शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेचा योग नाहीच

By admin | Updated: January 2, 2016 08:33 IST

जिल्हा परिषदेचे राजकारण : ‘स्वाभिमानी’बरोबर पाच वर्षांचा समझोता, पदाधिकारी बदलास काँग्रेसअंतर्गत नेत्यांचा विरोध

राजाराम लोंढे-- कोल्हापूर --विधान परिषद निवडणुकीतील बदललेल्या समीकरणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेमधील पदाधिकारी बदलाची चर्चा जरी सुरू असली, तरी काँग्रेसमधील नेते त्याला तयार नाहीत. राष्ट्रवादीला खूश करण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस नेत्यांना अंगावर घेऊन सतेज पाटील बदलाचा निर्णय घेतील, असे वाटत नाही. त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाच वर्षे सत्तेत वाटा देण्याचा ‘शब्द’ दिल्याने पदाधिकारी बदल अशक्यच असल्याचे काँग्रेसअंतर्गत चर्चा सुरू आहे. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे सतेज पाटील हे जरी विजयी झाले असले, तरी या निवडणुकीतील राजकारणाचे सर्वाधिक हादरे काँग्रेसमध्ये बसले आहेत. पहिल्यांदा उमेदवारीवरून काँग्रेसअंतर्गत कुरघोडीच्या राजकारणाने जोर धरला. त्यात महादेवराव महाडिक यांच्या बंडखोरीमुळे राजकारण चांगलेच उफाळून आले. राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य पक्षाने साथ दिल्याने सतेज पाटील यांना विजयापर्यंत पोहोचणे फारसे अवघड नव्हते; पण त्यांना खरी भीती काँग्रेसअंतर्गत राजकारणाचीच होती. राष्ट्रवादी, ‘जनसुराज्य’चे नेते प्रामाणिक राहिले नसते, तर कदाचित वेगळा निकाल लागला असता. हाच मुद्दा पुढे करीत राष्ट्रवादीचे सदस्य जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी आग्रही आहेत. कोल्हापूर महापालिकेच्या सत्तास्थापनेत राष्ट्रवादीने काँग्रेसला साथ दिली; पण ही आघाडी जिल्हा परिषदेत का नाही, असा सूर राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्यांनी आळवला होता. विधान परिषद निवडणुकीत पाठिंबा देताना जिल्हा परिषदेची चर्चा झाली. त्यावेळी सतेज पाटील यांनी ‘बघूया,’ एवढेच आश्वासन दिले होते. पदाधिकारी बदलांबाबत प्रदेश काँग्रेसशी बोलण्याचे अधिकार माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांना देण्यात आले आहेत; पण हा निर्णय केवळ कोल्हापूरबाबत होणार नाही. दोन्ही काँग्रेसचे मनोमिलन व्हायचे झाल्यास राज्य पातळीवर व्हावे लागेल. हा विषय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पातळीवर राहणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका वर्षावर आल्या आहेत. त्यात काँग्रेसअंतर्गत नेत्यांना अंगावर घेऊन बदल करणे तितकेसे सोपे नाही. जरी सव्वा वर्षाने पदाधिकारी बदलाचे ठरले असले, तरी आजपर्यंतचा इतिहास पाहता प्रत्येकाने अडीच वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेला आहे. बदल कोणासाठी ?जिल्हा परिषदेमधील सध्याच्या पदांचे वाटप पाहिले तर प्रकाश आवाडे, सतेज पाटील, भरमूण्णा पाटील यांच्या एका, तर पी. एन. पाटील यांच्या दोन कार्यकर्त्यांना संधी मिळालेली आहे. आता बदल करायचा म्हटला तर कोणासाठी करायचा ? बदल करायचा ठरविल्यास सत्तेचा समतोल साधताना नेत्यांना कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे बदल कोणासाठी करायचा ? हा खरा प्रश्न असून, प्रदेश काँग्रेसकडून त्याला सहमती मिळण्याची शक्यता धूसर आहे. पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याची अडचणकाँग्रेस नेत्यांच्या विरोधात जाऊन अध्यक्षांसह काही पदाधिकाऱ्यांकडून राजीनामे घेणे तसे कठीण आहे. राजीनामे दिले नाही, तर अविश्वास आणावा लागेल. तेवढे संख्याबळ दोन्ही काँग्रेसचे होईलही; पण निवडणुकीच्या तोंडावर एवढी मोठी जोखीम सतेज पाटील घेतील, असे वाटत नाही.पतंगरावांनीच दिला होता चर्चेला पूर्णविरामविधान परिषद निवडणुकीच्या घडामोडीत आमदार हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेच्या सत्तेत सहभागी करण्याची मागणी आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्याकडे केली होती. त्यावेळी तुम्ही सांगलीत जयंतरावांना काँग्रेसला सत्तेत घेण्यास सांगा, मग बघूया, असे उत्तर देऊन याविषयाला पूर्णविराम दिला होता. जिल्हा परिषदेमधील आघाडी वेगळी आणि राज्याचे राजकारण वेगळे असते. अनेकवेळा आम्ही काँग्रेस पक्षाला मदत केलेली आहे, तरीही कोणाच्या तरी आग्रहाखातर बदल करणार व काँग्रेसला ‘स्वाभिमानी’सत्तेत नको असेल, तर तो त्यांनी निर्णय घ्यावा. - खासदार राजू शेट्टी