शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
4
बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
5
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
6
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
7
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
8
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
9
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
10
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
11
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
12
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
13
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
14
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
15
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
16
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
17
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
18
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
19
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
20
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन

पाणी, शेतीच्या नवीन योजना तयार करण्याची गरज : दत्ता देशकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2017 17:12 IST

महाराष्ट्र जलदूत संमेलनात पाणी वापरावर विचारमंथन

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर : सध्याच्या बदलत्या पर्जन्यमानानुसार शेतकरी, कृषी विद्यापीठे आणि शासन यांनी एकत्र येवून पाणी आणि शेतीच्या नवीन योजना तयार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भारतीय जलसंस्कृती मुख्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. दत्ता देशकर यांनी बुधवारी येथे केले.

शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागात विश्व जल दिनानिमित्त आयोजित महाराष्ट्र जलदूत संमेलनामध्ये ते बोलत होते. तंत्रज्ञान अधिविभाग, भारतीय जलसंस्कृती मंडळ, इन्स्टिट्यूशन आॅफ इंजिनिअर्सतर्फे हे संमेलन घेण्यात आले. अध्यक्षस्थानी तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जयदीप बागी होते.

डॉ. देशकर म्हणाले, बदलत्या हवामानामुळे पर्जन्यमान अनिश्चित झाले आहे. त्याचा परिणाम अन्नधान्य आणि जीवनमानावर होत आहे. ते लक्षात घेवून प्रत्येकाने उपलब्ध पाण्याचा वापर योग्य पद्धतीने करावा. दरम्यान, डॉ. देशकर यांनी मार्गदर्शन करताना विश्व जल दिनाची सुरूवात कशी झाली, ती का करावी लागली, या मागणी शंभर वर्षातील पर्जन्यमान आणि त्यातील मूलभूत बदलांबाबतची माहिती दिली.

भूजल तज्ज्ञ शशांक देशपांडे यांनी महाराष्ट्रातील भूजल वापर व कायद्याची गरज याविषयावर मार्गदर्शन करताना त्यांनी महाराष्ट्राची पाण्याची स्थिती व त्याचा वापर, नियम याची माहिती दिली.

संमेलनातील दुपारच्या सत्रात पुण्यातील सागरमित्र अभियानचे संचालक विनोद बोधनकर म्हणाले, पाणी वापराबाबत समाजात जागृती व्हावी. त्यासाठीच्या चळवळीत युवकांनी सहभागी व्हावे आवाहन केले.

भारतीय जलसंस्कृती मंडळाचे कोल्हापूर अध्यक्ष प्रा. डॉ. अनिलराज जगदाळे यांनी पाणी साठवणूक, भूजल पुनर्रभरण, जलप्रदूषण नियंत्रण, स्वच्छता अभियान, चांगल्या आरोग्यसेवा, निर्मलग्राम योजना, ऊर्जा निर्मिती, विकास व नवीन तंत्रज्ञान याबाबत मार्गदर्शन केले.

डॉ. बागी यांनी जलसंवर्धनाबाबत प्रबोधनासाठी महाविद्यालय, शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. संमेलनात मंगेश जाधव, निशांत पुजारी या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. प्रा. महेश साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. रविना पुजारी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अमोल कुलकर्णी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

जलस्थापत्य परिषद घेण्याचा निर्णय

पाणी वापराबाबत प्रबोधन करण्याच्या उद्देशाने येत्या चार महिन्यांत कोल्हापूरमध्ये जलस्थापत्य परिषद घेण्याचा निर्णय या संमेलनात घेण्यात आला. यात प्राचीन काळापासून आतापर्यंतचे जलसंवर्धनाचे प्रयोग, उपायांचा आढावा, याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन, आदी आयोजित करण्यात येतील. त्याची तयारी सुरू झाली असल्याचे प्रा. अमोल कुलकर्णी यांनी सांगितले.