शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
2
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
3
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
4
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
5
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
6
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
7
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
8
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
9
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
10
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
11
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
12
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
13
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
14
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
15
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
16
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
17
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

करवीरमध्ये राष्ट्रवादीचे अस्तित्व धोक्यात?

By admin | Updated: February 10, 2017 00:19 IST

जिल्हा परिषदेसाठी केवळ चार उमेदवार : पंचायत समितीला २२ पैकी ८ उमेदवार

प्रकाश पाटील-- कोपार्डे --राज्याचे नेतृत्व करण्याची धमक माजी आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांनी आपल्या कर्तृत्वावर निर्माण केली होती. त्या खानविलकरांच्या एक्झिटनंतर करवीर तालुक्यात ‘राष्ट्रवादी’ची मोठी वाताहत झाली असून ‘राष्ट्रवादी’चा रिमोट कंट्रोल आता कागल, राधानगरीत गेल्याने करवीरमधील एकाही राष्ट्रवादी कार्यकर्त्याला मानाचे पद मिळेनासे झाल्याने सैरभैर झालेल्या कार्यकर्त्यांनी एक तर शिवसेनेची कास पकडली आहे अथवा गप्प बसणे पसंद केले आहे. त्यामुळे करवीरमधील ‘राष्ट्रवादी’च्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. २००४ मध्ये ‘राष्ट्रवादी’चा आधारस्तंभ असलेले मंत्री दिग्विजय खानविलकर यांचा आश्चर्यजनक पराभव माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केला. यानंतर करवीर तालुक्यातून राष्ट्रवादीची मोठी पीछेहाट झाली. सतेज पाटील यांनी कॉँग्रेसमध्ये प्रवेश करून येथे कॉँग्रेसला बळकटी देण्याचे काम केले. यानंतर भौगोलिक व लोकसंख्येच्या आधारावर करवीर मतदारसंघाचे विभाजन झाले. कोल्हापूर दक्षिण व करवीर असे दोन मतदारसंघ निर्माण झाल्यानंतर २००९च्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. यावेळी दिग्विजय खानविलकर यांना करवीर मतदारसंघ सुरक्षित होता; पण पराभवाचा वचपा काढण्याच्या ईर्ष्येने त्यांनी सतेज पाटील यांच्या विरोधात दक्षिणमधून उमेदवारी अर्ज दाखल केला; पण येथे त्यांची डिपॉझिट जप्त झाली. या धसक्याने त्यांना उभारी घेताच आली नाही आणि त्यातच त्यांचा अकाली मृत्यू झाला. १५ फेब्रुवारीला त्यांचा स्मृतिदिन असून, आज ज्या करवीरची दिग्विजय खानविलकरांच्या माध्यमातून राज्याचे नेतृत्व करण्याची प्रतिमा निर्माण झाली होती तेथेच ‘राष्ट्रवादी’ची वाताहत झाल्याचे चित्र आहे. दक्षिणमधून खानविलकर यांनी निवडणूक लढवून पराभूत झाल्यानंतर त्यांची जशी राजकारणातून दुर्दैवी एक्झिट झाली. तशी कार्यकर्त्यांनीही नेता शोधण्यास सुरुवात केली. २००९च्या निवडणुकीत ‘कुंभी’चे अध्यक्ष आ. चंद्रदीप नरके यांनी शिवसेनेची उमेदवारी मिळविताच ताकदीचा व जवळचा नेता म्हणून तळातील सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कॉँग्रेसऐवजी शिवसेना जवळ करणे पसंत केले आणि येथेच राष्ट्रवादी विस्कळीत झाली. आॅक्टोबर २०१५च्या विधानसभेसाठी राष्ट्रवादीला उमेदवार मिळाला नसल्याने राष्ट्रवादीचे अस्तित्वच धोक्यात आले. याचवेळी आ. हसन मुश्रीफ, के. पी. पाटील व ए. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादीच्या कागल, राधानगरीतील कार्यकर्त्यांना शिखर संस्थांतील अनेक पदावर विराजमान केले. मात्र,करवीरमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गळचेपी झाली. यामुळे अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीपासून फारकत घेऊ लागले. त्यांना पक्षाची ताकद मिळेना. नेत्यांच्या संधिसाधू युतीमुळे कार्यकर्ते उघडे पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.राष्ट्रवादीचा बोलकिल्ला म्हणून ज्या करवीर तालुक्याची गणना होत होती, तेथे जिल्हा परिषदेचे ११ गट असताना केवळ चारच उमेदवार उभा करता आले आहेत, तर २२ पंचायत समिती गणांपैकी आठच ठिकाणी उमेदवार उभा आहेत.दिग्विजय खानविलकर यांच्यानंतर करवीरमध्ये मोठी पडझडकागल, राधानगरीत रिमोट कंट्रोल गेल्याने करवीरमधील नेत्यांना संधीच नाही.