शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

महापालिका निवडणूक नियोजनात ‘राष्ट्रीवादी पुढं’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:13 IST

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणूक अद्याप जाहीर व्हायची असली तरी, महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीच्या तयारीत पुढे आहे. ...

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणूक अद्याप जाहीर व्हायची असली तरी, महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीच्या तयारीत पुढे आहे. पक्षाने आपले उमेदवार सर्वात आधी जाहीर केले आहेत. पक्षीय पातळीवर नियोजन करण्याकरिता पक्षातर्फे एक समिती स्थापन करण्यात आली असून, समितीच्यावतीने प्रभागनिहाय सर्वेक्षण सुरू करण्यात आले.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस अशा तीन पक्षांची महाविकास आघाडी आकाराला आली आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत ही आघाडी राहणार नसली तरी, निवडणुकीनंतर तर कायम राहणार आहे. पक्षाचे कार्यकर्ते पक्षाबरोबर राहावेत, आपऱ्या कार्यकर्त्यांकडून गद्दारी करून विरोधकांना मिळू नयेत, म्हणून तिन्ही पक्षांनी स्वतंत्र लढण्याचा आणि निवडणुकीनंतर एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. जरी त्यांनी या निवडणुकीस ‘मैत्रीपूर्ण लढत’ असे सोयीचे नाव दिले असले तरी, खरी चुरस मात्र त्यांच्यातच होणार आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षात नेत्यांकडून सर्वाधिक जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांना ‘नंबर एक’चा पक्ष म्हणून सभागृहात स्थान मिळवायचे आहे. त्यामुळे ऐनवेळी उमेदवारांची पळवापळवी देखील होण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांत तयारीला वेग आला आहे. राष्ट्रवादीने ८१ प्रभागात उमेदवार उभे करण्याचा निर्धार केला आहे. प्रत्येक प्रभागनिहाय उमेदवार शोधमोहीम त्यांनी सुरू केली आहे. प्रभागात स्थानिक नागरिक, कार्यकर्त्यांकडून उमेदवारांबाबत चाचपणी केली जात आहे. निवडणूक तयारीत त्यांनी सध्या तरी आघाडी घेतली आहे.

पक्षाची समिती जाहीर -

राष्ट्रवादीने निवडणुकीचे नियोजन करण्याकरिता ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, राजेश लाटकर, आदिल फरास, सुनील देसाई, उत्तम कोराणे, अजित राऊत, संजय कुऱ्हाडे, विनायक फाळके, संदीप कवाळे, महेंद्र चव्हाण यांची एक समिती स्थापन केली आहे.

शिवसेना एकटीच लढणार-

महाआघाडी असून देखील शिवसेना सध्या तरी एकाकी पडली असल्याचे चित्र आहे. शिवसेनेतील मतभेद असल्याने नेतेमंडळीत एकी राहिलेली नाही. त्यातच काँग्रेस, राष्ट्रवादी आपली आपली घोडी पुढे नेत असल्यामुळे शिवसेनेला एकाकीच लढावे लागणार आहे. शिवसेनेत कडवट शिवसैनिक आहेत, पण निवडणूक जिंकण्याचे कौशल्य फार थोड्या शिवसैनिकांकडे आहे.