शहरं
Join us  
Trending Stories
1
“ऑपरेशन ब्ल्यू स्टार चुकीच्या पद्धतीने राबवले, इंदिरा गांधींना किंमत मोजावी लागली”: चिदंबरम
2
स्कूल बस चालकाने टेम्पोची काच फोडत धमकी दिली; पुणे पोलिसांनी काही तासातच त्याच ठिकाणी गुडघ्यावर चालवले
3
मृत्यूनंतरही डिजिटल मालमत्तेची चिंता नाही! डिजिलॉकरमध्ये नॉमिनी कसा जोडायचा? जाणून घ्या सोपी प्रक्रिया
4
आधी मिठाई खायली दिली अन् नंतर ३ मुलांचा चिरला गळा; बायको माहेरी जाताच नवरा झाला हैवान
5
थिएटर मध्ये जाऊन "मनाचे श्लोक" चित्रपट बंद पाडणे उज्वला गौड यांना भोवले; गुन्हा दाखल
6
“वेळ पडल्यास लढायची तयारी, आम्ही घाबरत नाही”; १०० टक्के ट्रम्प टॅरिफवर चीनचे चोख प्रत्युत्तर
7
कॅनरा बँकेच्या FD मध्ये २ लाख रुपये गुंतवा; ३ वर्षांत मिळवा ४५ हजार रुपयांचे निश्चित व्याज!
8
कमालच झाली राव! WhatsApp वर खाच फीचर; प्रोफाइलवर क्लिक करताच सुरू होणार Facebook
9
कबुतरांमुळे महायुतीचे सरकार पडेल, जैन मुनींच्या इशाऱ्यावर CM फडवीसांचे थेट भाष्य; म्हणाले...
10
जम्मू-कटरा एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात; काँग्रेस नेत्याच्या मुलासह ४ जणांचा मृत्यू
11
IND vs AUS Women’s World Cup 2025 Live Streaming : टीम इंडियासमोर तगडे आव्हान; इथं पाहा दोन्ही संघातील रेकॉर्ड
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींची दिवाळी गोड, शुभ-लाभ; सौभाग्य-संपन्नता, ३ राशींनी ‘हे’ टाळाच
13
₹५,००० वाचवा, लखपती व्हा! 'या' सरकारी योजनेत दरमहा गुंतवणूक करुन जमा होईल २७ लाखांचा निधी
14
अतूट नातं! मृत्यूशी झुंज देणाऱ्या नवऱ्याचा वाचवला जीव, बायकोने दिली किडनी, म्हणाली...
15
मृण्मयी देशपांडेची 'मनाचे श्लोक' चित्रपटाबद्दल मोठी घोषणा; पोस्ट शेअर करत म्हणाली-"अतिशय दु:खद..."
16
नोकरदारांनो, लक्ष द्या! आजपासून पहिली मेट्रो दीड तास उशिराने! मेट्रो २ अ, ७ मार्गिकेसाठी ७ दिवसांचे तात्पुरते वेळापत्रक
17
मोठी दुर्घटना! टेकऑफनंतर गोल गोल फिरलं, झाडावर आदळलं; हेलिकॉप्टर क्रॅशचा भयंकर Video
18
भारीच! "सणाच्या दिवशी काम नाही, फक्त आराम करा", 'या' कंपनीने दिवाळीला दिली ९ दिवस सुटी
19
गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पट्टेदार वाघ, ३ तास चालली रेस्क्यू मोहीम
20
घरात घुसून कुटुंबावर जीवघेणा हल्ला, तिघांविरोधात गुन्हा, पिस्तुलासह रॉडने हल्ला 

राजकारणाचे गटार साफ करणे आवश्यक : वागळे

By admin | Updated: January 18, 2015 00:29 IST

सांगली जिल्हा सुधार समितीच्यावतीने ‘लोकशाहीतील लोकांची भूमिका’ या विषयावर व्याख्यान

सांगली : समाजकारण आणि राजकारण यामध्ये काहीही फरक नसून, राजकारणाचे गटार साफ करण्यासाठी समाजकारण करणाऱ्या व्यक्तींनीच पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत पत्रकार निखिल वागळे यांनी व्यक्त केले.सांगली जिल्हा सुधार समितीच्यावतीने मराठा समाज भवन येथे आयोजित केलेल्या ‘लोकशाहीतील लोकांची भूमिका’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ विचारवंत राजाभाऊ शिरगुप्पे, पत्रकार विनोद शिरसाठ, अ‍ॅड. अमित शिंदे, रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते. निखिल वागळे म्हणाले, सध्याचे राजकारण चांगले नाही, असे म्हणून शांत राहून उपयोग नाही. सामाजिक क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या व्यक्तींनी राजकारणात यायला पाहिजे. दुर्देवाने आज कित्येक लोकप्रतिनिधींना विचारधारेशी काहीही संबंध नसतो. जेथे सत्ता असते तेथे जाणेच अनेकजण पसंत करतात. त्यामुळेच आजकाल राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक जिंकणारी यंत्रे झाली आहेत. ही परिस्थिती बदलण्याकरिता आपणच प्रयत्न केला पाहिजे. समाजात घडणाऱ्या अन्यायाविरोधात प्रत्येकाने आवाज उठविला पाहिजे. एकदा मतदान केले म्हणजे आपले कर्तव्य संपले, असा विचार करून उपयोग नाही. निवडून आलेली व्यक्ती ही जनतेची सेवक आहे. याची जाण प्रथम नागरिकांनी ठेवली पाहिजे आणि कामांचा हिशेब लोकप्रतिनिधींकडे मागितला पाहिजे. आजकाल समाजात शिक्षित लोकांची संख्या वाढली असली तरी, त्यामध्ये सुसंस्कृत व्यक्तींची मात्र कमी आहे. चांगल्या कामांची सुरुवात प्रत्येकाने स्वत:पासून करणे गरजेचे असल्याचेही वागळे यांनी सांगितले. यावेळी राहुल माने यांचा सत्कार झाला. (प्रतिनिधी)