शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

राधानगरीत राष्ट्रवादीचा घंटानाद

By admin | Updated: October 27, 2015 23:56 IST

तहसीलदारांना निवेदन : केंद्र व राज्य सरकार पोकळ घोषणा करण्यात मग्न असल्याचा आरोप

राधानगरी : राधानगरी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने महागाईच्या विरोधात तहसील कार्यालयाजवळ घंटानाद आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष ए. वाय. पाटील व तालुका अध्यक्ष प्रा. किसन चौगले यांनी या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार उदय गायकवाड यांना दिले. येथील अंबाबाई मंदिरापासून थाळीनाद करीत कार्यकर्ते तहसील कचेरीवर धडकले. यावेळी झालेल्या सभेत बोलताना जिल्हा अध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, केंद्रात भाजप सरकार सत्तेत येऊन दीड वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. तर राज्यात सरकार आपला एक वर्षाचा कालावधी पूर्ण करीत आहे. निवडणुकीपूर्वी सरकारमधील नेत्यांनी सत्तेत येताच महागाई कमी करू, असे आश्वासन दिले होते. मात्र दिवसेंदिवस महागाई वाढत असून, सर्वसामान्य जनतेला जगणे अशक्य झाले आहे. तरीही सरकार पोकळ घोषणा करण्यात मग्न आहे. माजी आमदार नामदेवराव भोईटे, तालुका अध्यक्ष प्रा. किसन चौगले यांची भाषणे झाली. यावेळी उपसभापती संगीता कांबळे, तालुका सरचिटणीस राजेंद्र भाटळे, ‘भोगावती’चे संचालक डी. बी. पाटील, महादेव कोथळकर, पांडुरंग डोंगळे, अमर चौगले, नेताजी पाटील, विश्वास पाटील, सर्जेराव पाटील, माजी सभापती संजय कलिकते, शंकरराव डोंगळे, भिकाजी एकल, अनुप वागरे, महिला अध्यक्ष संजीवनी कदम, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)