शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पाणी, शेतीच्या नवीन योजना तयार करण्याची गरज : दत्ता देशकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2017 17:12 IST

महाराष्ट्र जलदूत संमेलनात पाणी वापरावर विचारमंथन

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर : सध्याच्या बदलत्या पर्जन्यमानानुसार शेतकरी, कृषी विद्यापीठे आणि शासन यांनी एकत्र येवून पाणी आणि शेतीच्या नवीन योजना तयार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भारतीय जलसंस्कृती मुख्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. दत्ता देशकर यांनी बुधवारी येथे केले.

शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागात विश्व जल दिनानिमित्त आयोजित महाराष्ट्र जलदूत संमेलनामध्ये ते बोलत होते. तंत्रज्ञान अधिविभाग, भारतीय जलसंस्कृती मंडळ, इन्स्टिट्यूशन आॅफ इंजिनिअर्सतर्फे हे संमेलन घेण्यात आले. अध्यक्षस्थानी तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जयदीप बागी होते.

डॉ. देशकर म्हणाले, बदलत्या हवामानामुळे पर्जन्यमान अनिश्चित झाले आहे. त्याचा परिणाम अन्नधान्य आणि जीवनमानावर होत आहे. ते लक्षात घेवून प्रत्येकाने उपलब्ध पाण्याचा वापर योग्य पद्धतीने करावा. दरम्यान, डॉ. देशकर यांनी मार्गदर्शन करताना विश्व जल दिनाची सुरूवात कशी झाली, ती का करावी लागली, या मागणी शंभर वर्षातील पर्जन्यमान आणि त्यातील मूलभूत बदलांबाबतची माहिती दिली.

भूजल तज्ज्ञ शशांक देशपांडे यांनी महाराष्ट्रातील भूजल वापर व कायद्याची गरज याविषयावर मार्गदर्शन करताना त्यांनी महाराष्ट्राची पाण्याची स्थिती व त्याचा वापर, नियम याची माहिती दिली.

संमेलनातील दुपारच्या सत्रात पुण्यातील सागरमित्र अभियानचे संचालक विनोद बोधनकर म्हणाले, पाणी वापराबाबत समाजात जागृती व्हावी. त्यासाठीच्या चळवळीत युवकांनी सहभागी व्हावे आवाहन केले.

भारतीय जलसंस्कृती मंडळाचे कोल्हापूर अध्यक्ष प्रा. डॉ. अनिलराज जगदाळे यांनी पाणी साठवणूक, भूजल पुनर्रभरण, जलप्रदूषण नियंत्रण, स्वच्छता अभियान, चांगल्या आरोग्यसेवा, निर्मलग्राम योजना, ऊर्जा निर्मिती, विकास व नवीन तंत्रज्ञान याबाबत मार्गदर्शन केले.

डॉ. बागी यांनी जलसंवर्धनाबाबत प्रबोधनासाठी महाविद्यालय, शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. संमेलनात मंगेश जाधव, निशांत पुजारी या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. प्रा. महेश साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. रविना पुजारी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अमोल कुलकर्णी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

जलस्थापत्य परिषद घेण्याचा निर्णय

पाणी वापराबाबत प्रबोधन करण्याच्या उद्देशाने येत्या चार महिन्यांत कोल्हापूरमध्ये जलस्थापत्य परिषद घेण्याचा निर्णय या संमेलनात घेण्यात आला. यात प्राचीन काळापासून आतापर्यंतचे जलसंवर्धनाचे प्रयोग, उपायांचा आढावा, याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन, आदी आयोजित करण्यात येतील. त्याची तयारी सुरू झाली असल्याचे प्रा. अमोल कुलकर्णी यांनी सांगितले.