिस्तानात चर्चा; ठरली देशातील सर्वात युवा पायलट!
20
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी

भांडवलशाहीविरुद्ध लढा उभारण्याची गरज : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:20 IST

जयसिंगपूर : चळवळीचा हेतू स्पष्ट असला की चळवळीची ध्येय आणि उद्दिष्टे साध्य होतात. शाळा आणि महाविद्यालय या नफेखोरीसाठी नसून ...

जयसिंगपूर : चळवळीचा हेतू स्पष्ट असला की चळवळीची ध्येय आणि उद्दिष्टे साध्य होतात. शाळा आणि महाविद्यालय या नफेखोरीसाठी नसून ज्ञान आदान-प्रदानासाठी असतात. परंतु, सध्याच्या काळात या पैशाच्या स्रोत बनल्या आहेत आणि यातून भांडवलशाही पुढे येत आहेत. याविरुद्ध लढा उभा करणे ही गरज बनली आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. जयसिंगपूर येथील आयएमए सभागृहात स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकारी नियुक्ती मेळावा पार पडला. यावेळी शेट्टी म्हणाले, विद्यार्थी चळवळ ही लोक चळवळ बनली पाहिजे. माझ्यावर विद्यार्थिदशेतच चळवळीचे संस्कार झाले म्हणूनच मी घडलो. विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी निघाले आहेत. शिक्षणाचा बाजार होऊ नये, याची कटाक्षाने काळजी घेतली पाहिजे. स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून एक नवे आंदोलन उभे करू, अशी घोषणा त्यांनी केली.

स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. जालिंदर पाटील यांनी विद्यार्थी चळवळीचा इतिहास नमूद करून चळवळ कशी उभी केली पाहिजे, संघटन कसे असले पाहिजे आणि योग्य ध्येय व धोरणे आखून चळवळ कशी पुढे नेता येईल याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

याप्रसंगी सावकर मादनाईक, अमोल हिप्परगे, जनार्दन पाटील, मिलिंद साखरपे, सागर शंभूशेटे, मिलिंद साखरपे, सचिन शिंदे, शैलेश आडके, तानाजी वठारे, सौरभ शेट्टी यांच्यासह सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील विद्यार्थी उपस्थित होते.

फोटो - ०३०१२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळ - जयसिंगपूर येथे विद्यार्थी परिषदेत पदनियुक्ती व अभ्यास शिबिर पार पडले.