शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
2
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
3
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
4
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
5
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
6
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
7
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
8
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
12
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
13
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
14
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
15
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
16
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
17
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
18
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
19
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
20
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 

दुर्बलांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज

By admin | Updated: August 31, 2014 23:37 IST

अनंत दीक्षित : सोमनाथ अवघडे, कुमार दाभाडे, शमवेल मिसाळ, आवळे, साठे ‘समाजरत्न पुरस्कारा’ने सन्मानित

कोल्हापूर : दुर्बल, वंचितांना विकासाचा शाश्वत मार्ग दाखविण्यासाठी ज्ञानासह त्यांच्या मूलभूत गरजा भागविणाऱ्या व्यवस्थेची निर्मिती होणे गरजेचे आहे. या घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बहुजन समाजाने एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांनी आज, रविवारी येथे केले.सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त डॉ. मच्छिंद्र सकटे लिखित ‘देशाबाहेर’ या पुस्तकाचे प्रकाशन, समाजरत्न पुरस्कार वितरण या संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. राजर्षी शाहू स्मारक भवनात दलित महासंघाचा हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. सकटे, ज्येष्ठ समीक्षक डॉ. विश्वनाथ शिंदे, शिवाजी विद्यापीठाच्या कला शाखेचे अधिष्ठाता डॉ. अनिल गवळी उपस्थित होते.दीक्षित म्हणाले, अण्णा भाऊ साठे यांनी ज्या उद्देशाने रशियाला भेट दिली, तोच धागा पकडत मच्छिंद्र सकटे यांनी वीस वर्षांपूर्वी जर्मनी गाठली. त्यांनी याठिकाणी मातंग समाजाचे विवेचन केले. नुसताच दौरा न करता तेथील वास्तवदेखील त्यांनी ‘देशाबाहेर’मधून मांडले आहे. देश शस्त्रसंपन्न, महासत्ता झाला पाहिजे. त्यावर चर्चा होते. मात्र, दुर्बल, वंचितांच्या मूलभूत प्रश्नांवर, त्यांच्या गरजांचा प्राधान्यक्रम ठरविण्याबाबत फारसे काही होत नाही. ते झाले, तरच आपले महासत्ता होण्याचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण होईल. त्यासाठी सकटे यांच्यासारख्या समाजातील सर्वच घटकांतून नेतृत्व पुढे यावे.डॉ. शिंदे म्हणाले, ‘देशाबाहेर’द्वारे लेखकाने माणसे शोधण्याचा, जपण्याचा प्रयत्न केला आहे. अजूनही स्वत:चे घर, रेशनकार्ड, मतदारयादीत नाव नसलेल्या अनेक छोट्या जमाती आहेत. त्यांना स्थिरस्थावर करण्याचे काम मोठ्या जमातींनी करावे.डॉ. गवळी म्हणाले, गावकुसाबाहेर नव्हे, तर देशाबाहेर आपण बघितले पाहिजे, असा समाजाला संदेश देणारे हे पुस्तक आहे. पुस्तक वाचल्यानंतर लेखक हा कष्टकऱ्यांचा असल्याचे जाणवते.डॉ. सकटे म्हणाले, मातंग समाजात क्षमता, ताकद आहे. मात्र, ठोस निर्णय घेतला जात नाही. विविध क्षेत्रांत आमच्या समाजातील मुलांनी कौशल्य दाखविले आहे.सकटे दाम्पत्याचाही सत्कार करण्यात आला. यावेळी प्रकाशक अनिल म्हमाणे, बाबासाहेब दबडे, अमोल महापुरे आदी उपस्थित होते. स्वागताध्यक्ष लालासाहेब नाईक यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश नाईक यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)'देशाबाहेर' पुस्तकाचे प्रकाशन‘देशाबाहेर’ पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. त्यानंतर ‘फँड्री’ फेम सोमनाथ अवघडे, निवृत्त अध्यापक कुमार दाभाडे, सामाजिक कार्यकर्ते शमवेल मिसाळ, विकास आवळे, डॉ. शिवाजीराव साठे यांना समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. आवळे व साठे यांच्यावतीने त्यांच्या नातेवाइकांनी पुरस्कार स्वीकारला.