शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणाचे गटार साफ करणे आवश्यक : वागळे

By admin | Updated: January 18, 2015 00:29 IST

सांगली जिल्हा सुधार समितीच्यावतीने ‘लोकशाहीतील लोकांची भूमिका’ या विषयावर व्याख्यान

सांगली : समाजकारण आणि राजकारण यामध्ये काहीही फरक नसून, राजकारणाचे गटार साफ करण्यासाठी समाजकारण करणाऱ्या व्यक्तींनीच पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत पत्रकार निखिल वागळे यांनी व्यक्त केले.सांगली जिल्हा सुधार समितीच्यावतीने मराठा समाज भवन येथे आयोजित केलेल्या ‘लोकशाहीतील लोकांची भूमिका’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ विचारवंत राजाभाऊ शिरगुप्पे, पत्रकार विनोद शिरसाठ, अ‍ॅड. अमित शिंदे, रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते. निखिल वागळे म्हणाले, सध्याचे राजकारण चांगले नाही, असे म्हणून शांत राहून उपयोग नाही. सामाजिक क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या व्यक्तींनी राजकारणात यायला पाहिजे. दुर्देवाने आज कित्येक लोकप्रतिनिधींना विचारधारेशी काहीही संबंध नसतो. जेथे सत्ता असते तेथे जाणेच अनेकजण पसंत करतात. त्यामुळेच आजकाल राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक जिंकणारी यंत्रे झाली आहेत. ही परिस्थिती बदलण्याकरिता आपणच प्रयत्न केला पाहिजे. समाजात घडणाऱ्या अन्यायाविरोधात प्रत्येकाने आवाज उठविला पाहिजे. एकदा मतदान केले म्हणजे आपले कर्तव्य संपले, असा विचार करून उपयोग नाही. निवडून आलेली व्यक्ती ही जनतेची सेवक आहे. याची जाण प्रथम नागरिकांनी ठेवली पाहिजे आणि कामांचा हिशेब लोकप्रतिनिधींकडे मागितला पाहिजे. आजकाल समाजात शिक्षित लोकांची संख्या वाढली असली तरी, त्यामध्ये सुसंस्कृत व्यक्तींची मात्र कमी आहे. चांगल्या कामांची सुरुवात प्रत्येकाने स्वत:पासून करणे गरजेचे असल्याचेही वागळे यांनी सांगितले. यावेळी राहुल माने यांचा सत्कार झाला. (प्रतिनिधी)