शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

जगायला शिकवणाऱ्या शिक्षणाची गरज

By admin | Updated: September 20, 2014 00:29 IST

अभय बंग यांचे प्रतिपादन : सदानंद कदम, सु. र. सुनिती यांना पुरस्कार प्रदान

गारगोटी : ‘जीवन हेच शिक्षण’ ही संकल्पना रुजविण्यासाठी म. गांधी, विनोबा भावे यांची भूमिका आणि डॉ. जे. पी. नाईक यांची प्रयोगशीलता समजून घेतली पाहिजे. जगावे कसे हे शिकवणाऱ्या शिक्षणाची गरज आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केले. येथील इंजुबाई सांस्कृतिक हॉलमध्ये डॉ. जे. पी. नाईक प्रतिष्ठानचा पुरस्कार वितरण समारंभ आज, शुक्रवारी झाला. त्यावेळी डॉ. बंग बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य शासनाच्या ग्रंथ निवड समितीचे सदस्य डॉ. विजय निंबाळकर होते. डॉ. बंग म्हणाले, सध्याची शिक्षणपद्धती शिक्षकांच्या सोयीसाठी निर्माण के लेली व्यवस्था आहे. केवळ चार भिंतीच्या आत उभे राहून माहिती सांगणारे शिक्षक नाहीसे झाले पाहिजेत. जीवनातील समस्या कशा सोडवायच्या, हे शाळेत शिकवायला हवे. लहान मुले रांगताना, चालताना, पळताना, सायकल चालविताना किंवा दैनंदिन क्रिया करताना कुणी शिकविले? तसेच शिक्षणही जीवन जगताजगता मिळायला हवे. डॉ. जे. पी. नाईक प्राथमिक शिक्षक पुरस्कार सदानंद कदम (मिरज), तर डॉ. चित्रा नाईक समाजसेवा पुरस्कार सुनिती सु. र. (पुणे) यांना डॉ. अभय बंग यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी सदानंद कदम, सुनिती सु. र., डॉ. विजय निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त डॉ. जयंत कळके यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. राजन गवस यांनी परिचय करून दिला. डॉ. उदय शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला शिक्षण उपसंचालक मकरंद गोंधळी, सहसंचालक संपत गायकवाड, खंडेराव घाटगे, प्रा. बी. टी. ढेरे, व्ही. जे. कदम, आदी मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)