शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

शाहूनगरीतच वैचारिक मशागतीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 00:55 IST

कोल्हापूर : कोल्हापूर ही विचारांची खाण आहे. मात्र याच कोल्हापुरामध्ये शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार मागे पडतो की काय, असे वातावरण तयार झाले आहे. म्हणूनच याच नगरीत आता वैचारिक मशागतीची गरज आहे, असे मत पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी रविवारी व्यक्त केले.गंगाराम कांबळे यांच्या सत्यसुधारक हॉटेलच्या शताब्दीनिमित्त आयोजित राजर्षी शाहू समता परिषदेमध्ये ...

कोल्हापूर : कोल्हापूर ही विचारांची खाण आहे. मात्र याच कोल्हापुरामध्ये शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार मागे पडतो की काय, असे वातावरण तयार झाले आहे. म्हणूनच याच नगरीत आता वैचारिक मशागतीची गरज आहे, असे मत पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी रविवारी व्यक्त केले.गंगाराम कांबळे यांच्या सत्यसुधारक हॉटेलच्या शताब्दीनिमित्त आयोजित राजर्षी शाहू समता परिषदेमध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरला पाटील होत्या. यावेळी प्रा. विठ्ठल बन्ने, बापूसो कांबळे, भिकशेठ पाटील, प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार, गणेश काळे व मुस्लिम बोर्डिंगचा यावेळी महाराव यांच्या हस्ते राजर्षी शाहू समता पुरस्काराने गौरव करण्यात आला. तसेच गंगाराम कांबळे यांचे नातू अरुण, राजेंद्र कांबळे, लीलाबाई कांबळे यांचाही सत्कार करण्यात आला. गणी आजरेकर, आदिल फरास, कादर मलबारी यांनी मुस्लिम बोर्डिंगचा पुरस्कार स्वीकारला. यावेळी कोल्हापुरातील ८५ समाज संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत ऐक्याची ग्वाही दिली.रोखठोक भूमिका मांडताना महाराव म्हणाले, फसविणारे जाळी घेऊन बसले आहेत. प्रांत, भाषा, जात, आहार यांच्या माध्यमातून भेद निर्माण केले जात आहेत. याच कोल्हापुरात अंबाबाईचा नवराही जिथे बदलला जातोय तिथे सामान्य माणसाचे काय? अनेक उघडीनागडी माणसे असताना देवाला महागड्या साड्यांची गरज काय? या सगळ्याची शरम वाटली पाहिजे. ३३ कोटी देवांना जे जमले नाही ते एकट्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी करून दाखविले. मात्र, कोरेगाव भीमाच्या घटनेमध्ये ज्यांचा हात आहे, असे संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे अजून दीड महिना मोकळे कसे? त्यांना आत टाकण्यासाठी तुम्ही आग्रह धरण्याची गरज आहे.सत्यशोधकी खोटारडे आहेत; तर ‘बापू’, ‘बाबा’ हे काळ्या पैशांवर मठ चालवीत आहेत. राजर्षी शाहू महाराजांचे नाव घेता; मात्र याच कोल्हापूरला खचवण्याचं काम सुरू आहे. रामाच्या पारावर पूर्वी व्याख्यानं होत होती. आता तिथं दरवर्षी नुसता पाळणा हलविला जात असणार आणि छोटा राम त्यात ठेवला जात असणार! हा राम मोठा कधी होणार? पाळणा हलवून धर्म मोठा होत नाही, उलट छोटा होतो.बबन रानगे यांनी स्वागत केले. वसंतराव मुळीक यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, कोल्हापुरात सुसंवादी वातावरण तयार करण्यासाठी ही परिषद आयोजित केली आहे. इंद्रजित सावंत म्हणाले, सवर्णांच्या हौदावरील पाणी घेतले म्हणून मराठ्यांनी गंगाराम कांबळेंना फोडून काढले. शाहू महाराजांनी याच मराठ्यांना गंगाराम यांच्या हॉटेलात चहा प्यायला भाग पाडले. याच कोल्हापुरात आता अंबाबाई मंदिरातील भटांच्या प्रेरणेतून राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीजवळ पंडितांची समाधी उभारण्याची मागणी सुरू आहे. शाहू जन्मस्थळाला १३ कोटी अजून मिळाले नाहीत. महाराज आणि डॉ. आंबेडकरांची भेट झालेली इमारत पाडली गेली.पेठापेठांमधील शाहूविचार आता राहिलेला नाही. यावेळी पापाभाई बागवान, प्रा. विश्वास देशमुख, व्यंकाप्पा भोसले, जिल्हा पोलीसप्रमुख संजय मोहिते उपस्थित होते.मराठा मोर्चात फुले, आंबेडकर का वगळले?कोल्हापुरात विराट मराठा मोर्चा निघाला. मग शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेणाºयांनी फुले, आंबेडकर त्यातून का वगळले? असा सवाल करीत महाराव म्हणाले, कोपर्डीची घटना घडली. त्यात एक मुलगी गेली आणि मग मोर्चेनिघाले, ज्यांना स्वार्थी मुद्देजोडले गेले.शाहूंच्या वारसदारांचा हा बेशरमपणामहाराव बोलायला उभे राहिल्यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे समर्थक ‘शाहू स्मारक’च्या दारात उभे राहिले. यावेळी पोलिसांची धावपळ उडाली. ती पाहून महाराव म्हणाले, ‘त्यांच्या’ (भाजपच्या) नादाला शाहूंचे वारसदार लागले, हा बेशरमपणा आहे. छत्रपती घराण्याविषयी कुणी वाकडं बोललं त्यावेळी उत्तर द्यायला सगळ्यांत पुढे हामहाराव होता.आम्ही शाहूंच्या विचारांचे वारस आहोत. मग घाबरण्याची गरज नाही. ज्या हातांनी सलाम केला, त्याच हातांना कानफाडीत मारण्याचाही अधिकार आहे. ‘समझनेवालों को इशारा काफी है,’ अशा शब्दांत महाराव यांनी ही मांडणी केली.संभाजीराजेंच्यासमर्थकांची उपस्थितीज्ञानेश महाराव यांनी याआधीही छत्रपती परिवारातील काही सदस्यांवर टीका केली होती. त्यामुळे त्यांच्या भाषणावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे समर्थक फत्तेसिंह सावंत, हेमंत साळोखे, माजी नगरसेवक विनायक फाळके, राहुल शिंदे, नरेंद्र इनामदार, सागर दळवी, संदीप साळोखे, प्रतीक दिंडे यांच्यासह कार्यकर्ते सभागृहाबाहेर उभे होते. त्यांच्यासमवेत पोलीसही त्यांच्याजवळ थांबले होते. मात्र, महाराव यांचे भाषण संपल्यानंतर हे कार्यकर्ते निघून गेले.हा ‘चहावाला’ जातीत भांडणे लावणारागंगाराम कांबळे यांची किटली व्यासपीठावर ठेवली होती. याचा संदर्भ घेत महाराव म्हणाले, गंगाराम यांचा चहा हा सगळ्या जातिधर्मांना बांधून ठेवणारा आहे; तर सध्याचा देशातील चहावाला हा जातीत भांडणे लावणारा आहे. यावर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.