शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

नैसर्गिकरीत्या संवर्धित अंबाबाईची एकमेव मूर्ती

By admin | Updated: August 2, 2015 01:19 IST

वसंत शिंदे यांची माहिती : भारतातील पहिलाच प्रयोग; दररोज १३ तास संवर्धन

कोल्हापूर : बिब्बा, बेहडा, दूर्वांचा रस, चंदन अशा नैसर्गिक साधनांपासून कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मूर्तीच्या संवर्धनाचे काम करण्यात आले असून, हा भारतातील पहिला प्रयोग असल्याची माहिती डेक्कन कॉलेज, पुणेच्या अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू व पुरातत्त्व विभागाचे तज्ज्ञ वसंत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. अंबाबाईची ही मूर्ती ११व्या शतकातील असून, या संवर्धनामुळे ती अधिकच सुंदर झाली असल्याचे त्यांनी सांगितले. करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मूर्ती संवर्धनाचे काम गेल्या आठ दिवसांपासून सुरू आहे. केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या सात अधिकाऱ्यांनी रोज १३ तास मूर्ती संवर्धनाचे काम केले आहे. आज, रविवारी संध्याकाळी ते पंढरपूरला रवाना होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुरातत्त्व विभागाचे तज्ज्ञ वसंत शिंदे यांनी अंबाबाईच्या मूर्तीची पाहणी केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मूर्तीसंबंधी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, भारतातील मूर्तींना पाश्चात्त्य पद्धतीचे तंत्रज्ञान वापरून केमिकल कॉन्झर्वेशन केले जाते. या पद्धतीमध्ये रसायनांचा फार मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे पाच-दहा वर्षांनी मूर्ती अधिकच खराब होत जाते. भारताच्या स्थापत्यशास्त्र, मूर्तिशास्त्राच्या ग्रंथांमध्ये मूर्ती संवर्धनाची खूप माहिती आहे, ज्यात विशिष्ट वनस्पती, फुले-पानांचा रस यांच्या लेपांची माहिती आहे. त्या आधारे अधिकारी मनेजर सिंग यांनी भारतीय ग्रंथांचा अभ्यास करून, या नैसर्गिक साधनांचा वापर करीत अंबाबाईच्या मूर्तीच्या संवर्धनाचे काम केले आहे. हा भारतातील पहिलाच प्रयोग आहे. या संवर्धनासाठी बिब्बा, बेहड्याचा अर्क, दूर्वांचा रस, चंदनाची पूड, गाईच्या तुपापासून बनविलेले अंजन (काजळ) वापरण्यात आले आहे. त्यातही बिब्बा आणि बेहड्याच्या अर्काचे तीन वेळा आणि दुर्वांच्या रसाचे दोन वेळा कोटिंग केले आहे. या लेपाने मूर्तीचे कोणतेही नुकसान होणार नाही. हा प्रयोेग किती यशस्वी झाला आहे, हे पाहण्यासाठी दर सहा महिन्यांनी आम्ही मूर्तीची पाहणी-निरीक्षण करणार आहोत. मूर्तीसह मंदिराचेही संवर्धन व्हावे देवीची ही मूर्ती कमीत कमी ११ व्या शतकातील असून, अजूनही तिची स्थिती चांगली आहे. मंदिरदेखील त्याच कालावधीतील आहे. सध्या पंढरपूरच्या विठ्ठलाचे मंदिर, जेजुरीच्या खंडोबाचे मंदिर अशा मंदिरांचे संवर्धन आमच्यावतीने केले जात आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मूर्तीबरोबरच मंदिराचेही संवर्धन व्हायला हवे. त्यासाठी स्थानिक प्रशासनाने पुढाकार घ्यावा. तसेच मूर्तीचा अभ्यासही व्हायला हवा. मूर्तीचे मूळ सौंदर्य खुलले शिंदे म्हणाले, अंबाबाई मूर्तीवर यापूर्वी केलेला वज्रलेप चुकीच्या पद्धतीचा होता. तो निघताना लावलेले एमसील, पितळी पट्ट्यांमुळे अतिरिक्त वजन पडले होते. हे सगळे प्रकार मूर्तीवरून काढले. त्यामुळे मूळ मूर्ती प्रकाशात आली. आम्ही केलेल्या संवर्धन प्रक्रियेमुळे मूर्तीची झीज भरून निघाली.