शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
4
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
5
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
6
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
7
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
8
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
9
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
10
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
11
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
12
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
13
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
14
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
15
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
16
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
17
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
18
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
19
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
20
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा

महापालिका निवडणूक नियोजनात ‘राष्ट्रीवादी पुढं’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:13 IST

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणूक अद्याप जाहीर व्हायची असली तरी, महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीच्या तयारीत पुढे आहे. ...

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणूक अद्याप जाहीर व्हायची असली तरी, महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीच्या तयारीत पुढे आहे. पक्षाने आपले उमेदवार सर्वात आधी जाहीर केले आहेत. पक्षीय पातळीवर नियोजन करण्याकरिता पक्षातर्फे एक समिती स्थापन करण्यात आली असून, समितीच्यावतीने प्रभागनिहाय सर्वेक्षण सुरू करण्यात आले.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस अशा तीन पक्षांची महाविकास आघाडी आकाराला आली आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत ही आघाडी राहणार नसली तरी, निवडणुकीनंतर तर कायम राहणार आहे. पक्षाचे कार्यकर्ते पक्षाबरोबर राहावेत, आपऱ्या कार्यकर्त्यांकडून गद्दारी करून विरोधकांना मिळू नयेत, म्हणून तिन्ही पक्षांनी स्वतंत्र लढण्याचा आणि निवडणुकीनंतर एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. जरी त्यांनी या निवडणुकीस ‘मैत्रीपूर्ण लढत’ असे सोयीचे नाव दिले असले तरी, खरी चुरस मात्र त्यांच्यातच होणार आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षात नेत्यांकडून सर्वाधिक जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांना ‘नंबर एक’चा पक्ष म्हणून सभागृहात स्थान मिळवायचे आहे. त्यामुळे ऐनवेळी उमेदवारांची पळवापळवी देखील होण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांत तयारीला वेग आला आहे. राष्ट्रवादीने ८१ प्रभागात उमेदवार उभे करण्याचा निर्धार केला आहे. प्रत्येक प्रभागनिहाय उमेदवार शोधमोहीम त्यांनी सुरू केली आहे. प्रभागात स्थानिक नागरिक, कार्यकर्त्यांकडून उमेदवारांबाबत चाचपणी केली जात आहे. निवडणूक तयारीत त्यांनी सध्या तरी आघाडी घेतली आहे.

पक्षाची समिती जाहीर -

राष्ट्रवादीने निवडणुकीचे नियोजन करण्याकरिता ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, राजेश लाटकर, आदिल फरास, सुनील देसाई, उत्तम कोराणे, अजित राऊत, संजय कुऱ्हाडे, विनायक फाळके, संदीप कवाळे, महेंद्र चव्हाण यांची एक समिती स्थापन केली आहे.

शिवसेना एकटीच लढणार-

महाआघाडी असून देखील शिवसेना सध्या तरी एकाकी पडली असल्याचे चित्र आहे. शिवसेनेतील मतभेद असल्याने नेतेमंडळीत एकी राहिलेली नाही. त्यातच काँग्रेस, राष्ट्रवादी आपली आपली घोडी पुढे नेत असल्यामुळे शिवसेनेला एकाकीच लढावे लागणार आहे. शिवसेनेत कडवट शिवसैनिक आहेत, पण निवडणूक जिंकण्याचे कौशल्य फार थोड्या शिवसैनिकांकडे आहे.